शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

दुबारचे संकट टळले; उत्पादनाची चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 17:33 IST

वाई : जून महिना कोरडा गेला असतानाही जुलै महिन्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने वाई तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले. असे असलेतरीही पावसाची दमदार सुरुवात होऊनही तालुक्यातील सर्वच धरणे भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच उत्पादनात घट ...

ठळक मुद्देवाई तालुक्यातील स्थिती

वाई : जून महिना कोरडा गेला असतानाही जुलै महिन्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने वाई तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले. असे असलेतरीही पावसाची दमदार सुरुवात होऊनही तालुक्यातील सर्वच धरणे भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सध्या धोम धरणात फक्त ६० टक्के, नागेवाडी धरणात ४३ तर बलकवडी धरणात फक्त ८० टक्के पाणीसाठा आहे. बलकवडी व धोम धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर नागेवाडी धरणात पाण्याची आवक मंदावली आहे. पावसाने या आठवड्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने पाण्याची आवक पुरेशी राहणार नाही. त्यामुळे तिन्ही धरणात पुरेसा पाणीसाठा न झाल्यास तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्यावर्षी पावसाने सुरुवात उशिरा करूनही नऊ जुलैला कृष्णा नदीला महापूर आला होता. यावर्षी आॅगष्ट महिना उजाडला तरीही तालुक्यातील धरणांची अवस्था चिंतनीय आहे. पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा पुन्हा एकदा खरीप हंगाम वाया जातोय की काय या चिंतेने ग्रासला आहे.  वाई तालुक्याची भौगोलिक परिस्थिती अतिशय विचित्र आहे. हा तालुका सुजलाम-सुफलाम आहे, असे मानले जात असले तरीही वाई तालुक्याचा पश्चिम भाग अतिवृष्टीचा भाग मानला जातो. वाई शहरासह दक्षिण-उत्तरेला पावसाचे प्रमाण मध्यम असते. तर पूर्वेला पाऊस अतिशय कमी पाऊस पडत असल्याने दुष्काळी परिस्थिती नेहमीच उद्भवलेली असते. अशा या विचित्र पर्जन्यमान असणाºया तालुक्यात यावर्षी पश्चिम भागातही पुरेसा पाऊस न पडल्याने संपूर्ण तालुक्यावर दुष्काळाची दाट छाया निर्माण झाली आहे. त्यामुळे वाई तालुका निसर्गाच्या विचित्र अशा परिस्थितीत अडकल्याचे चित्र सध्या दिसत आहे.उत्पादनात घट होण्याची भीती...आॅगष्ट महिन्यात पुरेसा पाऊस न पडल्यास यावर्षी उत्पादनात घट होण्याची भीती आहे. खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामातील पिकांसाठी धोक्याची घंटा आहे. सध्या सण-उत्सवांना सुरुवात झाल्याने शेतकºयांना ते कसे साजरे करायचे या संकटाने ग्रासले आहे. एकंदरीत बळीराजा काही केल्या निसर्गाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडेल, असे सध्या तरी दिसत नाही.