शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

दुबारचे संकट टळले; उत्पादनाची चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 17:33 IST

वाई : जून महिना कोरडा गेला असतानाही जुलै महिन्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने वाई तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले. असे असलेतरीही पावसाची दमदार सुरुवात होऊनही तालुक्यातील सर्वच धरणे भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच उत्पादनात घट ...

ठळक मुद्देवाई तालुक्यातील स्थिती

वाई : जून महिना कोरडा गेला असतानाही जुलै महिन्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने वाई तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले. असे असलेतरीही पावसाची दमदार सुरुवात होऊनही तालुक्यातील सर्वच धरणे भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सध्या धोम धरणात फक्त ६० टक्के, नागेवाडी धरणात ४३ तर बलकवडी धरणात फक्त ८० टक्के पाणीसाठा आहे. बलकवडी व धोम धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर नागेवाडी धरणात पाण्याची आवक मंदावली आहे. पावसाने या आठवड्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने पाण्याची आवक पुरेशी राहणार नाही. त्यामुळे तिन्ही धरणात पुरेसा पाणीसाठा न झाल्यास तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्यावर्षी पावसाने सुरुवात उशिरा करूनही नऊ जुलैला कृष्णा नदीला महापूर आला होता. यावर्षी आॅगष्ट महिना उजाडला तरीही तालुक्यातील धरणांची अवस्था चिंतनीय आहे. पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा पुन्हा एकदा खरीप हंगाम वाया जातोय की काय या चिंतेने ग्रासला आहे.  वाई तालुक्याची भौगोलिक परिस्थिती अतिशय विचित्र आहे. हा तालुका सुजलाम-सुफलाम आहे, असे मानले जात असले तरीही वाई तालुक्याचा पश्चिम भाग अतिवृष्टीचा भाग मानला जातो. वाई शहरासह दक्षिण-उत्तरेला पावसाचे प्रमाण मध्यम असते. तर पूर्वेला पाऊस अतिशय कमी पाऊस पडत असल्याने दुष्काळी परिस्थिती नेहमीच उद्भवलेली असते. अशा या विचित्र पर्जन्यमान असणाºया तालुक्यात यावर्षी पश्चिम भागातही पुरेसा पाऊस न पडल्याने संपूर्ण तालुक्यावर दुष्काळाची दाट छाया निर्माण झाली आहे. त्यामुळे वाई तालुका निसर्गाच्या विचित्र अशा परिस्थितीत अडकल्याचे चित्र सध्या दिसत आहे.उत्पादनात घट होण्याची भीती...आॅगष्ट महिन्यात पुरेसा पाऊस न पडल्यास यावर्षी उत्पादनात घट होण्याची भीती आहे. खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामातील पिकांसाठी धोक्याची घंटा आहे. सध्या सण-उत्सवांना सुरुवात झाल्याने शेतकºयांना ते कसे साजरे करायचे या संकटाने ग्रासले आहे. एकंदरीत बळीराजा काही केल्या निसर्गाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडेल, असे सध्या तरी दिसत नाही.