शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
3
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
4
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
5
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
6
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
7
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
8
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
9
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
10
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
11
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
12
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
14
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
15
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
16
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
17
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
18
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
19
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
20
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

कोरोनामुळे वाजंत्री, बॅन्ड मालकांवर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:35 IST

ओगलेवाडी: शुभकार्यात मंगल स्वरांनी वातावरण पवित्र करणारे वाजंत्रीवाले सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. ऐन लग्नसराईत मागीलवर्षी टाळेबंदी झाली ...

ओगलेवाडी: शुभकार्यात मंगल स्वरांनी वातावरण पवित्र करणारे वाजंत्रीवाले सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. ऐन लग्नसराईत मागीलवर्षी टाळेबंदी झाली आणि व्यवसाय करता आला नाही. मोठे आर्थिक नुकसान सोसून यावर्षी त्यांनी सराव केला. मात्र कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले व अनेक कठोर निर्बंध शासनाने घातले. आता व्यवसाय करायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. आर्थिक समस्या उभी राहिली असल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे.

महाराष्ट्रात अनेक लोककला आणि आपले पारंपरिक व्यवसाय करून जीवन जगणारे समाज आहेत. वाजंत्री हा एक त्यापैकीच महत्त्वाचा समाज आहे. या समाजाचे लोक मंगलप्रसंगी वाद्ये वाजवून त्याबदल्यात मिळणाऱ्या उत्पन्नातून आपला चरितार्थ चालवत असतात. काळाबरोबर हा समाजही बदलला आणि नवनवीन वाद्ये आणि गायक-गायिका यांचा मोठा संच तयार करून लग्नसराईत वाद्ये वाजवून आर्थिक कमाई करण्याकडे अनेकांचा कल निर्माण झाला. यातून मिळणारे उत्पन्न आणि अनेकजण या व्यवसायात उतरल्याने निर्माण झालेली स्पर्धा यातून अनेक गावांतून बॅन्डपथके तयार झाली. पंधरा ते ५० पर्यंत वादक आणि इतर लोक, असे पथक तयार झाले. आकर्षक पोषाख व विविध प्रकारची आधुनिक वाद्ये वाजवणारे वादक यामुळे हा व्यवसाय चांगलेच बाळसे धरू लागला होता. लग्नाच्या आणि इतर मंगलप्रसंगी वाद्ये वाजवण्यासाठी मोठमोठ्या सुपाऱ्या यांना मिळू लागल्या. आपलाच बॅन्ड कसा सर्वात चांगला आहे, हे दाखवण्यासाठी बॅन्डचे वाहन खूप चांगल्या प्रकारे सजवण्याची चढाओढ सुरू झाली. चांगला होणारा फायदा आणि कमी वेळात मान-सन्मान मिळवून देणारा व्यवसाय, यामुळे अनेकांनी या व्यवसायात मोठी गुंतवणूक केली. ही गुंतवणूक काही लाखाच्या घरात गेल्याने अनेकांनी या व्यवसायासाठी बँकेचे कर्ज उचलले आणि चांगला ताफा तयार केला.

सर्व व्यवस्थित चालू आहे, असे वाटत असतानाच अचानक मागील मार्चमध्ये कोरोनाने सर्वांना कवेत घेतले. परिस्थिती हाताबाहेर चालल्याने केंद्र सरकारने टाळेबंदीचा निर्णय घेतला आणि सर्वच व्यवसाय अडचणीत आले. यामध्ये सर्वात जास्त फटका वाजंत्री व्यवसायाला बसला. ऐन लग्नाच्या मोसमात मागीलवर्षी टाळेबंदीचा निर्णय घेतला गेला. हजारो रुपयांचा तोटा या व्यावसायिकांना सहन करावा लागला. आगाऊ घेतलेली इसारत रक्कमही अनेकांना माघारी करावी लागली. सात ते आठ महिने घरी बसून दिवस काढावे लागले.

दीपावलीनंतर कोरोनाचा प्रभाव कमी होत गेला आणि सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. जानेवारी, फेब्रुवारीत तर कोरोना संपला, असे वातावरण तयार झाले. लग्नाच्या ऑर्डर्सही येऊ लागल्या. इसारत रक्कम देऊन लोक आपल्या मंगल कार्यासाठी ताफे ठरवू लागले. यावर्षी तरी लग्नसराईत चांगला व्यवसाय होईल आणि चार पैसे पदरात पडतील, असे आशादायी चित्र निर्माण झाले असतानाच, पुन्हा कोरोना संसर्ग वेगाने वाढू लागला.

चाैकट :

शासनाने दखल घेण्याची गरज..

लग्नाला पुन्हा ५० लोकांची मर्यादा आली आणि वाजंत्री व्यावसायिकांवर पुन्हा गदा आली. यावर्षीही व्यवसाय होणार नाही, याची जाणीव झाली. आता पुढे काय करायचे, असा प्रश्न आ वासून उभा आहे. लोकांनी दिलेली इसारत रक्कम पुन्हा माघारी मागायला सुरुवात केली आणि परिस्थिती आणखीनच भयावह बनू लागली. यामुळे आता हा ताफा सांभाळणे कठीण होते आहे. व्यवसाय होत नसल्याने उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. या व्यावसायिक लोकांना सरकारकडून कधीही कोणतेही सहकार्य मिळत नाही. मात्र आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याने शासनाने या लोकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी बॅन्ड व्यावसायिक संजय जाधव यांनी केली आहे.