शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

कोरोनामुळे वाजंत्री, बॅन्ड मालकांवर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:35 IST

ओगलेवाडी: शुभकार्यात मंगल स्वरांनी वातावरण पवित्र करणारे वाजंत्रीवाले सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. ऐन लग्नसराईत मागीलवर्षी टाळेबंदी झाली ...

ओगलेवाडी: शुभकार्यात मंगल स्वरांनी वातावरण पवित्र करणारे वाजंत्रीवाले सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. ऐन लग्नसराईत मागीलवर्षी टाळेबंदी झाली आणि व्यवसाय करता आला नाही. मोठे आर्थिक नुकसान सोसून यावर्षी त्यांनी सराव केला. मात्र कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले व अनेक कठोर निर्बंध शासनाने घातले. आता व्यवसाय करायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. आर्थिक समस्या उभी राहिली असल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे.

महाराष्ट्रात अनेक लोककला आणि आपले पारंपरिक व्यवसाय करून जीवन जगणारे समाज आहेत. वाजंत्री हा एक त्यापैकीच महत्त्वाचा समाज आहे. या समाजाचे लोक मंगलप्रसंगी वाद्ये वाजवून त्याबदल्यात मिळणाऱ्या उत्पन्नातून आपला चरितार्थ चालवत असतात. काळाबरोबर हा समाजही बदलला आणि नवनवीन वाद्ये आणि गायक-गायिका यांचा मोठा संच तयार करून लग्नसराईत वाद्ये वाजवून आर्थिक कमाई करण्याकडे अनेकांचा कल निर्माण झाला. यातून मिळणारे उत्पन्न आणि अनेकजण या व्यवसायात उतरल्याने निर्माण झालेली स्पर्धा यातून अनेक गावांतून बॅन्डपथके तयार झाली. पंधरा ते ५० पर्यंत वादक आणि इतर लोक, असे पथक तयार झाले. आकर्षक पोषाख व विविध प्रकारची आधुनिक वाद्ये वाजवणारे वादक यामुळे हा व्यवसाय चांगलेच बाळसे धरू लागला होता. लग्नाच्या आणि इतर मंगलप्रसंगी वाद्ये वाजवण्यासाठी मोठमोठ्या सुपाऱ्या यांना मिळू लागल्या. आपलाच बॅन्ड कसा सर्वात चांगला आहे, हे दाखवण्यासाठी बॅन्डचे वाहन खूप चांगल्या प्रकारे सजवण्याची चढाओढ सुरू झाली. चांगला होणारा फायदा आणि कमी वेळात मान-सन्मान मिळवून देणारा व्यवसाय, यामुळे अनेकांनी या व्यवसायात मोठी गुंतवणूक केली. ही गुंतवणूक काही लाखाच्या घरात गेल्याने अनेकांनी या व्यवसायासाठी बँकेचे कर्ज उचलले आणि चांगला ताफा तयार केला.

सर्व व्यवस्थित चालू आहे, असे वाटत असतानाच अचानक मागील मार्चमध्ये कोरोनाने सर्वांना कवेत घेतले. परिस्थिती हाताबाहेर चालल्याने केंद्र सरकारने टाळेबंदीचा निर्णय घेतला आणि सर्वच व्यवसाय अडचणीत आले. यामध्ये सर्वात जास्त फटका वाजंत्री व्यवसायाला बसला. ऐन लग्नाच्या मोसमात मागीलवर्षी टाळेबंदीचा निर्णय घेतला गेला. हजारो रुपयांचा तोटा या व्यावसायिकांना सहन करावा लागला. आगाऊ घेतलेली इसारत रक्कमही अनेकांना माघारी करावी लागली. सात ते आठ महिने घरी बसून दिवस काढावे लागले.

दीपावलीनंतर कोरोनाचा प्रभाव कमी होत गेला आणि सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. जानेवारी, फेब्रुवारीत तर कोरोना संपला, असे वातावरण तयार झाले. लग्नाच्या ऑर्डर्सही येऊ लागल्या. इसारत रक्कम देऊन लोक आपल्या मंगल कार्यासाठी ताफे ठरवू लागले. यावर्षी तरी लग्नसराईत चांगला व्यवसाय होईल आणि चार पैसे पदरात पडतील, असे आशादायी चित्र निर्माण झाले असतानाच, पुन्हा कोरोना संसर्ग वेगाने वाढू लागला.

चाैकट :

शासनाने दखल घेण्याची गरज..

लग्नाला पुन्हा ५० लोकांची मर्यादा आली आणि वाजंत्री व्यावसायिकांवर पुन्हा गदा आली. यावर्षीही व्यवसाय होणार नाही, याची जाणीव झाली. आता पुढे काय करायचे, असा प्रश्न आ वासून उभा आहे. लोकांनी दिलेली इसारत रक्कम पुन्हा माघारी मागायला सुरुवात केली आणि परिस्थिती आणखीनच भयावह बनू लागली. यामुळे आता हा ताफा सांभाळणे कठीण होते आहे. व्यवसाय होत नसल्याने उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. या व्यावसायिक लोकांना सरकारकडून कधीही कोणतेही सहकार्य मिळत नाही. मात्र आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याने शासनाने या लोकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी बॅन्ड व्यावसायिक संजय जाधव यांनी केली आहे.