शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हे

By admin | Updated: September 4, 2015 20:26 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांना इशारा : दुष्काळ निवारणात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविणार

सातारा : ‘जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात पाणी तसेच चारा याबाबत उपाययोजना करणारा कृती आराखडा तयार ठेवावा. त्याचबरोबर उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करावी, अशा सूचना देताना कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हे दाखल केले जातील,’ असा इशारा जिल्हाधिकरी अश्विन मुदगल यांनी दिला. पालकमंत्री विजय शिवतारे आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली टंचाईबाबत होणाऱ्या बैठकीतील विषयांचा पूर्व आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी गुरुवारी नियोजन भवनात घेतला. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, ‘रोहयो’चे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश गणेशकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने आदी उपस्थित होते.मुदगल म्हणाले, ‘तालुकनिहाय तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता यांनी कोणतीही कर्तव्यात कसूर न करता गावांमध्ये पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने त्याचबरोबर चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने काटेकोरपणे उपाययोजना कराव्यात. यात प्रामुख्याने विंधन विहिरींची दुरुस्ती, नळ पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती, विहिरींचे अधिग्रहण, नवीन विहिरींची कामे याला प्राधान्य द्यावे. विशेष दुरुस्ती योजना राबवावी. टंचाई कृती आराखडा तयार ठेवावा. पाण्याचा स्त्रोत दृष्टिकोनातून उपाययोजनांना सुरुवात करावी. केवळ नळ पाणीपुरवठा योजनेच्या ना दुरुस्तीमुळे टँकर सुरू करणे, हे खपवून घेतले जाणार नाही. या कामात कसूर केल्यास गुन्हे दाखल केले जातील.’माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांचा सविस्तर आढावा घेऊन मुदगल म्हणाले, ‘उरमोडीचे पाणी माणमध्ये सोडण्यात येत आहे, यामुळे निश्चितपणे तेथील टंचाईग्रस्त गावांमध्ये फरक पडेल. धोम वगळता बाकीच्या धरणांमधील पाणीपातळी चांगली आहे. खटावमधील पुसेसावळी प्रादेशिक पाणी योजना युद्धपातळीवर सुरू करावी. गावनिहाय नियंत्रण ठेवा. टँकर फिडिंग पॉइंट सुस्थितीत ठेवून प्रस्तावित टंचाईग्रस्त गावांचे कृती आराखडे तयार करावेत.ज्या तालुक्यांमध्ये उपलब्ध चारा आहे, तो संभाव्य टंचाईग्रस्त भागांमध्ये पाठविण्याबाबतही नियोजन कराव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कालवे फोडणाऱ्यांवरही गुन्हे धोम-बलकवडीचे पाणीही फलटण-खंडाळ्याकडे गेले पाहिजे. हे कालवे फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. आवश्यक त्या ठिकाणी १४४ कलम जाहीर करा. पोलीस बंदोबस्त ठेवा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले.कायदा काय सांगतो?आपत्ती व्यवस्थापन कायदा हा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लागू होतो. दुष्काळी परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती कोसळल्यानंतर सर्वच अधिकाऱ्यांनी दक्ष राहून काम केले पाहिजे. स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर करणे आवश्यक आहे. त्यावर वेळीच उपाययोजना करण्यात याव्यात. यामध्ये कुठल्या अधिकाऱ्याने अथवा कर्मचाऱ्याने कसूर केल्यास त्याचे निलंबन निश्चित असते. या प्रकरणात अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचे अधिकारही जिल्हाधिकाऱ्यांना आहेत.