शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

नियमापेक्षा अधिक वऱ्हाडी आल्याने लग्न मालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:39 IST

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभासाठी प्रशासनाने केवळ ५० जणांना परवानगी दिली असताना ७० हून अधिक वऱ्हाडी मंडळी आल्याने ...

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभासाठी प्रशासनाने केवळ ५० जणांना परवानगी दिली असताना ७० हून अधिक वऱ्हाडी मंडळी आल्याने ठोसेघर येथील लग्न मालकावर सातारा तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अप्पाजी भगवंत चव्हाण (रा. ठोसेघर, ता. सातारा), यशवंत खाशाबा जाधव (रा. घोटेवाडी, ता. पाटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक हेमंत ननावरे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने लग्नात केवळ पन्नास लोकांना उपस्थितीचा नियम लागू केला आहे; परंतु त्याची अंमलबजावणी न करता सर्रास नियमांची पायमल्ली होत असल्याने कडक कारवाईच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दि. ३ रोजी ठोसेघर (ता.सातारा) येथे संशयितांनी त्यांच्या मुलांचा लग्न समारंभ आयोजित केला होता. त्या सोहळ्याला केवळ ५० लोकांची परवानगी असतानादेखील ७० हून अधिक लोकांची गर्दी जमल्याची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस नाईक हेमंत ननावरे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. ननावरे यांनी ठोसेघर येथे जाऊन गर्दीबाबत मिळालेल्या माहितीची खात्री करून दोघांवर गुन्हा दाखल केला.