शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्या १६ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:39 IST

सातारा : कोरोना महामारीत सातारा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला आहे. अशा परिस्थितीतही त्याचे उल्लंघन अनेकांकडून होत असल्यामुळे ...

सातारा : कोरोना महामारीत सातारा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला आहे. अशा परिस्थितीतही त्याचे उल्लंघन अनेकांकडून होत असल्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विनाकारण, विनापरवाना तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर कमानी हौद, मोती चौक, शाहू चौक, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात सातारा शहर पोलीस आणि शाहूपुरी पोलिसांनी १६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

कमानी हौद परिसरात असणारे ताज एक्स्प्रेस नावाची आस्थापना सुरू ठेवल्याप्रकरणी समीर शरीफ शेख (वय २४, रा. गुरुवार पेठ, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल विशाल धुमाळ यांनी याची तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करत आहेत.

कमानी हौद परिसरात विनाकारण, विनापरवाना फिरणाऱ्या अरबाज सिराज शेख (वय २५, रा. गुरुवार पेठ, सातारा), हज्जेप फय्याज शेख (वय १८, रा. गुरुवार पेठ, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक अविनाश चव्हाण यांनी याची तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करत आहेत.

साताऱ्यातील शाहू चौकात विनाकारण फिरणाऱ्या कौस्तुभ चंद्रकांत खरे (वय २७, रा. गजानन सोसायटी बंगला, पी. डी. पाटीलनगर, कराड), ओंकार अशोक माने (वय २३, रा. मंगळवार पेठ, सातारा), अक्षय दिलीप पाटील (वय २०, रा. रविवार पेठ, कराड), किरण गुलाब गावित (वय ३०, रा. विद्यानगर, कराड), विक्रम पोपट जाधव (वय ३४, रा. डोराम हौसिंग सोसायटी, कोडोली, सातारा) या पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार दीपक कांबळे यांनी याची तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करत आहेत.

शाहू चौकात फिरणाऱ्या सौरभ राजेंद्र जाधव (वय २१, रा. गोवे, ता. सातारा), निरंजन रविकांत भंवर (रा. लिंब, ता. सातारा), अर्जुन मानसिंग शिंदे (वय २७, रा. लिंब, ता. सातारा), विशाल अरुण जाधव (वय २२, रा. लिंब, ता. सातारा) या चौघांवर गुन्हा दाखल झाला आह. पोलीस हवालदार दीपक कांबळे यांनी याची तक्रार दिली आहे. पोलीस हवालदार कारळे अधिक तपास करत आहेत.

सातारा वाहतूक शाखेचे सहायक फौजदार बाबासाहेब पवार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर विनाकारण फिरणाऱ्या संतोष यशवंत राऊत (वय ३५, रा. आरेदरे, ता. सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करत आहेत.

बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात विनाकारण, विनापरवाना फिरणाऱ्या अभिषेक जितेंद्र शिवदास (रा. सत्यमनगर, सातारा), जयराम मिर्झाराम वर्मा (रा. दौलतनगर, सातारा), दिनेश नामदेव माने (रा. आदित्यनगरी, सातारा) या तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक उदयसिंह जाधव यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करत आहेत.