शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

उदयनराजेंवर षडयंत्र रचून गुन्हा

By admin | Updated: April 28, 2017 00:54 IST

समर्थकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : खोटे गुन्हे रचणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर षडयंत्र रचून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे खोटे गुन्हे रचणाऱ्यांच्या गेल्या महिनाभरातील वर्तणुकीची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच संबंधितांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे समर्थकांकडून करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘संबंधित गुन्हा दि. १८ मार्च रोजी घडला तर गुन्हा नोंद दि. २३ मार्चला झाला. हा गुन्हा नोंद करण्यासाठी राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी संबंधितांवर आपल्या पदाचा गैरवापर करून गुन्हा दाखल करण्यासाठी प्रचंड दबाव टाकल्याची निश्चित व ठोस माहिती प्राप्त झाली आहे. त्याप्रमाणे पुरावेही आहेत. त्यातच रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ‘आजपर्यंत दोन कामाला लावले आहेत, दोन अजून बाकी आहेत,’ अशी टिप्पणी केल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, सातारा जिल्ह्याची शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणारी आहे. विधान परिषदेच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीच चिथावणीखोर वक्तव्य करून शांतता, सुव्यवस्था धोक्यात आणत असेल तर अशा व्यक्तीला अशा पदावर बसण्याचा कायद्याने कोणताही हक्क नाही. अशा व्यक्तीच्या वक्तव्याची पोलिस प्रशासनाने माहिती घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचा गुन्हा तातडीने दाखल करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित वक्तव्याची राज्य शासनाने दखल घेऊन अशा बेजबाबदार व्यक्तीस त्या पदावरून तातडीने निलंबित करावे. रामराजे यांच्या उद्गारानुसार दोनपैकी एक व्यक्ती म्हणजे उदयनराजे भोसले आणि दुसरी व्यक्ती आमदार जयकुमार गोरे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात समाजसेवा करणाऱ्या सर्वच लोकप्रतिनिधींमध्ये निश्चित स्वरुपात भीती निर्माण झाली आहे. असे वक्तव्य करून रामराजे यांनी लोकशाहीला काळिमाही फासण्याचे काम केले आहे. १९९९ मध्ये उदयनराजे भोसले यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे कारस्थान अभयसिंहराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रचले होते. त्यावेळी सुमारे २२ महिन्यांपेक्षा अधिक काळ खासदार उदयनराजे भोसले यांना विनाकारण प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. मात्र, न्यायव्यवस्थेकडून याबाबत योग्य निवाडा दिला गेला होता. षडयंत्र रचून त्याद्वारे एखाद्याचे राजकीय खच्चीकरण करणे यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. असले घृणास्पद प्रकार राज्याच्या विधिमंडळातील अति उच्चपदस्थ व्यक्ती करीत असेल तर त्यांनी त्या पदावर राहण्याचा नैतिक हक्क गमावला आहे. या मोर्चात नगराध्यक्षा माधवी कदम, सुनील काटकर, अ‍ॅड. डी. जी. बनकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, किशोर शिंदे, सुहास राजेशिर्के, सुनील सावंत, बाळासाहेब गोसावी आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)