शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भूकमुक्त भारत बनवायचाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 23:01 IST

कºहाड : ‘योगशास्त्रात जसे योगासनांना महत्त्व आहे. तसेच निरोगी शरीरासाठी योग्य आहारही महत्त्वाचा आहे. कारण त्यामुळे दीर्घायुष्य लाभत असते. आज भारतात अतिरिक्त आहारामुळे खूप व्यक्ती आजारी पडतात. तर काही भुकेमुळे मृत्यू पावतात. या देशातील एकही व्यक्ती आजारी व भुकेने मरता कामा नये, असा देश बनवायचे स्वप्न पाहतो आहे. त्यासाठी सर्वांनी ...

कºहाड : ‘योगशास्त्रात जसे योगासनांना महत्त्व आहे. तसेच निरोगी शरीरासाठी योग्य आहारही महत्त्वाचा आहे. कारण त्यामुळे दीर्घायुष्य लाभत असते. आज भारतात अतिरिक्त आहारामुळे खूप व्यक्ती आजारी पडतात. तर काही भुकेमुळे मृत्यू पावतात. या देशातील एकही व्यक्ती आजारी व भुकेने मरता कामा नये, असा देश बनवायचे स्वप्न पाहतो आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असे मत योगगुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केले.कºहाड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवसीय योगचिकित्सा व ध्यान शिबिर सुरू आहे. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी रविवारी महिला महासंमेलन व विशेष शिबिर पार पडले. याप्रसंगी योगगुरू रामदेव बाबा बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार राजेंद्र शेळके, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पतंजली योगपीठाचे केंद्र्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य, पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी बापू पाडळकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी श्वेता सिंघल म्हणाल्या, ‘योगगुरू रामदेव बाबा यांचे सातारा जिल्ह्यातील कºहाड येथे तीन दिवसीय योगचिकित्सा व ध्यान शिबिर होत आहे. योगासनाबाबत व योगशास्त्रातील महत्त्वाच्या गोष्टींविषयी रामदेव बाबा या ठिकाणी येऊन नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. योगशास्त्राला अनन्यसाधारण महत्व आहे.’रामदेव बाबा म्हणाले, ‘आजच्या काळात कुटुंबातील व्यक्ती व प्रत्येकामध्ये ताणतणाव वाढत चालला आहे. याचे कारण म्हणजे नकारात्मक दृष्टिकोनातून विचार करणे होय. आयुष्य हे ईश्वराने दिलेली अमूल्य देणगी आहे. त्याला आनंदाने व प्रसन्नतेने जगा. सर्व दु:ख, प्रश्न बाजूला ठेवून हसत राहण्याचा प्रयत्न करा. येणाºया संकटांना सकारात्मकतेने विचार करून सामोरे जा. म्हणजे प्रत्येक संकट, प्रश्न तुम्हाला सहजरितीने सोडविता येतील.’महिलांनी आपल्या आहाराबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांनी नियमित योगासने, शुद्ध आहार तसेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगावे. नियमित योगासने करावीत. योगासने करणारी व्यक्ती नेहमी आरोग्यदायी जीवन जगत असते. तिला दीर्घायुष्य लाभले. सध्या शरीरातील जाडीमुळे अनेक आजार व विकारांना सामोरे जावे लागत आहे. हे टाळण्यासाठी योगासने व आहारातील बदल यांचा नियमित अवलंब करावा.यावेळी रामदेव बाबा यांनी उपस्थित हजारो महिलांना योगसाधना व आहाराविषयी मार्गदर्शन करण्याबरोबर भक्तीसंगीताच्या सुरावटींवर योगासनांची प्रात्यक्षिकेही सादर करून दाखविली.महिला महासंमेलन व विशेष शिबिरात कºहाडसह परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या. प्रतिष्ठित मान्यवरांनीही शिबिराला उपस्थिती योगसाधना केली.नियमित योगाने कॅन्सरवरही मातदमा, कॅन्सर, लठ्ठपणा यासारख्या व्याधी टाळायच्या असतील तर नियमितपणे योग करणे आवश्यक आहे. योगामुळे या गोष्टींवर नियंत्रण आणता येते. त्यामुळे शरीर निरोगी राखायचे असेल तर नियमित योगा करावा, असेही रामदेव बाबा यांनी आयोजित विशेष शिबिराप्रसंगी सांगितले.