शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भूकमुक्त भारत बनवायचाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 23:01 IST

कºहाड : ‘योगशास्त्रात जसे योगासनांना महत्त्व आहे. तसेच निरोगी शरीरासाठी योग्य आहारही महत्त्वाचा आहे. कारण त्यामुळे दीर्घायुष्य लाभत असते. आज भारतात अतिरिक्त आहारामुळे खूप व्यक्ती आजारी पडतात. तर काही भुकेमुळे मृत्यू पावतात. या देशातील एकही व्यक्ती आजारी व भुकेने मरता कामा नये, असा देश बनवायचे स्वप्न पाहतो आहे. त्यासाठी सर्वांनी ...

कºहाड : ‘योगशास्त्रात जसे योगासनांना महत्त्व आहे. तसेच निरोगी शरीरासाठी योग्य आहारही महत्त्वाचा आहे. कारण त्यामुळे दीर्घायुष्य लाभत असते. आज भारतात अतिरिक्त आहारामुळे खूप व्यक्ती आजारी पडतात. तर काही भुकेमुळे मृत्यू पावतात. या देशातील एकही व्यक्ती आजारी व भुकेने मरता कामा नये, असा देश बनवायचे स्वप्न पाहतो आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असे मत योगगुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केले.कºहाड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवसीय योगचिकित्सा व ध्यान शिबिर सुरू आहे. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी रविवारी महिला महासंमेलन व विशेष शिबिर पार पडले. याप्रसंगी योगगुरू रामदेव बाबा बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार राजेंद्र शेळके, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पतंजली योगपीठाचे केंद्र्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य, पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी बापू पाडळकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी श्वेता सिंघल म्हणाल्या, ‘योगगुरू रामदेव बाबा यांचे सातारा जिल्ह्यातील कºहाड येथे तीन दिवसीय योगचिकित्सा व ध्यान शिबिर होत आहे. योगासनाबाबत व योगशास्त्रातील महत्त्वाच्या गोष्टींविषयी रामदेव बाबा या ठिकाणी येऊन नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. योगशास्त्राला अनन्यसाधारण महत्व आहे.’रामदेव बाबा म्हणाले, ‘आजच्या काळात कुटुंबातील व्यक्ती व प्रत्येकामध्ये ताणतणाव वाढत चालला आहे. याचे कारण म्हणजे नकारात्मक दृष्टिकोनातून विचार करणे होय. आयुष्य हे ईश्वराने दिलेली अमूल्य देणगी आहे. त्याला आनंदाने व प्रसन्नतेने जगा. सर्व दु:ख, प्रश्न बाजूला ठेवून हसत राहण्याचा प्रयत्न करा. येणाºया संकटांना सकारात्मकतेने विचार करून सामोरे जा. म्हणजे प्रत्येक संकट, प्रश्न तुम्हाला सहजरितीने सोडविता येतील.’महिलांनी आपल्या आहाराबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांनी नियमित योगासने, शुद्ध आहार तसेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगावे. नियमित योगासने करावीत. योगासने करणारी व्यक्ती नेहमी आरोग्यदायी जीवन जगत असते. तिला दीर्घायुष्य लाभले. सध्या शरीरातील जाडीमुळे अनेक आजार व विकारांना सामोरे जावे लागत आहे. हे टाळण्यासाठी योगासने व आहारातील बदल यांचा नियमित अवलंब करावा.यावेळी रामदेव बाबा यांनी उपस्थित हजारो महिलांना योगसाधना व आहाराविषयी मार्गदर्शन करण्याबरोबर भक्तीसंगीताच्या सुरावटींवर योगासनांची प्रात्यक्षिकेही सादर करून दाखविली.महिला महासंमेलन व विशेष शिबिरात कºहाडसह परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या. प्रतिष्ठित मान्यवरांनीही शिबिराला उपस्थिती योगसाधना केली.नियमित योगाने कॅन्सरवरही मातदमा, कॅन्सर, लठ्ठपणा यासारख्या व्याधी टाळायच्या असतील तर नियमितपणे योग करणे आवश्यक आहे. योगामुळे या गोष्टींवर नियंत्रण आणता येते. त्यामुळे शरीर निरोगी राखायचे असेल तर नियमित योगा करावा, असेही रामदेव बाबा यांनी आयोजित विशेष शिबिराप्रसंगी सांगितले.