शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

सुशासन निर्माण करण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘सुशासन निर्माण होण्यासाठी सर्वच पातळ्यांवर जनता आणि प्रशासनातील समन्वय खूप महत्त्वाचा आहे,’ असे प्रतिपादन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : ‘सुशासन निर्माण होण्यासाठी सर्वच पातळ्यांवर जनता आणि प्रशासनातील समन्वय खूप महत्त्वाचा आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी रविवारी केले.

दरवर्षी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘सुशासन दिवस’ साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर उपमुख्य कार्यकारी जाधव बोलत होते. ते म्हणाले, ‘सर्वस्पर्शी विकास आणि समन्वयाचा मोठा संबंध आहे. जनता आणि प्रशासनामध्ये सुसंवाद असेल तर सुशासन निर्माण होणे अत्यंत सुलभ होते. जबाबदार प्रशासन आणि सर्वस्पर्शी विकास यांचाही घनिष्ठ संबंध आहे. यामध्ये नागरिकांना जास्तीत जास्त सहभागी करून घेणे हे सुशासन दिवसामागील उद्दिष्ट आहे. तसेच सुनियोजित उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य मार्ग निवडून सामूहिक प्रयत्न करणे म्हणजेच प्रशासन होय. अशा प्रकारचे लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. त्याचबरोबर प्रशासनात सुलभता आणि पारदर्शकता येणे महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टींमधून समाजातील सर्व घटकांचा विकास साधला जातो.’

‘नागरिक, शासन आणि प्रशासन हा त्रिकोण जास्तीत जास्त सशक्त करणे गरजेचे असून त्या दृष्टीने जिल्हा परिषद कायम कार्यरत असते. अधिकारी आणि कर्मचारी सर्व प्रकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. उपक्रमशीलता आणि सातत्य हे सातारा जिल्हा परिषदेचे वैशिष्ट्य आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी गतिमान प्रशासनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत,’ असेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी स्पष्ट केले.

....................................................................