शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सुशासन निर्माण करण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘सुशासन निर्माण होण्यासाठी सर्वच पातळ्यांवर जनता आणि प्रशासनातील समन्वय खूप महत्त्वाचा आहे,’ असे प्रतिपादन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : ‘सुशासन निर्माण होण्यासाठी सर्वच पातळ्यांवर जनता आणि प्रशासनातील समन्वय खूप महत्त्वाचा आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी रविवारी केले.

दरवर्षी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘सुशासन दिवस’ साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर उपमुख्य कार्यकारी जाधव बोलत होते. ते म्हणाले, ‘सर्वस्पर्शी विकास आणि समन्वयाचा मोठा संबंध आहे. जनता आणि प्रशासनामध्ये सुसंवाद असेल तर सुशासन निर्माण होणे अत्यंत सुलभ होते. जबाबदार प्रशासन आणि सर्वस्पर्शी विकास यांचाही घनिष्ठ संबंध आहे. यामध्ये नागरिकांना जास्तीत जास्त सहभागी करून घेणे हे सुशासन दिवसामागील उद्दिष्ट आहे. तसेच सुनियोजित उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य मार्ग निवडून सामूहिक प्रयत्न करणे म्हणजेच प्रशासन होय. अशा प्रकारचे लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. त्याचबरोबर प्रशासनात सुलभता आणि पारदर्शकता येणे महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टींमधून समाजातील सर्व घटकांचा विकास साधला जातो.’

‘नागरिक, शासन आणि प्रशासन हा त्रिकोण जास्तीत जास्त सशक्त करणे गरजेचे असून त्या दृष्टीने जिल्हा परिषद कायम कार्यरत असते. अधिकारी आणि कर्मचारी सर्व प्रकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. उपक्रमशीलता आणि सातत्य हे सातारा जिल्हा परिषदेचे वैशिष्ट्य आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी गतिमान प्रशासनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत,’ असेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी स्पष्ट केले.

....................................................................