शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बक्कळ पाणी खळाळलं; कर्मानं वाहून गेलं!

By admin | Updated: November 22, 2014 00:20 IST

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : वाया जाणारे पाणी आडविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज

दहिवडी : माण नदीला सध्या बऱ्यापैकी पाणी असून, हे वाहून जाणारे पाणी अडवणे गरजेचे आहे. नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यावर लोखंडी फळ्या बसवल्या नाहीत आणि ज्या बंधाऱ्यांना लोखंडी फळ्या बसवल्यात त्यातून पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याने निसर्गाने दिले अन् कर्माने नेहले, अशी परिस्थिती माण तालुक्यात आहे. याची देखरेख पाटबंधारे विभागाकडे आहे. मात्र, हा विभाग लक्षच देत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. या आठवड्यात जर व्यवस्थित फळ्या बसवल्या नाहीत, तर पाटबंधाऱ्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर पडू देणार नाही, असा इशारा नदीकाठच्या लोकांनी, शेतकऱ्यांनी दिला आहे.यावर्षी चांगल्या पर्जन्यमानामुळे माण तालुक्यात असणारे ब्रिटिशकालीन तलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, नाला बांध, नदी, ओढे यामध्ये चांगल्या प्रमाणात पाणीसाठा झाला होता. त्यानंतर पावसाने विश्रांती दिली. या विश्रांतीमुळे माणमधील नदी, ओढ्यांचे पाणीपातळी कमी झाली. प्रामुख्याने ज्वारी पिकाला पाणी देणे सुरू असल्याने शेतकरी त्या कामात होत. मात्र,चांगल्या पावसाने हजेरी लावल्याने कमी झालेला पाणीसाठा वाढला आणि नदीला चांगल्याप्रकारे पाणी वाहू लागले. या नदीवर पाणी अडविण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून, आॅक्टोबर महिन्यानंतर या बंधाऱ्यांना लोखंडी फळ्या बसवून पाणीसाठा केला जातो. सध्या नोव्हेंबर महिन्याचा अर्धा काळ संपला तरी अनेक ठिकाणी पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यात लोखंडी फळ्या बसवल्या नाहीत. ज्या ठिकाणी बसवल्या तिचे पाणी लिकेज होऊन वाया जात आहे. मग काय उपयोग म्हणून चांगल्या पद्धतीने फळ्या बसवल्यास पाणीसाठा होऊन विहिरींच्या पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होईल. गोंदवले खुर्द येथे ज्योतिबा मंदिराशेजारी असणाऱ्या बंधाऱ्यात फळ्या टाकण्याचे काम सुरू असताना काही शेतकऱ्यांनी संबंधित विभागाने ठेका दिलेल्या कामगारांना फळ्या व्यवस्थित बसवा, अशी विनंती केली. तेव्हा त्या कर्मचाऱ्यांनी तिथल्या ‘शेतकऱ्यांना आम्हाला सांगू नका, तुम्ही निघायचे बघा,’ असा सल्ला दिला. यात चांगली वादावादी झाली. तरीसुध्दा या कर्मचाऱ्यांनी लोखंडी फळ्या व्यवस्थित न बसवल्याने पाणी वाया जाणे सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. (वार्ताहर)‘बंधाऱ्यांना लोखंडी फळ्या बसवण्याचे काम सुरू असून, हे काम विटा (सांगली) येथील मजूर संस्थेला देण्यात आले आहे. कर्मचारी कमी असतानासुध्दा आम्ही व्यवस्थित लक्ष देत आहोत. लोकांनी शेतकऱ्यांनी सुद्धा सहकार्य करावे.’ - ए. डी. खारतुडे पाटबंधारे कार्यालयाचे प्रमुख