शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेचे दरवाजे दुसऱ्यांदा बंद; वीज गृहातूनच विसर्ग.. 

By नितीन काळेल | Updated: August 31, 2024 20:13 IST

पावसाची उघडझाप : आवक कमी; नवजाला ९, तर महाबळेश्वरला २ मिलिमीटरची नोंद 

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू असल्याने धरणातही आवक कमी झाली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोयना धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा बंद करून विसर्ग थांबविण्यात आला. सध्या फक्त पायथा वीज गृहातूनच पाणी सोडण्यात येत आहे. तर २४ तासांत नवाजाला ९, तर महाबळेश्वर येथे २ मिलिमीटर पर्जन्यमान झाले.

जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत आहे. जुलै महिन्यात सर्वाधिक पर्जन्यमान झाले. पश्चिम भागात अनेक दिवस एकसारखा पाऊस होत होता. यामुळे सर्वच धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. परिणामी, धरणे ८० टक्क्यांवर भरली होती. तर पूर्व भागातही पावसाचे प्रमाण चांगले राहिले. यामुळे यंदा पाऊसमान चांगले राहिल्याने सर्वत्रच आनंदाचे वातावरण आहे. त्यातच ऑगस्ट महिन्याच्या मध्यानंतरही जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान झाले. विशेष करून पश्चिमेकडील सातारा, पाटण, वाई, जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यात अधिक पाऊस झाला. कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडीसारखी धरणे भरल्यातच जमा आहेत. त्यामुळे वर्षभराची चिंता मिटलेली आहे. त्यातच मागील आठवड्यात जोरदार झालेल्या पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. काही भागातच उघडझाप सुरू आहे. यामुळे धरणांत आवक कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ४ हजार ९७६ मिलिमीटर पाऊस पडला. तसेच मागील तीन महिन्यांत नवजा येथे ५ हजार ८४० आणि महाबळेश्वरला ५ हजार ६४९ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटली. शनिवारी सकाळच्या सुमारास धरणात १० हजार ७२१ क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरण भरण्यासाठी पाण्याची गरज आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सर्व सहा दरवाजे सकाळी आठ वाजता बंद करण्यात आले. त्यामुळे विसर्ग थांबला आहे. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून, त्यातून २ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर कोयना धरणात १०३.५२ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

प्रमुख सहा धरणांत १४६ टीएमसी पाणीसाठा...जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही मोठी धरणे आहेत. या धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सध्या या धरणांत एकूण १४५.९५ टीएमसी साठा झाला आहे. धोम धरणात १३.१६, बलकवडी ३.९२, कण्हेरमध्ये ९.८३, तारळीत ५.७५ आणि उरमोडी धरणात ९.८७ टीएमसी साठा आहे. ही धरणे भरल्यात जमा आहेत.

टॅग्स :Koyana Damकोयना धरण