शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

कोयनेचे दरवाजे दुसऱ्यांदा बंद; वीज गृहातूनच विसर्ग.. 

By नितीन काळेल | Updated: August 31, 2024 20:13 IST

पावसाची उघडझाप : आवक कमी; नवजाला ९, तर महाबळेश्वरला २ मिलिमीटरची नोंद 

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू असल्याने धरणातही आवक कमी झाली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोयना धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा बंद करून विसर्ग थांबविण्यात आला. सध्या फक्त पायथा वीज गृहातूनच पाणी सोडण्यात येत आहे. तर २४ तासांत नवाजाला ९, तर महाबळेश्वर येथे २ मिलिमीटर पर्जन्यमान झाले.

जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत आहे. जुलै महिन्यात सर्वाधिक पर्जन्यमान झाले. पश्चिम भागात अनेक दिवस एकसारखा पाऊस होत होता. यामुळे सर्वच धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. परिणामी, धरणे ८० टक्क्यांवर भरली होती. तर पूर्व भागातही पावसाचे प्रमाण चांगले राहिले. यामुळे यंदा पाऊसमान चांगले राहिल्याने सर्वत्रच आनंदाचे वातावरण आहे. त्यातच ऑगस्ट महिन्याच्या मध्यानंतरही जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान झाले. विशेष करून पश्चिमेकडील सातारा, पाटण, वाई, जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यात अधिक पाऊस झाला. कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडीसारखी धरणे भरल्यातच जमा आहेत. त्यामुळे वर्षभराची चिंता मिटलेली आहे. त्यातच मागील आठवड्यात जोरदार झालेल्या पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. काही भागातच उघडझाप सुरू आहे. यामुळे धरणांत आवक कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ४ हजार ९७६ मिलिमीटर पाऊस पडला. तसेच मागील तीन महिन्यांत नवजा येथे ५ हजार ८४० आणि महाबळेश्वरला ५ हजार ६४९ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटली. शनिवारी सकाळच्या सुमारास धरणात १० हजार ७२१ क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरण भरण्यासाठी पाण्याची गरज आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सर्व सहा दरवाजे सकाळी आठ वाजता बंद करण्यात आले. त्यामुळे विसर्ग थांबला आहे. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून, त्यातून २ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर कोयना धरणात १०३.५२ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

प्रमुख सहा धरणांत १४६ टीएमसी पाणीसाठा...जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही मोठी धरणे आहेत. या धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सध्या या धरणांत एकूण १४५.९५ टीएमसी साठा झाला आहे. धोम धरणात १३.१६, बलकवडी ३.९२, कण्हेरमध्ये ९.८३, तारळीत ५.७५ आणि उरमोडी धरणात ९.८७ टीएमसी साठा आहे. ही धरणे भरल्यात जमा आहेत.

टॅग्स :Koyana Damकोयना धरण