शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

कोयनेचे दरवाजे दुसऱ्यांदा बंद; वीज गृहातूनच विसर्ग.. 

By नितीन काळेल | Updated: August 31, 2024 20:13 IST

पावसाची उघडझाप : आवक कमी; नवजाला ९, तर महाबळेश्वरला २ मिलिमीटरची नोंद 

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू असल्याने धरणातही आवक कमी झाली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोयना धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा बंद करून विसर्ग थांबविण्यात आला. सध्या फक्त पायथा वीज गृहातूनच पाणी सोडण्यात येत आहे. तर २४ तासांत नवाजाला ९, तर महाबळेश्वर येथे २ मिलिमीटर पर्जन्यमान झाले.

जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत आहे. जुलै महिन्यात सर्वाधिक पर्जन्यमान झाले. पश्चिम भागात अनेक दिवस एकसारखा पाऊस होत होता. यामुळे सर्वच धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. परिणामी, धरणे ८० टक्क्यांवर भरली होती. तर पूर्व भागातही पावसाचे प्रमाण चांगले राहिले. यामुळे यंदा पाऊसमान चांगले राहिल्याने सर्वत्रच आनंदाचे वातावरण आहे. त्यातच ऑगस्ट महिन्याच्या मध्यानंतरही जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान झाले. विशेष करून पश्चिमेकडील सातारा, पाटण, वाई, जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यात अधिक पाऊस झाला. कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडीसारखी धरणे भरल्यातच जमा आहेत. त्यामुळे वर्षभराची चिंता मिटलेली आहे. त्यातच मागील आठवड्यात जोरदार झालेल्या पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. काही भागातच उघडझाप सुरू आहे. यामुळे धरणांत आवक कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ४ हजार ९७६ मिलिमीटर पाऊस पडला. तसेच मागील तीन महिन्यांत नवजा येथे ५ हजार ८४० आणि महाबळेश्वरला ५ हजार ६४९ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटली. शनिवारी सकाळच्या सुमारास धरणात १० हजार ७२१ क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरण भरण्यासाठी पाण्याची गरज आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सर्व सहा दरवाजे सकाळी आठ वाजता बंद करण्यात आले. त्यामुळे विसर्ग थांबला आहे. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून, त्यातून २ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर कोयना धरणात १०३.५२ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

प्रमुख सहा धरणांत १४६ टीएमसी पाणीसाठा...जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही मोठी धरणे आहेत. या धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सध्या या धरणांत एकूण १४५.९५ टीएमसी साठा झाला आहे. धोम धरणात १३.१६, बलकवडी ३.९२, कण्हेरमध्ये ९.८३, तारळीत ५.७५ आणि उरमोडी धरणात ९.८७ टीएमसी साठा आहे. ही धरणे भरल्यात जमा आहेत.

टॅग्स :Koyana Damकोयना धरण