शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

शेणकूट करणार पशु-पक्ष्यांपासून पिकांची राखण

By admin | Updated: March 28, 2016 00:06 IST

उदरनिवार्हासाठी प्रामुख्याने मुख्य शेती व्यवसायाला जोडून पशुपालनही केले जाते

साताऱ्याच्या पश्चिमेकडील कास परिसरात पर्जन्याचे प्रमाण जास्त असल्याने परिसरातील शेतकरी भात, नाचणी, वरी यासारखी पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. परिसरात मोठ्या प्रमाणावर डोंगरी भाग व जंगल असल्याने पशुपक्ष्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असते. त्यांच्यापासून पिकांची राखण करण्यासाठी शेतकरी महिला शेणकूट थापण्यात गुंतल्या आहेत. पीक तोडणीला आल्यानंतर शेणकूट पेटवल्या जातात. त्यामुळे धूर झाल्यामुळे पक्षी येत नाहीत. तसेच धुरामुळे जाळ झाला असावा, असा समज झाल्याने प्राणीही तिकडे फिरकत नाहीत, असा शेतकऱ्यांचा समज आहे. उदरनिवार्हासाठी प्रामुख्याने मुख्य शेती व्यवसायाला जोडून पशुपालनही केले जाते. घरातील बहुतांशी लोक परगावी कामानिमित्त आहे. सर्रास लोकांना गॅस परवडणारा नसल्याने घरगुती वापरात चुली मोठ्या प्रमाणावर वापरतात. यासाठी तयार होणाऱ्या विस्तवासाठी गोठ्यातील शेण गोळा करून एका मोठ्या खडकावर, जमिनीवर तसेच कठड्यांवर शेणकुट्या थापतात. उन्हात वाळवून पावसाळ्याची सोय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या शेणकुट्या रचल्या जातात. या थरालाच ग्रामीण भागात शेणारा म्हटले जाते. बहुतांशी प्रत्येकाच्या घरासमोर अथवा रानात शेणारा रचला जातो. प्रामुख्याने या शेणकुटीचा वापर घरगुती वापरात स्वयंपाक व बंबासाठी फारच उपयुक्त असून, यात वापरल्या गेलेल्या भुशामुळे उष्णता फार काळ टिकण्यास मदत होते.उन्हाळ्याला सुरुवात होताच पावसाळ्यासाठी शेणाऱ्यासाठी शेणकुट्या थापण्यासाठी शेतकरी महिलांची लगबग दिसून येते आहे. भरउन्हात शेणारा तयार करण्यासाठी कष्टाने राबलेले हात अवकाळी पावसाने केलेले कष्ट व्यर्थ जाऊ नयेत, यासाठी हे शेणारे ताडपत्री अथवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवतात. किमान एका शेणाऱ्यात पाचशे ते हजार शेणकुट्या रचल्या जातात. तसेच आपल्याला गरजेपुरती शेणकुटे शिल्लक ठेवून लोकांच्या मागणीनुसार विकल्या जातात. साधारण वीस ते पंचवीस शेणकुट्या असणारे एक पोते साठ रुपयांना विकले जाते.- बाबूराव भोसलेसध्या घरगुती वापरात चुली अथवा विस्तवासाठी रानटी शेणकुटी वापरली जाते. कष्टाने पिकवलेल्या पिकांच्या संरक्षणासाठी रानात धुरी करण्यासाठी शेणकुट्यांचा वापर केला जातो. यावेळी एकापाठोपाठ शेणकुट्या रचून त्यावर भुसा टाकून रात्रभर ही धुरी पेटत राहते. यामुळे वन्य पशुपक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण होते.- ज्ञानेश्वर आखाडे, शेतकरी कुसुंबीमुरा