शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

शेणकूट करणार पशु-पक्ष्यांपासून पिकांची राखण

By admin | Updated: March 28, 2016 00:06 IST

उदरनिवार्हासाठी प्रामुख्याने मुख्य शेती व्यवसायाला जोडून पशुपालनही केले जाते

साताऱ्याच्या पश्चिमेकडील कास परिसरात पर्जन्याचे प्रमाण जास्त असल्याने परिसरातील शेतकरी भात, नाचणी, वरी यासारखी पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. परिसरात मोठ्या प्रमाणावर डोंगरी भाग व जंगल असल्याने पशुपक्ष्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असते. त्यांच्यापासून पिकांची राखण करण्यासाठी शेतकरी महिला शेणकूट थापण्यात गुंतल्या आहेत. पीक तोडणीला आल्यानंतर शेणकूट पेटवल्या जातात. त्यामुळे धूर झाल्यामुळे पक्षी येत नाहीत. तसेच धुरामुळे जाळ झाला असावा, असा समज झाल्याने प्राणीही तिकडे फिरकत नाहीत, असा शेतकऱ्यांचा समज आहे. उदरनिवार्हासाठी प्रामुख्याने मुख्य शेती व्यवसायाला जोडून पशुपालनही केले जाते. घरातील बहुतांशी लोक परगावी कामानिमित्त आहे. सर्रास लोकांना गॅस परवडणारा नसल्याने घरगुती वापरात चुली मोठ्या प्रमाणावर वापरतात. यासाठी तयार होणाऱ्या विस्तवासाठी गोठ्यातील शेण गोळा करून एका मोठ्या खडकावर, जमिनीवर तसेच कठड्यांवर शेणकुट्या थापतात. उन्हात वाळवून पावसाळ्याची सोय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या शेणकुट्या रचल्या जातात. या थरालाच ग्रामीण भागात शेणारा म्हटले जाते. बहुतांशी प्रत्येकाच्या घरासमोर अथवा रानात शेणारा रचला जातो. प्रामुख्याने या शेणकुटीचा वापर घरगुती वापरात स्वयंपाक व बंबासाठी फारच उपयुक्त असून, यात वापरल्या गेलेल्या भुशामुळे उष्णता फार काळ टिकण्यास मदत होते.उन्हाळ्याला सुरुवात होताच पावसाळ्यासाठी शेणाऱ्यासाठी शेणकुट्या थापण्यासाठी शेतकरी महिलांची लगबग दिसून येते आहे. भरउन्हात शेणारा तयार करण्यासाठी कष्टाने राबलेले हात अवकाळी पावसाने केलेले कष्ट व्यर्थ जाऊ नयेत, यासाठी हे शेणारे ताडपत्री अथवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवतात. किमान एका शेणाऱ्यात पाचशे ते हजार शेणकुट्या रचल्या जातात. तसेच आपल्याला गरजेपुरती शेणकुटे शिल्लक ठेवून लोकांच्या मागणीनुसार विकल्या जातात. साधारण वीस ते पंचवीस शेणकुट्या असणारे एक पोते साठ रुपयांना विकले जाते.- बाबूराव भोसलेसध्या घरगुती वापरात चुली अथवा विस्तवासाठी रानटी शेणकुटी वापरली जाते. कष्टाने पिकवलेल्या पिकांच्या संरक्षणासाठी रानात धुरी करण्यासाठी शेणकुट्यांचा वापर केला जातो. यावेळी एकापाठोपाठ शेणकुट्या रचून त्यावर भुसा टाकून रात्रभर ही धुरी पेटत राहते. यामुळे वन्य पशुपक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण होते.- ज्ञानेश्वर आखाडे, शेतकरी कुसुंबीमुरा