शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शेणकूट करणार पशु-पक्ष्यांपासून पिकांची राखण

By admin | Updated: March 28, 2016 00:06 IST

उदरनिवार्हासाठी प्रामुख्याने मुख्य शेती व्यवसायाला जोडून पशुपालनही केले जाते

साताऱ्याच्या पश्चिमेकडील कास परिसरात पर्जन्याचे प्रमाण जास्त असल्याने परिसरातील शेतकरी भात, नाचणी, वरी यासारखी पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. परिसरात मोठ्या प्रमाणावर डोंगरी भाग व जंगल असल्याने पशुपक्ष्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असते. त्यांच्यापासून पिकांची राखण करण्यासाठी शेतकरी महिला शेणकूट थापण्यात गुंतल्या आहेत. पीक तोडणीला आल्यानंतर शेणकूट पेटवल्या जातात. त्यामुळे धूर झाल्यामुळे पक्षी येत नाहीत. तसेच धुरामुळे जाळ झाला असावा, असा समज झाल्याने प्राणीही तिकडे फिरकत नाहीत, असा शेतकऱ्यांचा समज आहे. उदरनिवार्हासाठी प्रामुख्याने मुख्य शेती व्यवसायाला जोडून पशुपालनही केले जाते. घरातील बहुतांशी लोक परगावी कामानिमित्त आहे. सर्रास लोकांना गॅस परवडणारा नसल्याने घरगुती वापरात चुली मोठ्या प्रमाणावर वापरतात. यासाठी तयार होणाऱ्या विस्तवासाठी गोठ्यातील शेण गोळा करून एका मोठ्या खडकावर, जमिनीवर तसेच कठड्यांवर शेणकुट्या थापतात. उन्हात वाळवून पावसाळ्याची सोय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या शेणकुट्या रचल्या जातात. या थरालाच ग्रामीण भागात शेणारा म्हटले जाते. बहुतांशी प्रत्येकाच्या घरासमोर अथवा रानात शेणारा रचला जातो. प्रामुख्याने या शेणकुटीचा वापर घरगुती वापरात स्वयंपाक व बंबासाठी फारच उपयुक्त असून, यात वापरल्या गेलेल्या भुशामुळे उष्णता फार काळ टिकण्यास मदत होते.उन्हाळ्याला सुरुवात होताच पावसाळ्यासाठी शेणाऱ्यासाठी शेणकुट्या थापण्यासाठी शेतकरी महिलांची लगबग दिसून येते आहे. भरउन्हात शेणारा तयार करण्यासाठी कष्टाने राबलेले हात अवकाळी पावसाने केलेले कष्ट व्यर्थ जाऊ नयेत, यासाठी हे शेणारे ताडपत्री अथवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवतात. किमान एका शेणाऱ्यात पाचशे ते हजार शेणकुट्या रचल्या जातात. तसेच आपल्याला गरजेपुरती शेणकुटे शिल्लक ठेवून लोकांच्या मागणीनुसार विकल्या जातात. साधारण वीस ते पंचवीस शेणकुट्या असणारे एक पोते साठ रुपयांना विकले जाते.- बाबूराव भोसलेसध्या घरगुती वापरात चुली अथवा विस्तवासाठी रानटी शेणकुटी वापरली जाते. कष्टाने पिकवलेल्या पिकांच्या संरक्षणासाठी रानात धुरी करण्यासाठी शेणकुट्यांचा वापर केला जातो. यावेळी एकापाठोपाठ शेणकुट्या रचून त्यावर भुसा टाकून रात्रभर ही धुरी पेटत राहते. यामुळे वन्य पशुपक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण होते.- ज्ञानेश्वर आखाडे, शेतकरी कुसुंबीमुरा