शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

शेणकूट करणार पशु-पक्ष्यांपासून पिकांची राखण

By admin | Updated: March 28, 2016 00:06 IST

उदरनिवार्हासाठी प्रामुख्याने मुख्य शेती व्यवसायाला जोडून पशुपालनही केले जाते

साताऱ्याच्या पश्चिमेकडील कास परिसरात पर्जन्याचे प्रमाण जास्त असल्याने परिसरातील शेतकरी भात, नाचणी, वरी यासारखी पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. परिसरात मोठ्या प्रमाणावर डोंगरी भाग व जंगल असल्याने पशुपक्ष्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असते. त्यांच्यापासून पिकांची राखण करण्यासाठी शेतकरी महिला शेणकूट थापण्यात गुंतल्या आहेत. पीक तोडणीला आल्यानंतर शेणकूट पेटवल्या जातात. त्यामुळे धूर झाल्यामुळे पक्षी येत नाहीत. तसेच धुरामुळे जाळ झाला असावा, असा समज झाल्याने प्राणीही तिकडे फिरकत नाहीत, असा शेतकऱ्यांचा समज आहे. उदरनिवार्हासाठी प्रामुख्याने मुख्य शेती व्यवसायाला जोडून पशुपालनही केले जाते. घरातील बहुतांशी लोक परगावी कामानिमित्त आहे. सर्रास लोकांना गॅस परवडणारा नसल्याने घरगुती वापरात चुली मोठ्या प्रमाणावर वापरतात. यासाठी तयार होणाऱ्या विस्तवासाठी गोठ्यातील शेण गोळा करून एका मोठ्या खडकावर, जमिनीवर तसेच कठड्यांवर शेणकुट्या थापतात. उन्हात वाळवून पावसाळ्याची सोय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या शेणकुट्या रचल्या जातात. या थरालाच ग्रामीण भागात शेणारा म्हटले जाते. बहुतांशी प्रत्येकाच्या घरासमोर अथवा रानात शेणारा रचला जातो. प्रामुख्याने या शेणकुटीचा वापर घरगुती वापरात स्वयंपाक व बंबासाठी फारच उपयुक्त असून, यात वापरल्या गेलेल्या भुशामुळे उष्णता फार काळ टिकण्यास मदत होते.उन्हाळ्याला सुरुवात होताच पावसाळ्यासाठी शेणाऱ्यासाठी शेणकुट्या थापण्यासाठी शेतकरी महिलांची लगबग दिसून येते आहे. भरउन्हात शेणारा तयार करण्यासाठी कष्टाने राबलेले हात अवकाळी पावसाने केलेले कष्ट व्यर्थ जाऊ नयेत, यासाठी हे शेणारे ताडपत्री अथवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवतात. किमान एका शेणाऱ्यात पाचशे ते हजार शेणकुट्या रचल्या जातात. तसेच आपल्याला गरजेपुरती शेणकुटे शिल्लक ठेवून लोकांच्या मागणीनुसार विकल्या जातात. साधारण वीस ते पंचवीस शेणकुट्या असणारे एक पोते साठ रुपयांना विकले जाते.- बाबूराव भोसलेसध्या घरगुती वापरात चुली अथवा विस्तवासाठी रानटी शेणकुटी वापरली जाते. कष्टाने पिकवलेल्या पिकांच्या संरक्षणासाठी रानात धुरी करण्यासाठी शेणकुट्यांचा वापर केला जातो. यावेळी एकापाठोपाठ शेणकुट्या रचून त्यावर भुसा टाकून रात्रभर ही धुरी पेटत राहते. यामुळे वन्य पशुपक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण होते.- ज्ञानेश्वर आखाडे, शेतकरी कुसुंबीमुरा