शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दरबारात ग्रामीण जनता जास्त

By admin | Updated: January 25, 2016 00:52 IST

राष्ट्रवादी भवन : ६३ जणांनी मांडल्या समस्या; शशिकांत शिंदे यांच्याकडून विचारपूस

सातारा : कोणाची बदली, घराची नोंद तर कोणाला वीज कनेक्शन मिळत नसल्याने आपल्या तक्रारी घेऊन राष्ट्रवादीच्या जनता दरबारात नागरिकांनी गर्दी केली होती. बहुतांश तक्रारींचा जागच्या जागी निपटारा होत होता, तर काही तक्रारी तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित राहत होत्या; परंतु अशा तक्रारींचे शंभर टक्के निरसन करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक घेण्याचेही ठरत होते. त्यामुळे समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना राष्ट्रवादीच्या जनता दरबारामुळे दिलासा मिळत होता. ग्रामीण भागातून आलेल्या ६३ जणांनी आपल्या समस्या या जनता दरबारात मांडल्या. राष्ट्रवादीचे आमदार व माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. रविवारी सकाळी अकरा वाजता जनता दरबारास सुरुवात झाली. आ. शशिकांत शिंदे आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते. तळेगावधामणी येथे साताऱ्याच्या अभियंता युवतीला बदली पाहिजे होती. त्या विभागातील दुसरे अभियंते इकडे यायला तयार होते. मात्र लालफितीच्या कारभारामुळे त्या युवतीला बदलीसाठी हेलपाटे मारावे लागत होते. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आ. शिंदे यांनी फोनवर चर्चा केल्यानंतर हा प्रश्नही मार्गी लागला. सातारा तालुक्यातील कळंबे येथील एका व्यक्तीला घर नोंद करण्यासाठी ग्रामसेवक टाळाटाळ करत होते. ‘बीडीओं’शी प्रत्यक्षात बोलल्यानंतर घर नोंद होण्याची चिन्हे अखेर त्या व्यक्तीला दिसू लागली. तीन गावांच्या सार्वजनिक रस्त्यांचा वादही या जनता दरबारात चर्चेला गेला. संबंधित अधिकारी आणि गावकऱ्यांच्या बैठकीची वेळ आणि दिवस ठरविण्यात आला. जबरदस्तीने जागा घेतली म्हणून एक महिला आपली तक्रार घेऊन आली होती. संबंधित व्यक्तीशी आणि एका अधिकाऱ्यांशी आ. शिंदे यांनी फोनवर चर्चा केल्यानंतर त्या महिलेला न्याय मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. एका अपार्टमेंटला वीजवितरण कंपनीकडून कनेक्शन मिळत नव्हते. यासाठी अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी होत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे होते. या तक्रारीचे निराकरणही या ठिकाणी तातडीने करण्यात आले. पाच लाख भरल्याशिवाय आॅपरेशन होणार नाही, आमदार फंडातून निधी मिळाला; मात्र टेंडर काढायला आठ महिन्यांचा कालावधी लागला, रहदारीला अडथळा येत असल्याने विद्युत खांब काढावा, अशा प्रकारच्या विविध समस्या घेऊन नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. (प्रतिनिधी)