शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

देशाला शांतीची नव्हे क्रांतीची गरज

By admin | Updated: September 20, 2016 23:47 IST

मनोज कुमार : बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंशी साधला संवाद

सातारा : ‘आज देशात जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती बदलणे अत्यावश्यक आहे. परिस्थिती बदलण्याची जबाबदारी भावी पिढीवर असून, त्यासाठी स्वत: तंदुरुस्त असले पाहिजे. देशाला शांततेची नव्हे तर, क्रांतीची गरज असून ही क्रांती घडवण्यासाठी युवा पिढीने खेळाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत,’ असे आवाहन अर्जुन पुरस्कार विजेते बॉक्सर मनोज कुमार यांनी केले. दरम्यान, आपणही एक मराठा असून, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नितांत आदर असल्याचेही यावेळी सांगितले. जिल्हा क्रीडा संकुलातील बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रातील युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, मानद एनआयएस प्रशिक्षक सागर जगताप, अमर मोकाशी, विभागीय सचिव योगेश मुंदडा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बॉक्सर जयसिंग पाटील यांच्यासमवेत मनोज कुमार यांनी सातारा क्रीडानगरीला भेट दिली. यावेळी सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे व विविध मान्यवरांनी त्यांचे साताऱ्यात स्वागत केले. जयसिंग पाटील यांनी मनोज कुमार यांचा परिचय दिला. मनोज कुमार म्हणाले, ‘सातारा बॉक्सिंग अ‍ॅकॅडमीने गेल्या वर्षभरात केलेली कामगिरी अलौकिक आहे. काहीतरी बनायचे आहे, करिअर करायचे आहे, यासाठी बॉक्सिंग खेळ चांगलाच आहे पण, काहीही करता नाही आले तरी आपले शरीर तंदुरुस्त बनवण्यासाठी बॉक्सिंग सारखा खेळ नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे. आज देशाची परिस्थिती पाहिली की, शिवाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. शिवाजी महाराजांनी मावळ्यांना एक दिशा दिली होती. त्यामुळे एक राष्ट्र निर्माण झाले होते.’ यावेळी त्यांनी खेळाडूंशी मोकळेपणाने गप्पा मारल्या. सातारा बॉक्सिंग अ‍ॅकॅडमीच्या वतीने मनोज कुमार यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. मनोज कुमार यांच्या हस्ते शालेय हॉलीबॉल आणि बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राजेंद्र हेंद्रे, डॉ. राहुल चव्हाण, दौलतराव भोसले, हरीष शेट्टी, रवींद्र होले, प्रा. संभाजी पाटील, प्रा. गुजर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी, क्रीडा शिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)