शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
5
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
6
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
7
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
8
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
9
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
10
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
11
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
12
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
13
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
14
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
15
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
16
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
17
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
18
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
19
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
20
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी

काम सुधारा अन्यथा परिणामांना सामोरे जा

By admin | Updated: December 11, 2014 23:52 IST

रुपाली जाधव : महाविरतणाच्या अधिकाऱ्यांना दिला सज्जड इशारा

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील पिके वाया जाण्याची शक्यता आहे. अपुऱ्या पाणी साठ्यावर पिके जगविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. मात्र महावितरणकडून अघोषित भारनियमनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर व्यापारी बांधावांमध्ये संतापाची भावना असून अधिकाऱ्यांनी आपल्या कारभारात सुधारणा करावी, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा सज्जड इशारा कोरेगाव पंचायत समितीच्या सभापती रुपाली जाधव यांनी दिला आहे.वाठार स्टेशन उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्वच गावांमध्ये सध्या भारनियमनामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. अगोदरच पाणीसाठे अपुरे आहेत. थोडेफार असलेले पाणी शेतकरी पिकांना देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वारंवार वीज खंडीत होत असल्यामुळे पिकांना पाणी पाजणे शेतकऱ्यांना अवघड होत आहे. मुळातच कृषिपंपांना २४ तासांतून केवळ आठ तास वीज दिली जाते, मात्र तो पुरवठाही पूर्णवेळ होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढतच आहेत.पंपोडे बुद्रुक येथे वीज उपकेंद्र आहे. तेथून सोनके, पिंपोडे बुद्रुक, वाठारस्टेशन असे तीन फिडर करून वीज पुरवठा केला जातो. त्यातही घरगुती ग्राहक, व्यापारी, ग्राहकांबरोबर कृषी ग्राहक असे वेगवेगळे दोन विभाग करून भारनियमनाच्या वेळापत्रकाप्रमाणे वीज दिली जाते. काही गावांना आठवड्यातून चारवेळा दिवसा आणि तीन वेहा रात्रीची वीज कृषीपंपाना दिली जाते. दिवसा आणि रात्री शेतकरी विजेची वाट पाहत शेतात उभा असतो. मात्र विजेच्या लपंडावाने शेतकरी पुरता हैराण झाला आहे.परिसरातील शेतकऱ्यांबरोबर व्यापारी, ग्राहकांनी आपली कैफियत सभापती रुपाली जाधव यांच्याकडे मांडली होती. त्यावेळी त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना आपला कारभार लवकर सुधारा, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असे खडसावले. (वार्ताहर)सद्यस्थितीत पंपाची वीज मागणी वाढली आहे. मात्र सातारारोड मधून मागणीपुरवठा नियंत्रीत होण्यात अडचणी येत आहेत. यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्याचबरोबर पिंपोडे बुद्रुक येथील उपकेंद्रामध्ये वाढीव ट्रान्सफार्मरला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात अशा अडचणी उद्भवणार नाहीत. शेतकऱ्यांबरोबर सर्वच ग्राहकांनी सहकार्य करावे.ए. वाय. साळवी, प्रभारी उप अभियंता, वाठार स्टेशन, उपविभाग, महावितरणविजेवर अवलंबून असणारे व्यवसाय अडचणीतपिंपोडे बुद्रुक येथील वीज उपकेंद्रातून दोन ट्रान्सफार्मवरून तीन नियं९झ केले जाते, मात्र मागणी पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त होत आहे. त्याठिकाणी आणखी एक ट्रान्सफार्मर असणे गरजेचे असूनही अधिकारी त्याबाबतीत प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येते. परिणामी शेतकऱ्यांबरोबरच व्यापारी ग्राहकांची मोठी पंचायत झाली आहे. दुग्धजन्य पदार्थ विक्री करणारे छोटे-मोठे व्यावसायिक, पिठाची गिरणी व्यवसाय, फॅब्रिकेशन, झेरॉक्स, फोटो असे अनेक विजेची आवश्यकता असणारे व्यवसायही अडचणीत येत आहेत.