शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

चुका केलात आता दुरुस्त्याही करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:51 IST

फलटण : ‘शेती पंपाची बिले देताना चुका तुम्ही केल्या, दुरुस्त्याही तुम्हीच करून द्या, त्यासाठी शेतकºयांना हेलपाटे मारायला लावू नका, शेतीपंपाची प्रलंबित मागणी तातडीने पूर्ण करा, ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्यानंतर तेथे तातडीने दुसरा ट्रान्सफार्मर बसवून द्या,’ अशा सूचना सहपालक मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.फलटण तालुक्यातील तडवळे येथे साखरवाडी, हिंगणगाव, सासवड जिल्हा परिषद ...

फलटण : ‘शेती पंपाची बिले देताना चुका तुम्ही केल्या, दुरुस्त्याही तुम्हीच करून द्या, त्यासाठी शेतकºयांना हेलपाटे मारायला लावू नका, शेतीपंपाची प्रलंबित मागणी तातडीने पूर्ण करा, ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्यानंतर तेथे तातडीने दुसरा ट्रान्सफार्मर बसवून द्या,’ अशा सूचना सहपालक मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.फलटण तालुक्यातील तडवळे येथे साखरवाडी, हिंगणगाव, सासवड जिल्हा परिषद गटांतील शासन आपल्या दारी योजनेंतर्गत आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे महामंडलाचे माजी उपाध्यक्ष रणजिसिंह नाईक-निंबाळकर, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, दीपक भोसले, सागर खोत, बाजार समितीचे संचालक अमोल खराडे, सिराज शेख, राजेंद्र काकडे, प्रांताधिकारी संतोष जाधव, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे, उपअभियंता महादेव पाटील उपस्थित होते.मंत्री खोत म्हणाले, ‘वीजबिल दुरुस्ती किंवा रीडिंग न घेतल्याने एकदम आलेली वीजबिले दुरुस्त करून देण्याचे काम वीजवितरण कंपनीचे अधिकारी त्या गावात जाऊन करतील. संबंधित अधिकाºयांनी गावात जाऊन ग्रामपंचायत कार्यालयात बिले दुरुस्त करून द्यावीत. वीज संंबंधीच्या तक्रारी तेथेच दूर कराव्यात.’तालुक्यात सुमारे सत्तर ट्रान्सफर्मर जळाल्याचे अधिकाºयांनी सांगताच तीव्र संताप व्यक्त करीत मंत्री खोत म्हणाले, ‘नद्या, नाले, विहिरीत सध्या पाणी आहे. शेतात पिके उभी आहेत. चारा पिकांसाठी पाणी आवश्यक असताना एवढे ट्रान्सफार्मर नादुरुस्त होतात. आणि त्याठिकाणी दुसरे ट्रान्सफार्मर बसविताना विजेची थकबाकी भरण्याची तंबी शेतकºयाला दिली जाते हे अवाजवी आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत एकदा हप्ते ठरवून दिल्यानंतर पुन्हा थकबाकीसाठी शेतकºयांची अडवणूक सहन करणार नाही.’महाराष्ट्र शेती महामंडळाकडील खंडकºयांना त्यांच्या मूळ जमिनी पाटपाण्याच्या हक्कासह परत करण्याचा निर्णय झाल्यानंतरही अद्याप अनेक खंडकरी शेतकºयांना जमिनी मिळाल्या नाहीत. काहींना खराब व नापिक जमिनी दिल्या आहेत. त्याचबरोबर एक एकरापेक्षा कमी क्षेत्र मिळणार असलेल्या खंडकºयांना न्याय मिळाला नसल्याबद्दल प्रांताधिकारी यांना सविस्तर अहवाल तयार करून देण्याच्या सूचना खोत यांनी बैठकीतच दिल्या.