शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

चुका केलात आता दुरुस्त्याही करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:51 IST

फलटण : ‘शेती पंपाची बिले देताना चुका तुम्ही केल्या, दुरुस्त्याही तुम्हीच करून द्या, त्यासाठी शेतकºयांना हेलपाटे मारायला लावू नका, शेतीपंपाची प्रलंबित मागणी तातडीने पूर्ण करा, ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्यानंतर तेथे तातडीने दुसरा ट्रान्सफार्मर बसवून द्या,’ अशा सूचना सहपालक मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.फलटण तालुक्यातील तडवळे येथे साखरवाडी, हिंगणगाव, सासवड जिल्हा परिषद ...

फलटण : ‘शेती पंपाची बिले देताना चुका तुम्ही केल्या, दुरुस्त्याही तुम्हीच करून द्या, त्यासाठी शेतकºयांना हेलपाटे मारायला लावू नका, शेतीपंपाची प्रलंबित मागणी तातडीने पूर्ण करा, ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्यानंतर तेथे तातडीने दुसरा ट्रान्सफार्मर बसवून द्या,’ अशा सूचना सहपालक मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.फलटण तालुक्यातील तडवळे येथे साखरवाडी, हिंगणगाव, सासवड जिल्हा परिषद गटांतील शासन आपल्या दारी योजनेंतर्गत आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे महामंडलाचे माजी उपाध्यक्ष रणजिसिंह नाईक-निंबाळकर, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, दीपक भोसले, सागर खोत, बाजार समितीचे संचालक अमोल खराडे, सिराज शेख, राजेंद्र काकडे, प्रांताधिकारी संतोष जाधव, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे, उपअभियंता महादेव पाटील उपस्थित होते.मंत्री खोत म्हणाले, ‘वीजबिल दुरुस्ती किंवा रीडिंग न घेतल्याने एकदम आलेली वीजबिले दुरुस्त करून देण्याचे काम वीजवितरण कंपनीचे अधिकारी त्या गावात जाऊन करतील. संबंधित अधिकाºयांनी गावात जाऊन ग्रामपंचायत कार्यालयात बिले दुरुस्त करून द्यावीत. वीज संंबंधीच्या तक्रारी तेथेच दूर कराव्यात.’तालुक्यात सुमारे सत्तर ट्रान्सफर्मर जळाल्याचे अधिकाºयांनी सांगताच तीव्र संताप व्यक्त करीत मंत्री खोत म्हणाले, ‘नद्या, नाले, विहिरीत सध्या पाणी आहे. शेतात पिके उभी आहेत. चारा पिकांसाठी पाणी आवश्यक असताना एवढे ट्रान्सफार्मर नादुरुस्त होतात. आणि त्याठिकाणी दुसरे ट्रान्सफार्मर बसविताना विजेची थकबाकी भरण्याची तंबी शेतकºयाला दिली जाते हे अवाजवी आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत एकदा हप्ते ठरवून दिल्यानंतर पुन्हा थकबाकीसाठी शेतकºयांची अडवणूक सहन करणार नाही.’महाराष्ट्र शेती महामंडळाकडील खंडकºयांना त्यांच्या मूळ जमिनी पाटपाण्याच्या हक्कासह परत करण्याचा निर्णय झाल्यानंतरही अद्याप अनेक खंडकरी शेतकºयांना जमिनी मिळाल्या नाहीत. काहींना खराब व नापिक जमिनी दिल्या आहेत. त्याचबरोबर एक एकरापेक्षा कमी क्षेत्र मिळणार असलेल्या खंडकºयांना न्याय मिळाला नसल्याबद्दल प्रांताधिकारी यांना सविस्तर अहवाल तयार करून देण्याच्या सूचना खोत यांनी बैठकीतच दिल्या.