शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने दिले आर्थिक शिस्तीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:43 IST

सातारा : कोरोनाकाळाने गेल्या दीड वर्षात सर्वांचीच आर्थिक गणिते बिघडवून टाकली आहेत. अर्थचक्र स्थिर व्हायला अजून किती अवधी लागेल ...

सातारा : कोरोनाकाळाने गेल्या दीड वर्षात सर्वांचीच आर्थिक गणिते बिघडवून टाकली आहेत. अर्थचक्र स्थिर व्हायला अजून किती अवधी लागेल याचा अंदाज कोणालाही नाही. त्यामुळे हाती येणाऱ्या उत्पन्नातून दैनंदिन खर्च आणि भविष्यासाठी बचत करण्याची कसरत करावी लागत आहे. उपलब्ध उत्पन्नात कोरोनाने आर्थिक शिस्तीचे धडे दिल्याने कुटुंबातील अनावश्यक खर्चाला आळा बसला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सगळीकडे बंदची परिस्थिती होती. या काळात वाहतूक, कार्यालये, बाजारपेठा, उद्योगधंदे सर्व काही ठप्प होते. परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय आर्थिक अडचणीत आले, तर अनेकांना निम्म्या पगारातच काम करावे लागले. मागील वर्षभरापासून नागरिक मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत. सामान्य दिवसांमध्ये अनावश्यक केले जाणारे खर्च टाळून अनेकांनी उपलब्ध उत्पन्नात उत्तम राहण्याचाही प्रयत्न केला.

चौकट

कुठे कुठे केली जातेय बचत?

लॉकडाऊनमुळे कुठेही बाहेर पडायचे नाही म्हणून नवीन कपडे नाहीत

सगळ्या बातम्या आणि मालिका मोबाइलवर दिसतात तर केबल नको

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या भाज्यांचे दर लक्षात घेता एक दिवसाआड पालेभाजी

पूर्णवेळ घरात राहत असल्याने नैसर्गिक साधनांचा वापर करून सौंदर्य खुलविणे

प्रत्येकाला स्वतंत्र इंटरनेट घेण्यापेक्षा घरात वायफाय उपलब्ध करून घेणे

कोरोनावर मात करायला प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर बाहेरचे खाणे बंद

कोट :

कोरोनाकाळाने आपल्याला प्रत्येक पातळीवरच मर्यादेत राहण्याचा संदेश दिला आहे. आम्ही पहिल्यापासूनच मर्यादित खर्च करत होतो. या काळात आऊटिंग, हॉटेलिंग आणि शॉपिंग या सर्वांवरच कटाक्षाने मर्यादा घालून घेतल्या. परिणामी कोरोनाकाळात घटलेल्या आर्थिक स्रोताचा आम्हाला त्रास झाला नाही.

- शीतल शेटे-मोरे, गुरुवार पेठ

कोरोनाकाळात घरातील उत्पन्नावर अगदीच परिणाम झाला. त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणावे लागले. यंदा मुलांना जुनी पुस्तके घेतली. गतवर्षीच्या अर्धकोऱ्या वह्याही यंदा वापरायला काढल्या. आर्थिक परिस्थिती हे त्याचे एक कारण असले तरीही यानिमित्ताने आर्थिक शिस्त लागायलाही मदत झाली.

-

गेल्या काही दिवसांपासून वाढत जाणाऱ्या पेट्रोलच्या दरांचा विचार करता आम्ही गाडीचा वापर टाळायला सुरुवात केली आहे. कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडायचे असेल तर रस्त्याची रेकी करून आम्ही मार्ग निश्चित करतो. यातूनही एखादे काम राहिले तर चालत जाऊन हे काम करून येण्याची सवय लावली आहे.

- नीता शिंदे

.....