शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कोरोनाबाधितांचा गावभर संचार होणार बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:28 IST

खटाव : कोरोनाबाधित रुग्ण गृह अलगीकरणासाठी असलेले कडक नियम पाळत नसल्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे गृह ...

खटाव : कोरोनाबाधित रुग्ण गृह अलगीकरणासाठी असलेले कडक नियम पाळत नसल्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे गृह अलगीकरणमध्ये असलेल्या सर्व कोरोनाबधितांना यापुढे आयसोलेशन केंद्रात पाठविण्याबाबत शासनाचे आदेश असल्यामुळे अशा रुग्णांना आता आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

खटावमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी दक्षता कमिटी, आशा सेविका, वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेतली. त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांना पाठविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.

यावेळी सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, ग्रामविकास अधिकारी विकास चव्हाण, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, अशोक कुदळे, मंडल अधिकारी मोहन मोहिते, तलाठी धनंजय तडवळेकर, दीपक घाडगे, आरोग्यसेवक योगेश भोसले, पोलीसपाटील पवनचंद जगताप, सर्व आशा सेविका उपस्थित होत्या.

आरोग्य विभागाकडून प्राप्त यादीनुसार खटावमध्ये गृह अलगीकरणात असणाऱ्या १९ बाधित रुग्णांना गौरीशंकर पॉलिटेक्निक स्कूलमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये पाठविण्यात आले.

ही मोहीम गावोगावी राबविण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंबले यांनी सांगितले. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी आयसोलेशन केंद्रात उपचार घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याबाबत आवाहन केले आहे. कोरोनाबाधित व्यक्तीला आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी तसेच कुटुंबातील अन्य सदस्यांनी कोरोनाची तपासणी करून घेऊन आपले कुटुंब सुरक्षित कसे राहील, याची जबाबदारी व खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.

कॅप्शन : खटावमध्ये गृह अलगीकरणातील रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात हलविताना पुसेगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, आदी उपस्थित होते. (छाया : नम्रता भोसले)