शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

कोरोनाने आटला दातृत्वाचा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:39 IST

सातारा : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून मागे लागलेले समस्यांचे शुक्लकाष्ट काही थांबलेले नाही. अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असून, दातृत्वाचा झराही ...

सातारा : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून मागे लागलेले समस्यांचे शुक्लकाष्ट काही थांबलेले नाही. अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असून, दातृत्वाचा झराही आटू लागला आहे. त्यामुळे अनेक सामाजिक संस्था अडचणीत आल्या असून, अनाथ व निराधारांचे पालन-पोषण करायचे कसे? असा प्रश्न या संस्थांपुढे उभा ठाकला आहे.

कोरोनामुळे वर्षभरात अनेक बदल घडले. अनेकांचे रोजगार गेले. अनेकांना एक वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करावा लागला. अशीच काहीशी अवस्था जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचीदेखील झाली आहे. नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या आणि विविध कारणांनी एकाकी पडलेल्या समाजातील निराधार, वृद्ध व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या या संस्थांना निराधारांचा सांभाळ करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

जिल्ह्यातील सर्वच वृद्धाश्रम व निराधारांचा सांभाळ करणाऱ्या संस्था या बाहेरून मिळणाऱ्या मदतीवरच चालतात. शासनाकडून अशा संस्थांना कोणत्याही स्वरूपाची मदत मिळत नाही. कोरोना व लॉकडाऊनपूर्वी या संस्थांना दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळत होती. मात्र, मदतीचा हात कोरोनानंतर हळूहळू कमी होत गेला. सध्या या निराधारांचे पालन पोषण करताना संस्थाचालकांना अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. मावळतीकडे झुकणाऱ्या या ताऱ्यांना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील दानशूरांनी पुन्हा एकदा पुढे येण्याची गरज आहे.

(चौकट)

१. दानशूर व्यक्तींवर मदार

वाई तालुक्यातील वेळे येथे यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचा आश्रम आहे. या आश्रमात चाळीस निराधारांचे पालन-पोषण केले जाते. शासनाचे कोणतेही अनुदान आश्रमास मिळत नसल्याने याचा संपूर्ण डोलारा हा दानशूर व्यक्तींवर अवलंबून आहे.

२. गरजा भागविताना कसरत

वर्षभरापासून दानशूरांची मदत कमी झाल्याने निराधारांचे उदरभरण, त्यांचे आरोग्य व इतर प्राथमिक गरजा भागविताना ट्रस्टला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

३. शासनाकडून मदत नाही

सातारा व म्हसवड येथील वृद्धाश्रमाची अवस्था काहीशी अशीच आहे. विनाअनुदानित असल्याने शासनाची दमडीही या आश्रमाला मिळत नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तींवरच वृद्धाश्रमाची गाडी उभी आहे.

४. आर्थिक घडी विस्कटली

कोरोनाची झळ वृद्धाश्रमांना देखील बसली आहे. पूर्वीप्रमाणे आता मदतीचा ओघही कमी झाला आहे. त्यामुळे सेवाभावी संस्था व आश्रमांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे.

(कोट)

कोरोनामुळे दानशूर व्यक्तींकडून ट्रस्टला मिळणारी मदत कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून निराधारांचा सांभाळ करणे जिकिरीचे बनले आहे. शासनाकडून ट्रस्टला कोणत्याही स्वरूपात मदत मिळत नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी निराधारांसाठी मदतीचा हात पुढे करावा.

- रवी बोडके, अध्यक्ष, यशोधन ट्रस्ट

(कोट)

दानशूर व्यक्तींकडून पूर्वी सर्व प्रकारची मदत मिळत होती. मात्र, कोरोनामुळे हे प्रमाण आता कमी झाले आहे. निराधार व्यक्तींचा सांभाळ करणे, त्यांना आरोग्य सेवा पुरविणे सध्या कठीण बनले आहे. शासनाने पुढाकार घेऊन अशा संस्थांना सर्वतोपरी मदत करावी.

- विजय कदम, सामाजिक कार्यकर्ता

सोबत फोटो :