शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

कोरोनाने आटला दातृत्वाचा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:39 IST

सातारा : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून मागे लागलेले समस्यांचे शुक्लकाष्ट काही थांबलेले नाही. अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असून, दातृत्वाचा झराही ...

सातारा : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून मागे लागलेले समस्यांचे शुक्लकाष्ट काही थांबलेले नाही. अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असून, दातृत्वाचा झराही आटू लागला आहे. त्यामुळे अनेक सामाजिक संस्था अडचणीत आल्या असून, अनाथ व निराधारांचे पालन-पोषण करायचे कसे? असा प्रश्न या संस्थांपुढे उभा ठाकला आहे.

कोरोनामुळे वर्षभरात अनेक बदल घडले. अनेकांचे रोजगार गेले. अनेकांना एक वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करावा लागला. अशीच काहीशी अवस्था जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचीदेखील झाली आहे. नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या आणि विविध कारणांनी एकाकी पडलेल्या समाजातील निराधार, वृद्ध व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या या संस्थांना निराधारांचा सांभाळ करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

जिल्ह्यातील सर्वच वृद्धाश्रम व निराधारांचा सांभाळ करणाऱ्या संस्था या बाहेरून मिळणाऱ्या मदतीवरच चालतात. शासनाकडून अशा संस्थांना कोणत्याही स्वरूपाची मदत मिळत नाही. कोरोना व लॉकडाऊनपूर्वी या संस्थांना दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळत होती. मात्र, मदतीचा हात कोरोनानंतर हळूहळू कमी होत गेला. सध्या या निराधारांचे पालन पोषण करताना संस्थाचालकांना अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. मावळतीकडे झुकणाऱ्या या ताऱ्यांना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील दानशूरांनी पुन्हा एकदा पुढे येण्याची गरज आहे.

(चौकट)

१. दानशूर व्यक्तींवर मदार

वाई तालुक्यातील वेळे येथे यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचा आश्रम आहे. या आश्रमात चाळीस निराधारांचे पालन-पोषण केले जाते. शासनाचे कोणतेही अनुदान आश्रमास मिळत नसल्याने याचा संपूर्ण डोलारा हा दानशूर व्यक्तींवर अवलंबून आहे.

२. गरजा भागविताना कसरत

वर्षभरापासून दानशूरांची मदत कमी झाल्याने निराधारांचे उदरभरण, त्यांचे आरोग्य व इतर प्राथमिक गरजा भागविताना ट्रस्टला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

३. शासनाकडून मदत नाही

सातारा व म्हसवड येथील वृद्धाश्रमाची अवस्था काहीशी अशीच आहे. विनाअनुदानित असल्याने शासनाची दमडीही या आश्रमाला मिळत नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तींवरच वृद्धाश्रमाची गाडी उभी आहे.

४. आर्थिक घडी विस्कटली

कोरोनाची झळ वृद्धाश्रमांना देखील बसली आहे. पूर्वीप्रमाणे आता मदतीचा ओघही कमी झाला आहे. त्यामुळे सेवाभावी संस्था व आश्रमांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे.

(कोट)

कोरोनामुळे दानशूर व्यक्तींकडून ट्रस्टला मिळणारी मदत कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून निराधारांचा सांभाळ करणे जिकिरीचे बनले आहे. शासनाकडून ट्रस्टला कोणत्याही स्वरूपात मदत मिळत नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी निराधारांसाठी मदतीचा हात पुढे करावा.

- रवी बोडके, अध्यक्ष, यशोधन ट्रस्ट

(कोट)

दानशूर व्यक्तींकडून पूर्वी सर्व प्रकारची मदत मिळत होती. मात्र, कोरोनामुळे हे प्रमाण आता कमी झाले आहे. निराधार व्यक्तींचा सांभाळ करणे, त्यांना आरोग्य सेवा पुरविणे सध्या कठीण बनले आहे. शासनाने पुढाकार घेऊन अशा संस्थांना सर्वतोपरी मदत करावी.

- विजय कदम, सामाजिक कार्यकर्ता

सोबत फोटो :