शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

जावळी तालुक्यात येणाऱ्यांना कोरोना अहवाल अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:40 IST

कुडाळ : राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परराज्य किंवा परजिल्ह्यातून जावळी तालुक्यात येणाऱ्यांना ७२ तास अगोदरचा ...

कुडाळ : राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परराज्य किंवा परजिल्ह्यातून जावळी तालुक्यात येणाऱ्यांना ७२ तास अगोदरचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक केले आहे. याबाबतचा आदेश जावळीचे उपविभागीय अधिकारी सोपान टोंपे यांनी काढला आहे.

शासनाने कोरोना प्रतिबंध रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू केला आहे. यामधील तरतुदीनुसार आदेश निर्गमित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्गबाधित रुग्ण आढळत आहेत. याचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर नियंत्रण ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. तसेच या संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती जावळी तालुक्यात उद्भवू नये. याकरिता पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. कोरोनाबाबत कोणतीही काळजी न घेता परजिल्ह्यातून, परराज्यातून आपल्या मूळ गावी येत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

परराज्य किंवा परजिल्ह्यातून जावळी तालुक्यात येणाऱ्यांना ७२ तास अगोदरचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असेल तरच गावात प्रवेश दिला जाईल. ज्यांची कोरोना चाचणी झाली नसेल त्यांनी नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी व रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कारवाई करण्यात येईल.