शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कोरेगावातून कोरोना हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘कोरेगाव शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार सर्वांसाठी अडचणीचा विषय आहे. कोरोना रोखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : ‘कोरेगाव शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार सर्वांसाठी अडचणीचा विषय आहे. कोरोना रोखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, शहरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी केले.

येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये कोरेगाव शहरासाठी स्वतंत्रपणे सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन प्रांताधिकारी ज्योती पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, तहसीलदार अमोल कदम, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे, डॉ. संजय चिवटे, डॉ. विजया जगताप, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, नगराध्यक्ष रेश्मा कोकरे, उपनगराध्यक्ष मंदा बर्गे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

प्रांताधिकारी पाटील म्हणाल्या की, ‘शहरात कोरोनाचा वाढता प्रसार सर्वांसाठी विचार करणारी गोष्ट बनली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे कोरोनाविरोधात मोठी चळवळ उभी केली आहे. कोरोना रोखण्यासाठी त्यांनी हाती घेतलेले उपक्रम व मोहीम अत्यंत चांगली आहे. प्रशासनासह आरोग्य विभागाला ते नेहमीच सहकार्य करत आहेत. आवश्यक तेथे सूचना करत आणि मदतीसाठी चोवीस तास उपलब्ध होणारे स्वयंसेवक खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा आहेत.

गणेश किंद्रे म्हणाले, पोलीस दलाने कोरोना काळात अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज केले आहे. लसीकरण केंद्र येथे पोलीस दलाच्यावतीने बंदोबस्त दिला जाईल. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही डॉ. चिवटे यांनी दिली. यावेळी नगरसेवक संजय पिसाळ, जयवंत पवार, महेश बर्गे, बचूशेठ ओसवाल, नागेश कांबळे, संतोष कोकरे, किशोर बर्गे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

(चौकट)

फक्त कोरेगाव शहराचे लसीकरण होणार

मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे सुरू करण्यात आलेले लसीकरण केंद्र हे पूर्वी उपजिल्हा रुग्णालयात होते. लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी हे केंद्र स्थलांतरित करण्यात आले आहे. या केंद्रावर कोरेगाव शहरातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. अन्य गावातील नागरिकांना येथे लस दिली जाणार नाही. त्यामुळे या केंद्रावर कोणीही गर्दी करू नये, असे आवाहन नगर पंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.