शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काही लोकांच्या अहंकारामुळे देशापुढील कोरोनाचे संकट अधिक गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:25 IST

मलकापूर : कोरोनाच्या संकटामुळे कोट्यवधी लोकांचे रोजगार बुडाले आहेत. कोरोनामुळेच देशातील शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. कोरोनाचे हे संकट देशासाठी ...

मलकापूर : कोरोनाच्या संकटामुळे कोट्यवधी लोकांचे रोजगार बुडाले आहेत. कोरोनामुळेच देशातील शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. कोरोनाचे हे संकट देशासाठी युद्धापेक्षाही महाभयंकर संकट आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाशिवाय दुसरा उपाय नाही. देशपातळीवरील नेतृत्वाच्या अभावामुळे व काही लोकांच्या अहंकारामुळे देशापुढील हे संकट अधिक गडद होत आहे,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

मलकापूर, ता. कऱ्हाड येथे नगरपालिकेच्या वतीने प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते दिवंगत आनंदराव चव्हाण व प्रेमलाताई चव्हाण यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आमदार मोहनराव कदम, जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील, रणजित देशमुख, डॉ. सुरेश जाधव, अजितराव पाटील, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन विकास व शिक्षण सभापती प्रशांत चांदे, इंद्रजित चव्हाण, शंकर खबाले, नामदेव पाटील, वैशाली वाघमारे, उत्तमराव पाटील, विद्याताई थोरवडे, धनाजी काटकर, नरेंद्र पाटील, झाकिर पठाण, सतीश माने, नगरसेवक सागर जाधव, जयंत कुराडे, गणेश चव्हाण, हणमंत शिंगण, शहाजी पाटील, राहुल मर्ढेकर यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानदेव साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र यादव यांनी आभार मानले.

(चौकट)

कोरोनामुळे अनाथ झालेल्यांचे पालिका पालक

उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी नवीन ना. आनंदराव चव्हाण शिष्यवृत्ती योजना जाहीर केली. मलकापुरातील ज्या मुला-मुलींच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशा मुला-मुलींचा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा खर्च पालिकेच्या वतीने करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

चौकट

आजचे प्रमुख कार्यक्रम

१) माझी वसुंधरा अभियानामध्ये पालिकेने राज्यात तृतीय व स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात २५ वा तर दक्षिण भारतात ११ वा क्रमांक प्राप्त केला. त्यांचे स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र वितरण, २) प्रियदर्शनी कन्यारत्न योजनेअंतर्गत मुदतठेव पावती वितरण, ३) गुणवंतांचा सत्कार

(चौकट)

राज्यासाठी महिन्याला तीन कोटी डोसची गरज

कोरोनाच्या संकटाला राज्याने धाडसाने तोंड दिले आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. दररोज सरासरी दोन लाख लोकांना लसीकरण दिले जाते. हा आकडा वाढवून दररोज किमान दहा लाख लोकांना लसीकरण देण्याची क्षमता राज्यामध्ये आहे. त्यासाठी केंद्राने महिन्याला किमान तीन कोटी लस महाराष्ट्रासाठी उपलब्ध करणे गरजेचे आहे. तशा स्वरूपाचा ठराव विधिमंडळात केला आहे.

फोटो ओळ:

मलकापुरात माझी वसुंधरा अभियानात पालिकेने राज्यात तृतीय व स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात २५ वा तर दक्षिण भारतात ११ वा क्रमांक प्राप्त केला. त्यांचे स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र वितरण व प्रियदर्शनी कन्यारत्न योजनेअंतर्गत मुदत ठेव पावती वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (छाया : माणिक डोंगरे)

080721\img-20210708-wa0026.jpg

फोटो कॕप्शन

मलकापूरात माझी वसुंधरा अभियानात पालिकेने राज्यात तृतीय व स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशात २५ वा तर दक्षिण भारतात ११ वा क्रमांक प्राप्त केला त्यांचे स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र वितरण व प्रियदर्शनी कन्यारत्न योजनेअंतर्गत मुदत ठेव पावती वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (छाया- माणिक डोंगरे)