शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

कोरोना लागला वाढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST

सातारा : जिल्ह्यातील शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे अनेक गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील ...

सातारा : जिल्ह्यातील शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे अनेक गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आतातर कोरोनाचा कहर सुरू आहे.

0000000\

वीज सतत खंडित

सातारा : सातारा शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागला. सातारा शहरातील काही भागातील वीजपुरवठा सायंकाळच्या सुमारास दोन ते तीनवेळा खंडित झाला. उन्हामुळे उकाडा वाढला असून, त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रास सहन करावा लागतो.

000

सवयभानचा विसर

सातारा : साताऱ्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. तरीही अनेक सातारकर मास्कचा वापर करत नाहीत. गेल्यावर्षी कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हा सामाजिक कार्यातून एक गाडी मास्कचा वापर करण्याबाबत सवयभानची आठवण करुन दिली जात होती. पण आता नागरिकांना सवयभानचा विसर पडला आहे.

0000

रस्त्यावर वाहनतळ

सातारा : साताऱ्यापासून करंजे परिसरातील रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. यामुळे अनेकदा वादावादीचे प्रसंगही उद्भवत आहेत. त्यामुळे संबंधितांनी योग्य त्या ठिकाणी वाहने उभी करावीत, अशी मागणी होत आहे.

000000

चौकात शतपावली

सातारा : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत असून, एकमेकांना दोष दिला जात आहे. पण त्याचवेळी दररोज रात्री अकरा वाजून गेले तरी असंख्य सातारकर चौकामध्ये शतपावली करण्यासाठी जमत असतात. त्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

00000

जिल्हा परिषदेत गर्दी वाढू लागली

सातारा : मार्चअखेर असल्याने जिल्हा परिषदेत गर्दी वाढू लागली आहे. कोरोना काळात कोणीही शासकीय कार्यालयात येऊ नये, असे अपेक्षित आहे. तरीही विविध कामांच्या निमित्ताने लोक जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये येत आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कर्मचारी त्यांना नंतर येण्यास सांगतात.

000000

सोसायट्यांमध्ये वावर

सातारा : असंख्य वसाहतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मात्र रखवालदार नाही. त्यामुळे कोणी आले तरी विचारणा होत नाही. पण काही सोसायटीत कसलीही खबरदारी घेतली गेलेली नाही. त्यामुळे दुपारच्या वेळेस काही नागरिकांचा वावर वाढला आहे. अशांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

000000

वीजबिलाची चिंता

सातारा : ग्रामीण भागात वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, कर्तव्य कसे पार पाडायचे, हा प्रश्न त्यांना सतावत होता. आता पुन्हा लॉकडाऊन केले असल्याने नागरिक वीजबिल माफ होण्याची वाट पाहत आहेत.