शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लागला वाढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST

सातारा : जिल्ह्यातील शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे अनेक गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील ...

सातारा : जिल्ह्यातील शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे अनेक गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आतातर कोरोनाचा कहर सुरू आहे.

0000000\

वीज सतत खंडित

सातारा : सातारा शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागला. सातारा शहरातील काही भागातील वीजपुरवठा सायंकाळच्या सुमारास दोन ते तीनवेळा खंडित झाला. उन्हामुळे उकाडा वाढला असून, त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रास सहन करावा लागतो.

000

सवयभानचा विसर

सातारा : साताऱ्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. तरीही अनेक सातारकर मास्कचा वापर करत नाहीत. गेल्यावर्षी कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हा सामाजिक कार्यातून एक गाडी मास्कचा वापर करण्याबाबत सवयभानची आठवण करुन दिली जात होती. पण आता नागरिकांना सवयभानचा विसर पडला आहे.

0000

रस्त्यावर वाहनतळ

सातारा : साताऱ्यापासून करंजे परिसरातील रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. यामुळे अनेकदा वादावादीचे प्रसंगही उद्भवत आहेत. त्यामुळे संबंधितांनी योग्य त्या ठिकाणी वाहने उभी करावीत, अशी मागणी होत आहे.

000000

चौकात शतपावली

सातारा : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत असून, एकमेकांना दोष दिला जात आहे. पण त्याचवेळी दररोज रात्री अकरा वाजून गेले तरी असंख्य सातारकर चौकामध्ये शतपावली करण्यासाठी जमत असतात. त्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

00000

जिल्हा परिषदेत गर्दी वाढू लागली

सातारा : मार्चअखेर असल्याने जिल्हा परिषदेत गर्दी वाढू लागली आहे. कोरोना काळात कोणीही शासकीय कार्यालयात येऊ नये, असे अपेक्षित आहे. तरीही विविध कामांच्या निमित्ताने लोक जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये येत आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कर्मचारी त्यांना नंतर येण्यास सांगतात.

000000

सोसायट्यांमध्ये वावर

सातारा : असंख्य वसाहतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मात्र रखवालदार नाही. त्यामुळे कोणी आले तरी विचारणा होत नाही. पण काही सोसायटीत कसलीही खबरदारी घेतली गेलेली नाही. त्यामुळे दुपारच्या वेळेस काही नागरिकांचा वावर वाढला आहे. अशांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

000000

वीजबिलाची चिंता

सातारा : ग्रामीण भागात वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, कर्तव्य कसे पार पाडायचे, हा प्रश्न त्यांना सतावत होता. आता पुन्हा लॉकडाऊन केले असल्याने नागरिक वीजबिल माफ होण्याची वाट पाहत आहेत.