शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना आणि सामाजिक संघटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:37 IST

जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोना आणखीनच तीव्र स्वरूप धारण करीत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तीव्र स्वरूपाची आहे. दोन हजारांच्या ...

जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोना आणखीनच तीव्र स्वरूप धारण करीत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तीव्र स्वरूपाची आहे. दोन हजारांच्या घरात रुग्ण रोज वाढत आहेत. साखळी कशी तोडायची हे प्रशासनासमोर आव्हान असले तरी केवळ कोरोना बाधित आणि आरोग्य विभाग एवढ्यावर हा प्रश्न मिटत नाही. वाढत्या रुग्ण संख्येबरोबर अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. बाधित रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी बेड अपुरे पडत आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईकांना रात्रीचा दिवस करावा लागतोय. घरात एकटेच ज्येष्ठ नागरिक असतील किंवा मर्यादित कुटुंब व्यवस्थेतील नवरा-बायको दोघेही बाधित असतील तर अशावेळी इंजेक्शन कोण पुरविणार ही अडचण निर्माण होते. प्रशासन सर्वच पातळीवर पुरेल अशी अपेक्षाही ठेवणे योग्य नाही. तेव्हा सामाजिक संघटनांनी स्वतःचे नेटवर्क तयार केले तर या रुग्णांना वेळीच योग्य मदत मिळण्यास मदत होऊ शकते.

बदलत्या काळानुसार कुटुंबे छोटी होत गेली आहेत. पती, पत्नी दोघे बाधित असतील तर त्यांच्या लहान मुलांचे काय करायचे? त्यांचा खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेकांचे नातेवाईक दूर जिल्ह्यात असतील तर जोडपे अनेकदा धोका पत्करून बाळाला जवळ ठेवतात. बाधित आई-वडील बेडरूममध्ये तर लहान मुले हॉलमध्ये थांबत आहेत. आईबाप आणि मुलांमधील सर्वांना दुःखदायक असते. मुलांना हॉलमध्येच सात-आठ दिवस ठेवण्याची वेळ येत आहे. अशा आई-वडिलांना कोरोनापेक्षा मुलांचा विरह आणि त्यांचे हाल याचा जास्त त्रास होतो. अशा संकटात सामाजिक संघटनांनी महाविद्यालयीन तरुणींची मदत घेऊन काही दिवसांसाठी मुलांचे पालकत्व स्वीकारले तर आई-वडिलांचा निम्मा आजार कुठल्या कुठे पळून जाईल आणि त्यावर मात करणे सोपे जाणार आहे.

ग्रामीण भागातून अनेकदा रुग्णांसोबत नातेवाईक येतात. रुग्णाच्या खाण्यापिण्याची सोय दवाखान्यातून होते. मात्र, नातेवाईकांच्या पोटाचे हाल होतात. बाहेर लाॅकडाऊन असल्याने हॉटेलमध्ये जेवता येत नाही. अशा प्रसंगी साताऱ्यातील रोटरी क्लब, देवस्थान ट्रस्टनी पुढाकार घेऊन अन्नदानाचा उपक्रम राबविल्याची गरज आहे.

चौकट

समुपदेशनातून मानसिक आधार

वर्षभरापासून सातत्याने लॉकडाऊन होत आहे. यामुळे अनेक उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. सरकारी नोकरदार सोडले तर खासगी क्षेत्रातील सर्वांच्याच डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. माझे, माझ्या कुटुंबाचे भविष्यात काय होईल, ही चिंता प्रत्येकाला सतावत आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशकांची फळी तयार होणे गरजेचे आहे. अशा बेरोजगार तरुणांचे समुपदेशन करून त्यांच्यात पॉझिटिव्हिटी तयार करण्याची गरज आहे.