शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कॉर्नर कॉर्नर पे लिखा है रिक्षा का नाम!

By admin | Updated: July 10, 2015 22:20 IST

वाहतुक व्यवस्था कोलमडली : राजवाडा परिसरात तब्बल पाच रिक्षा थांबे

प्रगती जाधव-पाटील- सातारा -शहराचा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असणाऱ्या राजवाडा परिसरात तब्बल पाच रिक्षा थांबे निर्माण झाले आहेत. वास्तविक यातील दोन रिक्षा थांबे अधिकृत तर बाकीचे तीन अनधिकृत आहेत. या अनधिकृत रिक्षा थांब्यांमुळे नागरिकांना प्रवास करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे वाहतुक कोलमडली आहे. राजवाडा परिसरात तब्बल सहा रस्ते आहेत. यातील प्रत्येक रस्ता शहराच्या विविध टोकांकडे जाणारा आहे. याच परिसरात बसस्थानक असल्यामुळे शहर वाहतुकीच्या बसेस आणि बोगद्या बाहेर राहणाऱ्यांसाठीच्या एसटीची वर्दळ याच भागात अधिक असते. त्यामुळे सकाळी नऊ ते रात्री नऊ असे बारा तास हा रस्ता वाहन आणि माणसाने भरलेला असतो.काही महिन्यांपासून तीन रिक्षा थांबे सुरू झाले आहेत. राजवाडा चौपाटीशेजारी सुरू असलेला थांबा तर पार्किंगच्या बाहेर असतो. त्यामुळे तिथे संध्याकाळी वाहतुकीची कोंडी होते. याच रस्त्यावर अग्निशामनचे बंबही आहेत. शहरात कुठेही काही वाईट घटना घडली तर या बंबांना जुनी नगर पालिका ते मोती चौक हे अंतर पूर्ण करायलाच दहा मिनिटे लागतील अशी परिस्थिती आहे. राजवाडा-मंगळवार तळे रस्त्यावर दुकानांची मांडणी, परळी भागात वडाप वाहतुक करणारी वाहने आणि मंडई असे सगळेच एकत्र आहे. याच भागात एक नगर पालिकेची आणि अन्य काही शाळाही आहेत. संध्याकाळी शाळा सुटण्याची वेळ आणि वाहतुकीची वर्दळ एकाच वेळी सुरू होते. त्यामुळे वाहनचालकांसह विद्यार्थ्यांनाही जिव मुठीत घेवून चालावे लागते. मुख्या चौकात पाचशे फुटांच्या परिसरातच सुमारे पाच रिक्षा थांबे असल्यामुळे वाहतुकीबरोबरच वर्दळीलाही मर्यादा येत आहेत. संबंधित विभागाने तातडीने याविषयी खबरदारीची पाऊले उचलून या अनधिकृत रिक्षा थांब्याच्या बंदोबस्ताची गरज आहे. अन्यथा भविष्यात त्यांची संख्या वाढणार आहे. केवळ दोन थांबेच अधिकृत सातारा शहराची वाढ लक्षात घेता पूर्वी एकच थांबा येथे मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर वाढती लोकसंख्या आणि रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे राजवाडा परिसरात अजून एक थांबा मंजूर करण्यात आला आहे. राजवाडा परिसरात केवळ दोन रिक्षा थांबेच अधिकृत आहेत. यातील एक थांबा राजवाडा बस थांब्याच्या समोर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पोवईनाका, शाहूपुरी आणि मुख्य बसस्थानक परिसरात शेअर रिक्षा सुरू असतात. तर दुसरा थांबा राजवाडा समर्थ मंदिर रस्त्यावर आहे. या थांब्यावरून समर्थ मंदिर, बोगदा आणि परळी खोऱ्यात जाण्यासाठी लोक जमा होतात. येथेही मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी लोकांचा राबता सकाळपासूनच राहतो.