शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कॉर्नर कॉर्नर पे लिखा है रिक्षा का नाम!

By admin | Updated: July 10, 2015 22:20 IST

वाहतुक व्यवस्था कोलमडली : राजवाडा परिसरात तब्बल पाच रिक्षा थांबे

प्रगती जाधव-पाटील- सातारा -शहराचा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असणाऱ्या राजवाडा परिसरात तब्बल पाच रिक्षा थांबे निर्माण झाले आहेत. वास्तविक यातील दोन रिक्षा थांबे अधिकृत तर बाकीचे तीन अनधिकृत आहेत. या अनधिकृत रिक्षा थांब्यांमुळे नागरिकांना प्रवास करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे वाहतुक कोलमडली आहे. राजवाडा परिसरात तब्बल सहा रस्ते आहेत. यातील प्रत्येक रस्ता शहराच्या विविध टोकांकडे जाणारा आहे. याच परिसरात बसस्थानक असल्यामुळे शहर वाहतुकीच्या बसेस आणि बोगद्या बाहेर राहणाऱ्यांसाठीच्या एसटीची वर्दळ याच भागात अधिक असते. त्यामुळे सकाळी नऊ ते रात्री नऊ असे बारा तास हा रस्ता वाहन आणि माणसाने भरलेला असतो.काही महिन्यांपासून तीन रिक्षा थांबे सुरू झाले आहेत. राजवाडा चौपाटीशेजारी सुरू असलेला थांबा तर पार्किंगच्या बाहेर असतो. त्यामुळे तिथे संध्याकाळी वाहतुकीची कोंडी होते. याच रस्त्यावर अग्निशामनचे बंबही आहेत. शहरात कुठेही काही वाईट घटना घडली तर या बंबांना जुनी नगर पालिका ते मोती चौक हे अंतर पूर्ण करायलाच दहा मिनिटे लागतील अशी परिस्थिती आहे. राजवाडा-मंगळवार तळे रस्त्यावर दुकानांची मांडणी, परळी भागात वडाप वाहतुक करणारी वाहने आणि मंडई असे सगळेच एकत्र आहे. याच भागात एक नगर पालिकेची आणि अन्य काही शाळाही आहेत. संध्याकाळी शाळा सुटण्याची वेळ आणि वाहतुकीची वर्दळ एकाच वेळी सुरू होते. त्यामुळे वाहनचालकांसह विद्यार्थ्यांनाही जिव मुठीत घेवून चालावे लागते. मुख्या चौकात पाचशे फुटांच्या परिसरातच सुमारे पाच रिक्षा थांबे असल्यामुळे वाहतुकीबरोबरच वर्दळीलाही मर्यादा येत आहेत. संबंधित विभागाने तातडीने याविषयी खबरदारीची पाऊले उचलून या अनधिकृत रिक्षा थांब्याच्या बंदोबस्ताची गरज आहे. अन्यथा भविष्यात त्यांची संख्या वाढणार आहे. केवळ दोन थांबेच अधिकृत सातारा शहराची वाढ लक्षात घेता पूर्वी एकच थांबा येथे मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर वाढती लोकसंख्या आणि रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे राजवाडा परिसरात अजून एक थांबा मंजूर करण्यात आला आहे. राजवाडा परिसरात केवळ दोन रिक्षा थांबेच अधिकृत आहेत. यातील एक थांबा राजवाडा बस थांब्याच्या समोर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पोवईनाका, शाहूपुरी आणि मुख्य बसस्थानक परिसरात शेअर रिक्षा सुरू असतात. तर दुसरा थांबा राजवाडा समर्थ मंदिर रस्त्यावर आहे. या थांब्यावरून समर्थ मंदिर, बोगदा आणि परळी खोऱ्यात जाण्यासाठी लोक जमा होतात. येथेही मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी लोकांचा राबता सकाळपासूनच राहतो.