शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

वाई तालुक्यात गावपातळीवर सोयीच्या आघाड्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST

वाई : राज्यात तीन पक्षांचे सरकार विरुद्ध भाजप असे समीकरण असून, राज्य पातळीवरील नेते सर्व निवडणुकांमध्ये आघाडीचे घटक पक्ष ...

वाई : राज्यात तीन पक्षांचे सरकार विरुद्ध भाजप असे समीकरण असून, राज्य पातळीवरील नेते सर्व निवडणुकांमध्ये आघाडीचे घटक पक्ष एकत्र लढणार, असे म्हणत असले, तरी ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक परिस्थिती पाहून समीकरणे बदलताना दिसत आहेत. गावापातळीवर मुख्य प्रबळ असलेल्या पक्षाच्या विरोधात बाकीचे पक्ष एकत्र येऊन लढताना दिसत आहेत. यामध्ये राज्य पातळीवरील आघाडीला तिलांजली दिल्याचे चित्र दिसत आहे.

वाई तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या २४२ वॉर्डमधील ६०६ जागांसाठी एकूण १ हजार १५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत १२ ग्रामपंचायतींतील १८ अर्ज बाद झाले होते. तालुक्यातील १९ पूर्णतः बिनविरोध झाल्या असून, ५७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लागली आहे. निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्येही काही गावांमध्ये काही वाॅर्ड बिनविरोध झाले आहेत. तालुक्यात अनवडी, उलुंब, वेलंग, बोपेगाव, दसवडी, कनूर, कोंढवली, वयगाव, जांब, जोर, किरुंडे, परतवडी, वाशिवली, शेलारवाडी, वेरुळी, वासोळे, मुंगसेवाडी, खावली आणि अनपटवाडी आदी गावे बिनविरोध झाली असून, उरलेल्या ५७ ग्रामपंचायतींमध्ये मतदान १५ जानेवारी रोजी होणार आहे.

निवडणूक होणाऱ्या गावांमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला कोठेही वापरताना दिसून येत नाही. बावधन हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानले जात असले, तरीही बावधनमध्ये भाजप-शिवसेनेमध्ये युती झाली असून, राष्ट्रवादी विरोधात शिवसेना-भाजप लढत असून, काँग्रेस पक्ष तटस्थ भूमिकेत आहे, तर परखंदीत राष्ट्रवादीची भाजपसोबत युती झाली असून, काँग्रेसला खिंडीत पकडण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली आहे. परंतु काँग्रेसचे विराज शिंदे यांचे पारडे जड आहे. केंजळमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत आहे. पसरणीत राष्ट्रवादीत दोन गट पडले असून, एका गटाने भाजपबरोबर युती केली असून, आरपीआयने एका वाॅर्डात बंडखोरी करून तीन उमेदवार अपक्ष म्हणून उभे केले आहेत. चिखलीमध्ये विकास शिंदेंच्या काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी व शिवसेनेची युती झाली असून, चिखलीतील तीन वाॅर्डपैकी दोन वाॅर्ड बिनविरोध झाले आहेत. एका वाॅर्डमध्ये निवडणूक लागलेली आहे. मेणवली ग्रामपंचायतीत काँग्रेसने जुळवून घ्यावयाचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे मेणवली ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी विरुध्द काँग्रेस अशी सरळ लढत आहे.

चौकट..

राष्ट्रवादीचे पारडे जड... भाजपची कडवी झुंज, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई

इतर गावांतील ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीच्या फाॅर्म्युल्याला तिलांजली देत स्थानिक आघाड्या करीत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. उर्वरित ५७ ग्रामपंचायती निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, १८ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. आमदार मकरंद पाटील यांचे तालुक्यातील निवडणुकीवर बारीक लक्ष असून, आजमितीला वाई तालुक्यात राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. भाजपने राष्ट्रवादीशी कडवी लढत दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे.