शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

ठेकेदारी, गुंडगिरी, हप्तेखोरी कोणामुळे?

By admin | Updated: November 16, 2016 00:15 IST

वेदांतिकाराजे भोसले : भर सभागृहात उमेदवारांना का रडावे लागले..?

सातारा : ‘गेली दहा-बारा वर्षे मी समाजकार्यात आहे. मी नगरपालिकेचा कारभार पारदर्शक आणि गतिमान करू शकते; पण केवळ आमदाराची बायको म्हणून मी नगराध्यक्ष व्हायचे नाही? रंजना रावत यांच्याबाबतीत तुम्ही काय केले? का तुम्ही निवडून आलेल्या लोकांना असे वागवता? पारंपरिक ठेकेदारी, गुंडगिरी, हप्तेखोरी कोणामुळे चालते? शहरात कोणाची दहशत आहे? भर सभागृहात उमेदवारांना का रडावे लागते? यालाच प्रेम आणि जिव्हाळा म्हणायचा का?,’ असा खडा सवाल नगरविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वेदांतिकाराजे भोसले यांनी केला. प्रभाग ५ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ गोडोली येथे झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी ‘नविआ’चे उमेदवार शेखर ऊर्फ आण्णासाहेब मोरे-पाटील, मनीषा काळोखे, भरतदादा सपकाळ, पंडितराव मोरे, वामनराव म्हस्के, सजन कुडाळकर, अरुण मापारी, मधुकर कुंभार, बाळासाहेब माने, अण्णासाहेब साळुंखे, भाई जगताप, लक्ष्मण मोरे-पाटील, व्यंकटराव मोरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. ‘अपप्रवृत्तींच्या विरोधात जात-पात, धर्म बाजूला ठेवून संपूर्ण गाव एकवटला असून, ही एकी कायम ठेवा, असे आवाहन करून वेदांतिकाराजे म्हणाल्या, ‘गेली दहा वर्षे तुम्ही वकिली थाट अनुभवला; पण दहा वर्षांत गोडोलीकरांना पाणी मिळाले नाही, ही खरी शोकांतिका आहे. पालिकेला एक सक्षम, कार्यक्षम अध्यक्ष आणि काम करणारे नगरसेवक पाहिजेत. ही काळाची गरज आहे. मनोमिलन होणार अशी आमची अपेक्षा होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे स्वत:हून दादांना नगराध्यक्षपद देत होते; पण चर्चाच नाही तर, मग कालवण कसे होणार? मनोमिलन का तुटले, हे आजपर्यंत आम्हाला माहीत नाही, असे वेदांतिकाराजे म्हणाल्या. काम कोण करतंय हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. सातारा शहराचा विकास साधण्यासाठी प्रशासनावर नियंत्रण ठेवणारा, कामकाजात पारदर्शकता आणि लोकसहभाग वाढवणारा नगराध्यक्ष हवा आहे. तुम्हाला वाटेल तसे मान डोलावणारा नगराध्यक्ष देऊन सातारा शहराचे आणि नागरिकांचे नुकसान करायचे का?,’ असा परखड सवाल वेदांतिकाराजे यांनी उपस्थित केला. देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त भरत संकपाळ, उमेदवार काळोखे, शेखर मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभागातील अपक्ष उमेदवारांनी माघार घेऊन नगरविकास आघाडीला पाठिंबा दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी) कोणावरही आरोप करणार नाही... ‘मी कोणावरही आरोप करणार नाही. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा हक्क आहे. मी फक्त विकासाच्या, कामाच्या आणि सक्षमतेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून, मला सातारा शहराचा विकास साध्य करायचा आहे,’ असेही वेदांतिकाराजे म्हणाल्या.