शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोरोनामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायमस्वरूपी घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:44 IST

सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात गेल्या वर्षभरापासून कंत्राटी स्वरूपात अनेकजण कार्यरत आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय ...

सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात गेल्या वर्षभरापासून कंत्राटी स्वरूपात अनेकजण कार्यरत आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे, अशी मागणी कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचे संकट आले आहे. या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून कोरोना विभाग तसेच विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या कक्षामध्ये कंत्राटी तत्त्वावर अनेकजण कार्यरत आहेत. हे कंत्राटी योद्धे अहोरात्र कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. आपल्या कुटुंबीयांना सोडून कोरोना विभाग आणि विलगीकरण कक्षात त्यांचे काम सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रातील लाखो लोकांचे प्राण वाचले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे कोरोना संकट कमी होण्यास मदत झालेली आहे; पण कोरोना अंतर्गत भरती ही तात्पुरत्या स्वरूपातील आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेतून काढण्याचे नियोजन आहे. यामुळे सर्वजण बेरोजगार होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे.

कोरोना काळात हे कंत्राटी कर्मचारी करत असलेले काम विचारात घेण्याची गरज आहे. त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासकीय सेवेत कायम करण्यात यावे, ही अपेक्षा आहे. त्यातच विविध साथीचे रोग सुरू असतात. २००७ पासून झिरो बजेटमुळे भरती नाही. परंतु, आजारांच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्यासाठी नोकर भरतीचा निर्णय अभिनंदनीयच आहे; पण कंत्राटी स्वरूपातील कोरोना योद्ध्यांना कायम सेवेत घ्यावे. याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा आहे.

निवेदन देताना कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष सोहेल पठाण, उपाध्यक्ष विराज शेटे, सहसंघटन प्रमुख सुनील जाधव, महिला अभियान प्रमुख गौरी भोसले, राज्य कार्यकारिणीचे सहसंघटन प्रमुख श्रीनिक काळे, आदी उपस्थित होते.

....................................................