शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सतरा वर्षांनी सुरू; पण दोन दिवसांत बंद !

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

जिंती-मराठवाडी रिंगरोडचा प्रश्न : रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित, आंदोलनाचा इशारा

सणबूर : सतरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जिंती ते मराठवाडी रिंगरोडच्या कामाला मुहूर्त सापडला. मात्र दोन दिवसांतच कामाला ब्रेक लागल्याने ग्रामस्थांतून संतापाची लाट उसळली आहे. कृष्णा खोरेच्या नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामस्थ अक्षरश: वैतागले आहेत. रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा या भागातील जनतेने दिला आहे. युती शासनाच्या काळात १९९७ मध्ये वांग-मराठवाडी धरणाच्या कामाला सुरुवात झाली. धरणाच्या बॅक वॉटरच्यावरील बाजूस जिंतीसह अनेक लहान-मोठ्या १२ वाड्या-वस्त्या आहेत. या गावांना जोडणारा मराठवाडी ते जिंती रस्ता धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये जात आहे. त्यामुळे त्यावर आजपर्यंत कोणताही निधी शासनाने खर्ची टाकलेला नाही. त्यामुळे जिंती रस्ता वाहतुकीस योग्य राहिलाच नाही. रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. पावसाळ्यात अनेकवेळी जिंती संपर्कहीन होत आहे. त्यामुळे जिंती खोऱ्यातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर जिंतीसाठी पर्यायी रस्ता (रिंगरोड) हा मंजूर असून, हा कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे वर्ग असल्याचे ग्रामस्थ सांगत आहे. मात्र कृष्णा खोरेच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेली १७ वर्षे काम रखडले असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर या परिसरातील लोकांनी बहिष्कार टाकला होता. त्याला सर्व जिंती खोऱ्यातून चांगला प्रतिसादही मिळाला. त्यानंतर विधानसभेला नागरिकांनी मतदान करून आपला राग व्यक्त केला. ते निकालावरून स्पष्ट झाले होते. आज राज्यात पुन्हा युतीचे शासन सत्तेवर आले आहे.काम बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा संतापाची लाट पसरली असून, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कारभाराबद्दल लोकांच्या मनात शंका उपस्थित होत आहे. (वार्ताहर)पालकमंत्री परतले, काम थांबलेकाही दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी वांग-मराठवाडी धरणावर धरणग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी रिंगरोडचे गाऱ्हाणे पालकमंत्र्यांसमोर मांडण्यात आले होते. पालकमंंत्र्यांच्या दौऱ्यानंतर चारच दिवसांत रिंंगरोडच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, काम सुरू झाल्यानंतर दोनच दिवसांत रस्त्याच्या कामाला ब्रेक लागला. तो अद्याप तसाच आहे. रिंगरोडचे काम मार्गी लागले नाही, हे आमचे दुर्दैव असून, याला शासनच जबाबदार आहे. अजून आम्हाला किती दिवस रस्त्यासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागणार. काम बंद असण्याचे कारण संबंधितांनी स्पष्ट करावे. - अंकुश महाडिक, सामाजिक कार्यकर्ते, कोळेकरवाडी