शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

सतरा वर्षांनी सुरू; पण दोन दिवसांत बंद !

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

जिंती-मराठवाडी रिंगरोडचा प्रश्न : रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित, आंदोलनाचा इशारा

सणबूर : सतरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जिंती ते मराठवाडी रिंगरोडच्या कामाला मुहूर्त सापडला. मात्र दोन दिवसांतच कामाला ब्रेक लागल्याने ग्रामस्थांतून संतापाची लाट उसळली आहे. कृष्णा खोरेच्या नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामस्थ अक्षरश: वैतागले आहेत. रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा या भागातील जनतेने दिला आहे. युती शासनाच्या काळात १९९७ मध्ये वांग-मराठवाडी धरणाच्या कामाला सुरुवात झाली. धरणाच्या बॅक वॉटरच्यावरील बाजूस जिंतीसह अनेक लहान-मोठ्या १२ वाड्या-वस्त्या आहेत. या गावांना जोडणारा मराठवाडी ते जिंती रस्ता धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये जात आहे. त्यामुळे त्यावर आजपर्यंत कोणताही निधी शासनाने खर्ची टाकलेला नाही. त्यामुळे जिंती रस्ता वाहतुकीस योग्य राहिलाच नाही. रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. पावसाळ्यात अनेकवेळी जिंती संपर्कहीन होत आहे. त्यामुळे जिंती खोऱ्यातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर जिंतीसाठी पर्यायी रस्ता (रिंगरोड) हा मंजूर असून, हा कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे वर्ग असल्याचे ग्रामस्थ सांगत आहे. मात्र कृष्णा खोरेच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेली १७ वर्षे काम रखडले असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर या परिसरातील लोकांनी बहिष्कार टाकला होता. त्याला सर्व जिंती खोऱ्यातून चांगला प्रतिसादही मिळाला. त्यानंतर विधानसभेला नागरिकांनी मतदान करून आपला राग व्यक्त केला. ते निकालावरून स्पष्ट झाले होते. आज राज्यात पुन्हा युतीचे शासन सत्तेवर आले आहे.काम बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा संतापाची लाट पसरली असून, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कारभाराबद्दल लोकांच्या मनात शंका उपस्थित होत आहे. (वार्ताहर)पालकमंत्री परतले, काम थांबलेकाही दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी वांग-मराठवाडी धरणावर धरणग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी रिंगरोडचे गाऱ्हाणे पालकमंत्र्यांसमोर मांडण्यात आले होते. पालकमंंत्र्यांच्या दौऱ्यानंतर चारच दिवसांत रिंंगरोडच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, काम सुरू झाल्यानंतर दोनच दिवसांत रस्त्याच्या कामाला ब्रेक लागला. तो अद्याप तसाच आहे. रिंगरोडचे काम मार्गी लागले नाही, हे आमचे दुर्दैव असून, याला शासनच जबाबदार आहे. अजून आम्हाला किती दिवस रस्त्यासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागणार. काम बंद असण्याचे कारण संबंधितांनी स्पष्ट करावे. - अंकुश महाडिक, सामाजिक कार्यकर्ते, कोळेकरवाडी