शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

साखरवाडी कारखान्याचे दूषित पाणी ओढ्यात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:12 IST

जिंती : साखरवाडी (ता. फलटण) येथे असलेल्या कारखान्याचे रसायन व मळीमिश्रित सांडपाणी थेट कारखान्याजवळील ओढ्यामध्ये सोडण्यात आल्याने पाणी दुर्गंधीयुक्त ...

जिंती : साखरवाडी (ता. फलटण) येथे असलेल्या कारखान्याचे रसायन व मळीमिश्रित सांडपाणी थेट कारखान्याजवळील ओढ्यामध्ये सोडण्यात आल्याने पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. या पाण्यामुळे खालच्या भागातील गावे-वस्त्यांवरील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्यातील मासे व इतर जलचरही मृतावस्थेत आढळून येत आहेत. हा ओढा वाड्या-वस्तीवर जात आहे कारखान्याच्या सांडपाण्यामुळे हे प्रदूषित होत आहे.

साखरवाडी व पिंपळवाडी गावातून जाणारा हा ओढा पाण्याचा एक स्रोत म्हणून वापरला जातो कारखान्याचे सांडपाणी सोडण्यात आले असून, हे पाणी मळीमिश्रित व रसायनयुक्त आहे. जोशी वस्ती, पिंपळवाडी येथील वाडी-वस्तीमधून गावांमधून ओढ्याचे पाणी वाहत असते. वारंवार सांडपाणी ओढ्यात सोडले जात असून, सुरुवातीला कमी पाणी य़ेत असल्याने ग्रामस्थांना त्याचा त्रास जाणवत नव्हता. यंदा कारखान्याचे गाळप सुरू झाल्यापासून दोन महिन्यांपासून ओढा प्रदूषित झाला आहे. रसायनामुळे पाण्यावर पांढरा फेस आला आहे. पाणी काळसर दिसून येते आहे. सुमारे १ ते २ किलोमीटर परिसरात पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तसेच हे खराब पाणी विहिरीत उतरले असून, शेतीसाठी असलेल्या विहिरीमधील पाणी दूषित झालेले आहे. पिंपळवाडी गावाजवळील ओढ्यातील पाण्यात हे दूषित पाणी मिसळत आहे. नदीतील जलचर, शेती, ग्रामस्थ या सर्वांचे आरोग्य धोक्यात आल्याची ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केली आहे.

कारखान्याच्या खराब पाण्याचा गावाला त्रास होत आहे. तसेच कारखान्याच्या डिस्टिलरीच्या सांडपाण्याचे नियोजन दूषित पाण्यावर

प्रक्रिया करण्याची मागणी केली होती. त्यावेळी कारखान्याकडून सर्व उपाययोजना केल्या जातील, असेही कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

चौकट...

ओढा पूर्णपणे दूषित...

गेल्यावर्षी दूषित पाण्याचा हा त्रास जाणवला नाही. परंतु या गाळप हंगामामध्ये सांडपाण्याचा जास्त त्रास जाणवत आहे. पिंपळवाडी ओढ्यात कारखान्याचे खराब पाणी येत असल्याने ओढा पूर्णपणे दूषित झाला आहे. त्य़ामुळे ग्रामस्थांचे, जनावरांचे, शेती आरोग्य धोक्यात आले आहे. भविष्यात मोठी हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखान्याने त्वरित हे सांडपाणी सोडणे थांबविले पाहिजे. प्रशासनाने व सरकारी यंत्रणांनी दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

फोटो आहे...

१२जिंती०१/०२