शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

कास-बामणोलीत भलरी दादा भलरीच्या संगतीत भात लागवण

By admin | Updated: July 10, 2017 14:27 IST

शेतकऱ्याची लगबग : डोक्यावर इरले, पोती अन कागदाची टापूस बांधून लावणीला वेग

आॅनलाईन लोकमतपेट्री (जि. सातारा), दि. १0 : पश्चिम घाटात गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कास, बामणोली परिसरातील शेतकरी भात लावणीत मग्न आहेत. डोक्यावर इरले, पोती व कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात भाताची लावणी करण्यात मग्न झाले आहेत. तसेच भात लावणीसाठी बैलांच्या सहाय्याने चिखलणी करण्याचे कामही सुरू असल्याचे दिसून येत आहे.कास-बामणोली परिसर हा घाटमाथा म्हणून ओळखला जातो. हा भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. या भागात पावसाचे प्रमाण अधिक असते. येथील डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाते. यामुळे जमिनीत कमी प्रमाणात पाणी मुरते. लाल माती, मुरबाड जमीन असल्याने येथील शेतकरी भात, नाचणी, वरी ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. या भागातील जमिनी निकृष्ट, तीव्र डोंगर उतार व लाल मातीच्या असल्यामुळे चांगली पिके येण्यासाठी खूप मशागत करावी लागते. येथील शेतकरी डिसेंबर, जानेवारी महिन्यात ऐन, उंबर, जांभुळ अशा झाडांच्या फाद्यांची कवळे बांधली होती.होळीनंतर तयार केलेल्या तरव्यांची भाजणी केली गेली. मान्सूनपूर्व पावसाळ्याला सुरूवात होताच जून महिन्यात या तरव्यांमध्ये भातांच्या बियाण्यांची रोपे तयार करण्यासाठीची पेरणी करण्यात आली होती.भात लावणीसाठी तयार केलेली रोपे साधारणत: २१ ते ३० दिवसांपर्यंत योग्य वाढ झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने औताच्या साह्याने चिखलणी तयार करून या चिखलणीत तरव्यातील भाताच्या रोपांची लावणी करण्यात येत आहे.

गाण्यांची साथ...

डोक्यावर इरलीचा आधार घेऊन, पोती व कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात शेतकरी भाताची लावणी करत आहेत. भात लावणी करत असताना करमणुकीसाठी तसेच कामात कंटाळा येऊ नये म्हणून शेतकरी गिते म्हणताना दिसत आहेत.भाताची लावणी करण्यासाठी अनेकांची आवश्यकता लागत असते. लावणी करताना एकमेकांना मदत करण्यात येते. यालाच या परिसरात पैरा असे म्हटले जाते.- ज्ञानेश्वर आखाडे, शेतकरी, कुसुंबीमुरा