शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

कास-बामणोलीत भलरी दादा भलरीच्या संगतीत भात लागवण

By admin | Updated: July 10, 2017 14:27 IST

शेतकऱ्याची लगबग : डोक्यावर इरले, पोती अन कागदाची टापूस बांधून लावणीला वेग

आॅनलाईन लोकमतपेट्री (जि. सातारा), दि. १0 : पश्चिम घाटात गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कास, बामणोली परिसरातील शेतकरी भात लावणीत मग्न आहेत. डोक्यावर इरले, पोती व कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात भाताची लावणी करण्यात मग्न झाले आहेत. तसेच भात लावणीसाठी बैलांच्या सहाय्याने चिखलणी करण्याचे कामही सुरू असल्याचे दिसून येत आहे.कास-बामणोली परिसर हा घाटमाथा म्हणून ओळखला जातो. हा भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. या भागात पावसाचे प्रमाण अधिक असते. येथील डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाते. यामुळे जमिनीत कमी प्रमाणात पाणी मुरते. लाल माती, मुरबाड जमीन असल्याने येथील शेतकरी भात, नाचणी, वरी ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. या भागातील जमिनी निकृष्ट, तीव्र डोंगर उतार व लाल मातीच्या असल्यामुळे चांगली पिके येण्यासाठी खूप मशागत करावी लागते. येथील शेतकरी डिसेंबर, जानेवारी महिन्यात ऐन, उंबर, जांभुळ अशा झाडांच्या फाद्यांची कवळे बांधली होती.होळीनंतर तयार केलेल्या तरव्यांची भाजणी केली गेली. मान्सूनपूर्व पावसाळ्याला सुरूवात होताच जून महिन्यात या तरव्यांमध्ये भातांच्या बियाण्यांची रोपे तयार करण्यासाठीची पेरणी करण्यात आली होती.भात लावणीसाठी तयार केलेली रोपे साधारणत: २१ ते ३० दिवसांपर्यंत योग्य वाढ झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने औताच्या साह्याने चिखलणी तयार करून या चिखलणीत तरव्यातील भाताच्या रोपांची लावणी करण्यात येत आहे.

गाण्यांची साथ...

डोक्यावर इरलीचा आधार घेऊन, पोती व कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात शेतकरी भाताची लावणी करत आहेत. भात लावणी करत असताना करमणुकीसाठी तसेच कामात कंटाळा येऊ नये म्हणून शेतकरी गिते म्हणताना दिसत आहेत.भाताची लावणी करण्यासाठी अनेकांची आवश्यकता लागत असते. लावणी करताना एकमेकांना मदत करण्यात येते. यालाच या परिसरात पैरा असे म्हटले जाते.- ज्ञानेश्वर आखाडे, शेतकरी, कुसुंबीमुरा