शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सातारा जिल्ह्यात प्रथमच दोन वन उद्यानांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:13 IST

खंडाळा : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे..’ संतांच्या या उक्तीप्रमाणे भावी पिढीला सुरक्षित आणि संपन्न वृक्ष प्रजातींचा ठेवा देण्यासाठी राज्य सरकारच्या वन खात्याने उपवनांची निर्मिती करून वन उद्याने उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील पारगाव-खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यांतील गुरेघर या दोन ठिकाणी वन उद्यानांची निर्मिती केली जाणार ...

खंडाळा : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे..’ संतांच्या या उक्तीप्रमाणे भावी पिढीला सुरक्षित आणि संपन्न वृक्ष प्रजातींचा ठेवा देण्यासाठी राज्य सरकारच्या वन खात्याने उपवनांची निर्मिती करून वन उद्याने उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील पारगाव-खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यांतील गुरेघर या दोन ठिकाणी वन उद्यानांची निर्मिती केली जाणार असल्याने हा परिसर आता नंदनवन बनणार आहे.राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दोन ठिकाणी या पद्धतीने ३४ जिल्ह्यांत ६८ वन उद्यानांची निर्मिती वनविभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या वनांना ‘दिवंगत उत्तमराव पाटील वन उद्यान’ या नावाने संबोधले जाणार आहे. राज्यातील या उपवनांमधून फळवन, चंपकवन, कदंबवन, अशोकवन, आम्रवन, जंबुवन, वंशवन, मदन वृक्षवन, चरक वन, लतावन, सारिकावन, मगृसंचार वन, अतितिवन यासारखी विविध प्रकारची वने साकारली जात आहेत. यामध्ये प्रिय व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण करून उद्यानांमधून स्मृतिवने निर्माण केली जात आहेत. निरनिराळ्या वृक्ष प्रजातींचे समूह निर्माण करण्याबरोबरच दुर्मीळ, औषधी आणि सुंदर वृक्ष प्रजातींचे जतन आणि संवर्धन होणार आहे. शहरांमधील नागरिकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष प्रजाती व वन्यजीवांविषयी आस्था निर्माण व्हावी, त्यांचे या गोष्टींकडे लक्ष आकर्षित व्हावे, यासाठी या उद्यानात अभ्यासाबरोबर क्रीडा, व्यायाम आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.आता वन्यजीवांचा अभ्यास सोयीचा..सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातील पारगाव-खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील गुरेघर या दोन ठिकाणी अशा वन उद्यानांची निर्मिती होणार असल्याने आता विविध वृक्ष प्रजाती व वन्यजीवांचा अभ्यास करणे सोयीचे होणार आहे.संग्रहालय साकारणारया वन उद्यानांमध्ये वृक्ष-लतांचे महत्त्व आणि उपयोगिता यांची माहिती मिळावी, यासाठी पुस्तक संग्रहालय निर्माण करण्याचे व त्याद्वारे या सर्व माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे नियोजित आहे.