शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सातारा जिल्ह्यात प्रथमच दोन वन उद्यानांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:13 IST

खंडाळा : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे..’ संतांच्या या उक्तीप्रमाणे भावी पिढीला सुरक्षित आणि संपन्न वृक्ष प्रजातींचा ठेवा देण्यासाठी राज्य सरकारच्या वन खात्याने उपवनांची निर्मिती करून वन उद्याने उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील पारगाव-खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यांतील गुरेघर या दोन ठिकाणी वन उद्यानांची निर्मिती केली जाणार ...

खंडाळा : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे..’ संतांच्या या उक्तीप्रमाणे भावी पिढीला सुरक्षित आणि संपन्न वृक्ष प्रजातींचा ठेवा देण्यासाठी राज्य सरकारच्या वन खात्याने उपवनांची निर्मिती करून वन उद्याने उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील पारगाव-खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यांतील गुरेघर या दोन ठिकाणी वन उद्यानांची निर्मिती केली जाणार असल्याने हा परिसर आता नंदनवन बनणार आहे.राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दोन ठिकाणी या पद्धतीने ३४ जिल्ह्यांत ६८ वन उद्यानांची निर्मिती वनविभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या वनांना ‘दिवंगत उत्तमराव पाटील वन उद्यान’ या नावाने संबोधले जाणार आहे. राज्यातील या उपवनांमधून फळवन, चंपकवन, कदंबवन, अशोकवन, आम्रवन, जंबुवन, वंशवन, मदन वृक्षवन, चरक वन, लतावन, सारिकावन, मगृसंचार वन, अतितिवन यासारखी विविध प्रकारची वने साकारली जात आहेत. यामध्ये प्रिय व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण करून उद्यानांमधून स्मृतिवने निर्माण केली जात आहेत. निरनिराळ्या वृक्ष प्रजातींचे समूह निर्माण करण्याबरोबरच दुर्मीळ, औषधी आणि सुंदर वृक्ष प्रजातींचे जतन आणि संवर्धन होणार आहे. शहरांमधील नागरिकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष प्रजाती व वन्यजीवांविषयी आस्था निर्माण व्हावी, त्यांचे या गोष्टींकडे लक्ष आकर्षित व्हावे, यासाठी या उद्यानात अभ्यासाबरोबर क्रीडा, व्यायाम आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.आता वन्यजीवांचा अभ्यास सोयीचा..सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातील पारगाव-खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील गुरेघर या दोन ठिकाणी अशा वन उद्यानांची निर्मिती होणार असल्याने आता विविध वृक्ष प्रजाती व वन्यजीवांचा अभ्यास करणे सोयीचे होणार आहे.संग्रहालय साकारणारया वन उद्यानांमध्ये वृक्ष-लतांचे महत्त्व आणि उपयोगिता यांची माहिती मिळावी, यासाठी पुस्तक संग्रहालय निर्माण करण्याचे व त्याद्वारे या सर्व माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे नियोजित आहे.