शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

कालव्यांची निर्मिती.. .. ओढ्यांना काळ !

By admin | Updated: April 8, 2016 23:55 IST

फलटण पश्चिम तालुका : जलस्त्रोत आटल्याने पाण्यासाठी वणवण--पाणी अखेर पळविले कुठे?

सूर्यकांत निंबाळकर-- आदर्की --तालुक्याच्या पश्चिम भागातील सालपे ते बीबी गावापर्यंत धोम-बलकवडीचा उजवा कालवा डोंगर पायथा भागातून गेला आहे. हा कालवा दुष्काळी भागाला जरी वरदान ठरला असला तरी कालव्याच्या वरून वाहणारे ओढे कोरडे पडले आहेत. पावसात वाहत जाणारे पाणी ओढ्यांऐवजी कालव्यात जात आहे. परिणामी पश्चिमेकडील हिंगणगावसह अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसत असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.हिंगणगाव महसुली विभागातील आदर्की रेल्वेस्टेशन परिसरात ब्रिटिशकाळात रेल्वेलाईन तयार करण्यासाठी बोगद्याचे काम सुरूअसताना पाणीसाठा सापडला. रेल्वे प्रशासन व ठेकेदार यांनी डिझेल इंजिनद्वारे जलस्त्रोत बंद करण्याचा प्रयत्न केला. यात अपयश आल्याने अखेर लोखंड व सिमेंट टाकून जलस्त्रोत मुजविण्यात आला. यानंतर त्याठिकाणी रेल्वेलाईनचे काम करण्यात आले. रेल्वेलाईन खालून तीस मीटर खोल खोदकाम करून १२०० मीटरचा बोगदा तयार करण्यात आला. त्यावेळी २० अश्वशक्ती विद्युत मोटाराएवढे पाणी बोगद्यात पडत होते. नैसर्गिक पाण्यामुळे बोगद्याच्या काँक्रिटीकरणाचे कामही अद्याप अपूर्ण आहे. हिंगणगावजवळील धनगरवाडा ओढ्यावर तीन पाझर तलाव असून, हे तिन्ही तलाव कोरडे पडत नाहीत. यावर्षी हे ओढे कोरडे पडले पाझर तलावांसह हिंगणगाव परिसरातील विहिरीही आटल्या आहेत. धनगरवाडा येथील पाणीपुरवठा करणारी विहीरही कोरडी पडल्यामुळे हिंगणगाव ग्रामपंचायतीमार्फत विहिरीत टँकरद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आठवड्यातून दोनदाच पाणी मिळत आहे. नवीन विहिरीचे खोदकामग्रामपंचायतीने बुरखुंडी धरणाजवळ दुसरी विहीर खोदून पाच हजार फूट पाईपलाईन टाकून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचे काम सुरू केले आहे. हिंगणगावच्या ओढ्याचे पाणी कालव्यात गेल्याने ओढा कोरडा पडला असून, त्यामुळे या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली.