शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

कालव्यांची निर्मिती.. .. ओढ्यांना काळ !

By admin | Updated: April 8, 2016 23:55 IST

फलटण पश्चिम तालुका : जलस्त्रोत आटल्याने पाण्यासाठी वणवण--पाणी अखेर पळविले कुठे?

सूर्यकांत निंबाळकर-- आदर्की --तालुक्याच्या पश्चिम भागातील सालपे ते बीबी गावापर्यंत धोम-बलकवडीचा उजवा कालवा डोंगर पायथा भागातून गेला आहे. हा कालवा दुष्काळी भागाला जरी वरदान ठरला असला तरी कालव्याच्या वरून वाहणारे ओढे कोरडे पडले आहेत. पावसात वाहत जाणारे पाणी ओढ्यांऐवजी कालव्यात जात आहे. परिणामी पश्चिमेकडील हिंगणगावसह अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसत असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.हिंगणगाव महसुली विभागातील आदर्की रेल्वेस्टेशन परिसरात ब्रिटिशकाळात रेल्वेलाईन तयार करण्यासाठी बोगद्याचे काम सुरूअसताना पाणीसाठा सापडला. रेल्वे प्रशासन व ठेकेदार यांनी डिझेल इंजिनद्वारे जलस्त्रोत बंद करण्याचा प्रयत्न केला. यात अपयश आल्याने अखेर लोखंड व सिमेंट टाकून जलस्त्रोत मुजविण्यात आला. यानंतर त्याठिकाणी रेल्वेलाईनचे काम करण्यात आले. रेल्वेलाईन खालून तीस मीटर खोल खोदकाम करून १२०० मीटरचा बोगदा तयार करण्यात आला. त्यावेळी २० अश्वशक्ती विद्युत मोटाराएवढे पाणी बोगद्यात पडत होते. नैसर्गिक पाण्यामुळे बोगद्याच्या काँक्रिटीकरणाचे कामही अद्याप अपूर्ण आहे. हिंगणगावजवळील धनगरवाडा ओढ्यावर तीन पाझर तलाव असून, हे तिन्ही तलाव कोरडे पडत नाहीत. यावर्षी हे ओढे कोरडे पडले पाझर तलावांसह हिंगणगाव परिसरातील विहिरीही आटल्या आहेत. धनगरवाडा येथील पाणीपुरवठा करणारी विहीरही कोरडी पडल्यामुळे हिंगणगाव ग्रामपंचायतीमार्फत विहिरीत टँकरद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आठवड्यातून दोनदाच पाणी मिळत आहे. नवीन विहिरीचे खोदकामग्रामपंचायतीने बुरखुंडी धरणाजवळ दुसरी विहीर खोदून पाच हजार फूट पाईपलाईन टाकून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचे काम सुरू केले आहे. हिंगणगावच्या ओढ्याचे पाणी कालव्यात गेल्याने ओढा कोरडा पडला असून, त्यामुळे या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली.