शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

कालव्यांची निर्मिती.. .. ओढ्यांना काळ !

By admin | Updated: April 8, 2016 23:55 IST

फलटण पश्चिम तालुका : जलस्त्रोत आटल्याने पाण्यासाठी वणवण--पाणी अखेर पळविले कुठे?

सूर्यकांत निंबाळकर-- आदर्की --तालुक्याच्या पश्चिम भागातील सालपे ते बीबी गावापर्यंत धोम-बलकवडीचा उजवा कालवा डोंगर पायथा भागातून गेला आहे. हा कालवा दुष्काळी भागाला जरी वरदान ठरला असला तरी कालव्याच्या वरून वाहणारे ओढे कोरडे पडले आहेत. पावसात वाहत जाणारे पाणी ओढ्यांऐवजी कालव्यात जात आहे. परिणामी पश्चिमेकडील हिंगणगावसह अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसत असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.हिंगणगाव महसुली विभागातील आदर्की रेल्वेस्टेशन परिसरात ब्रिटिशकाळात रेल्वेलाईन तयार करण्यासाठी बोगद्याचे काम सुरूअसताना पाणीसाठा सापडला. रेल्वे प्रशासन व ठेकेदार यांनी डिझेल इंजिनद्वारे जलस्त्रोत बंद करण्याचा प्रयत्न केला. यात अपयश आल्याने अखेर लोखंड व सिमेंट टाकून जलस्त्रोत मुजविण्यात आला. यानंतर त्याठिकाणी रेल्वेलाईनचे काम करण्यात आले. रेल्वेलाईन खालून तीस मीटर खोल खोदकाम करून १२०० मीटरचा बोगदा तयार करण्यात आला. त्यावेळी २० अश्वशक्ती विद्युत मोटाराएवढे पाणी बोगद्यात पडत होते. नैसर्गिक पाण्यामुळे बोगद्याच्या काँक्रिटीकरणाचे कामही अद्याप अपूर्ण आहे. हिंगणगावजवळील धनगरवाडा ओढ्यावर तीन पाझर तलाव असून, हे तिन्ही तलाव कोरडे पडत नाहीत. यावर्षी हे ओढे कोरडे पडले पाझर तलावांसह हिंगणगाव परिसरातील विहिरीही आटल्या आहेत. धनगरवाडा येथील पाणीपुरवठा करणारी विहीरही कोरडी पडल्यामुळे हिंगणगाव ग्रामपंचायतीमार्फत विहिरीत टँकरद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आठवड्यातून दोनदाच पाणी मिळत आहे. नवीन विहिरीचे खोदकामग्रामपंचायतीने बुरखुंडी धरणाजवळ दुसरी विहीर खोदून पाच हजार फूट पाईपलाईन टाकून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचे काम सुरू केले आहे. हिंगणगावच्या ओढ्याचे पाणी कालव्यात गेल्याने ओढा कोरडा पडला असून, त्यामुळे या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली.