मणदूरे : भारताची राज्यघटना नागरिकांचा अभिमानाचा विषय आहे. यावर्षी राज्यघटनेला ६५ वर्षे होत असून गुरुवारी सर्वत्र संविधान दिन साजरा होत आहे. ही राज्यघटना घरोघरी पोहोचावी, यासाठी पाटण येथील अॅड. सौरभ देशपांडे यांनी तीन वर्षांत चक्क ३९५ कलमांच्या राज्यघटनेचे ३ हजार ओव्यांमध्ये रूपांतर केले आहे. यासाठी त्यांनी तीन वर्षे प्रयत्न केले आहेत. राज्यघटना आणि नागरिक यांच्यामधील दरी कमी व्हावी, या हेतूने घटनेचे सुलभ रूप साकारण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेत कायद्याविषयी जागृती व्हावी, तसेच लोकशिक्षणही व्हावे, असा दृष्टिकोन असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.ओवीची सर्व लक्षणे सांभाळून व त्याचबरोबर घटनेच्या शब्दांना व अर्थाला कुठेही धक्का न लावता हे रूपांतर करण्यात आले आहे. ग्यानबाची राज्यघटना या नावाने ३९५ कलमांचे ३००० ओव्यांमध्ये रूपांतर केले आहे. (वार्ताहर)‘ग्यानबाची राज्यघटने’ची कथाजुन्या पिढीतील समाजवादी नेते बॅरिस्टर न्या. पै यांची भारतीय राज्यघटना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, अशी इच्छा होती. त्यासाठी ग्यानबाची राज्यघटना कोणीतरी लिहिली पाहिजे, असे ते एकदा म्हणाले होते. न्या. पै यांनीच वापरलेला शब्दप्रयोग या नावाने घटनेचे ओवीत रूपांतर केले, असल्याचे अॅड. देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्यघटना व सामान्य जनतेमधील दरी कमी व्हावी. भावनेचा विषय न होता, राज्यघटना हा अभ्यासाचा विषय व्हावा, यासाठी मूळ अर्थ व घटना दुरुस्तीला धक्का न लावता ओवीत रूपांतर केले आहे.- अॅड. सौरभ देशपांडे, पाटणअशा आहेत ओव्याआम्ही नागरिक भारताचे।बनवितो संविधान आमुचेघेऊनिया अधिष्ठान तत्वांचे। पुढीलप्रमाणेसार्वभौम प्रजासत्ताक।समाजवादी अन् धर्मनिरपेक्षलोकशाही गणराज्य।असेल अमुचे हे।।सामाजिक आणि आर्थिक।आणि तैसेचि राजकीयऐसा असेल सकळांस।न्याय येथे
राज्यघटनेच्या कलमांच्या बनविल्या ओव्या!
By admin | Updated: November 25, 2015 23:53 IST