शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीबरोबरच संवर्धन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:26 IST

रहिमतपूर : ‘वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे. पर्यावरणाचा समतोल अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी वृक्षलागवडीबरोबरच त्याचे संवर्धन करावे,’ असे आवाहन ...

रहिमतपूर : ‘वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे. पर्यावरणाचा समतोल अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी वृक्षलागवडीबरोबरच त्याचे संवर्धन करावे,’ असे आवाहन प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी केले.

कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कृषीदिन व वनमहोत्सवदिनानिमित्त वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, विस्तार अधिकारी सपना जाधव, मंडल अधिकारी विनोद सावंत, शाखा अभियंता टिकोळे, सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच शंकर गायकवाड, तलाठी राहुल होनराव, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र निकम, कृषी सहायक गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

पर्यावरणाची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे वृक्षलागवडीचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण वृक्ष लागवडीबरोबच वृक्षसंगोपनही तितकेच गरजेचे आहे. आजच्या तरुण पिढीकडे नवीन संकल्पना आणि अफाट ऊर्जा आहे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि युवा पिढीची ताकद एकत्र आली तर कुठलेच काम अशक्य नाही. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन या संकल्पास आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवून मोकळेपणाने जगण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन ज्योती पाटील यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत हद्दीमध्ये विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली.

०७रहिमतपूर

फोटो : वाठार किरोली, ता. कोरेगाव येथे ज्योती पाटील, अमोल कदम, भीमराव पाटील आदींच्या उपस्थितीत वृक्षलागवड करण्यात आली. (छाया : जयदीप जाधव)