शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

वृक्षलागवडीबरोबरच संवर्धन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:26 IST

रहिमतपूर : ‘वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे. पर्यावरणाचा समतोल अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी वृक्षलागवडीबरोबरच त्याचे संवर्धन करावे,’ असे आवाहन ...

रहिमतपूर : ‘वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे. पर्यावरणाचा समतोल अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी वृक्षलागवडीबरोबरच त्याचे संवर्धन करावे,’ असे आवाहन प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी केले.

कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कृषीदिन व वनमहोत्सवदिनानिमित्त वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, विस्तार अधिकारी सपना जाधव, मंडल अधिकारी विनोद सावंत, शाखा अभियंता टिकोळे, सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच शंकर गायकवाड, तलाठी राहुल होनराव, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र निकम, कृषी सहायक गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

पर्यावरणाची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे वृक्षलागवडीचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण वृक्ष लागवडीबरोबच वृक्षसंगोपनही तितकेच गरजेचे आहे. आजच्या तरुण पिढीकडे नवीन संकल्पना आणि अफाट ऊर्जा आहे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि युवा पिढीची ताकद एकत्र आली तर कुठलेच काम अशक्य नाही. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन या संकल्पास आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवून मोकळेपणाने जगण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन ज्योती पाटील यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत हद्दीमध्ये विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली.

०७रहिमतपूर

फोटो : वाठार किरोली, ता. कोरेगाव येथे ज्योती पाटील, अमोल कदम, भीमराव पाटील आदींच्या उपस्थितीत वृक्षलागवड करण्यात आली. (छाया : जयदीप जाधव)