शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

वृक्षलागवडीबरोबरच संवर्धन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:26 IST

रहिमतपूर : ‘वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे. पर्यावरणाचा समतोल अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी वृक्षलागवडीबरोबरच त्याचे संवर्धन करावे,’ असे आवाहन ...

रहिमतपूर : ‘वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे. पर्यावरणाचा समतोल अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी वृक्षलागवडीबरोबरच त्याचे संवर्धन करावे,’ असे आवाहन प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी केले.

कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कृषीदिन व वनमहोत्सवदिनानिमित्त वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, विस्तार अधिकारी सपना जाधव, मंडल अधिकारी विनोद सावंत, शाखा अभियंता टिकोळे, सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच शंकर गायकवाड, तलाठी राहुल होनराव, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र निकम, कृषी सहायक गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

पर्यावरणाची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे वृक्षलागवडीचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण वृक्ष लागवडीबरोबच वृक्षसंगोपनही तितकेच गरजेचे आहे. आजच्या तरुण पिढीकडे नवीन संकल्पना आणि अफाट ऊर्जा आहे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि युवा पिढीची ताकद एकत्र आली तर कुठलेच काम अशक्य नाही. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन या संकल्पास आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवून मोकळेपणाने जगण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन ज्योती पाटील यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत हद्दीमध्ये विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली.

०७रहिमतपूर

फोटो : वाठार किरोली, ता. कोरेगाव येथे ज्योती पाटील, अमोल कदम, भीमराव पाटील आदींच्या उपस्थितीत वृक्षलागवड करण्यात आली. (छाया : जयदीप जाधव)