शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीबरोबरच संवर्धन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:26 IST

रहिमतपूर : ‘वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे. पर्यावरणाचा समतोल अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी वृक्षलागवडीबरोबरच त्याचे संवर्धन करावे,’ असे आवाहन ...

रहिमतपूर : ‘वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे. पर्यावरणाचा समतोल अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी वृक्षलागवडीबरोबरच त्याचे संवर्धन करावे,’ असे आवाहन प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी केले.

कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कृषीदिन व वनमहोत्सवदिनानिमित्त वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, विस्तार अधिकारी सपना जाधव, मंडल अधिकारी विनोद सावंत, शाखा अभियंता टिकोळे, सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच शंकर गायकवाड, तलाठी राहुल होनराव, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र निकम, कृषी सहायक गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

पर्यावरणाची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे वृक्षलागवडीचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण वृक्ष लागवडीबरोबच वृक्षसंगोपनही तितकेच गरजेचे आहे. आजच्या तरुण पिढीकडे नवीन संकल्पना आणि अफाट ऊर्जा आहे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि युवा पिढीची ताकद एकत्र आली तर कुठलेच काम अशक्य नाही. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन या संकल्पास आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवून मोकळेपणाने जगण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन ज्योती पाटील यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत हद्दीमध्ये विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली.

०७रहिमतपूर

फोटो : वाठार किरोली, ता. कोरेगाव येथे ज्योती पाटील, अमोल कदम, भीमराव पाटील आदींच्या उपस्थितीत वृक्षलागवड करण्यात आली. (छाया : जयदीप जाधव)