शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

साठ गावांसह वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:22 IST

ढेबेवाडी : वांग नदीला आलेल्या महापुरामुळे ढेबेवाडी विभागातील पंधरा छोटे-मोठे पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली असल्याने साठ गावे आणि वाड्यावस्त्या ...

ढेबेवाडी : वांग नदीला आलेल्या महापुरामुळे ढेबेवाडी विभागातील पंधरा छोटे-मोठे पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली असल्याने साठ गावे आणि वाड्यावस्त्या संपर्कहीन झाल्या आहेत. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणचे पूल तुटले असून, बहुतेक पुलांचा भराव वाहून गेला आहे. मेंढ, घोटील आणि जितकरवाडी आदी ठिकाणी भूस्खलन झाल्याने तेथील गावांचा धोका वाढला आहे. मराठवाडी धरणात पाणीसाठा वाढल्याने उमरकांचन येथील धरणग्रस्तांच्या घरांना पाण्याने वेढा दिला आहे.

ढेबेवाडी विभागातील सणबूर, जिंती, काळगाव खोऱ्यासह संपूर्ण वाल्मीक पठारावर मुसळधार पावसाने बुधवारी रात्रीपासून थैमान घातले आहे. येथील मेंढनजीक धरणग्रस्तांसाठी बनविलेल्या तात्पुरत्या शेडजवळच भूस्खलन झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. डोंगरपठारासह पायथ्याशी वसलेल्या गावांवर आता भूस्खलनाचा धोका वाढल्याने येथील जनता जीव मुठीत धरून आहे.

वांग नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने बनपुरी, भालेकरवाडी, मंद्रुळकोळे, मालदन, खळे, काढणे, पवारवाडी, धामणी, काळगाव आदी ठिकाणचे मोठे पूल, तर ओढ्यांवर असलेले फरशी पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली गेल्याने विभागातील दळणवळण ठप्प झाले आहे. या महापुरामुळे जितकरवाडी येथील पुलाचे मोठे नुकसान झाले असून, भरावही वाहून गेला आहे तर सहा कोटी रुपये खर्चून याचवर्षी उभारलेला काढण्यानजीकच्या पुलाचा भराव खचून पुलालाही धोका निर्माण झाला आहे तर अनेक फरशीपुलांचे मोठे नुकसान झाल्याने गावेच्या गावे संपर्कहीन झाली आहेत.

वाल्मीक पठारावरील निगडे, निवी, कसणी, मत्रेवाडी, सलतेवाडी, घोटील, म्हाइंगडेवाडी गावांना जोडणारा पवारवाडी येथील पूलच पाण्याखाली गेला असून, भरावही वाहून गेल्याने येथील अनेकजन अडकून पडले आहेत. उधवणे, रुवले, पाटीलवाडी, सातर, तामीणे, वाल्मीक या गावांना जोडणारा सणबूरनजीकचा ओढ्यावरील पूलच तुटल्यामुळे वाल्मीक पठारच संपर्कहीन झाले आहे.

दरम्यान, नदीकाठी आणि ओढ्याकाठी असलेल्या या विभागातील शेतजमिनींना मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. या पुराच्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेती पिकांसह वाहून गेली आहे. यामध्ये भातशेती आणि ऊसशेतीला मोठा फटका बसला आहे. मराठवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने मेंढ येथील मंदिरे पाण्यात बुडाली असून, उमरकांचन येथील धरणग्रस्तांच्या घरात पाणी शिरले आहे. यामुळे धरणग्रस्तांनी तातडीने निवाराशेडमध्ये आपला संसार हलविला.

चौकट

यंत्रणा सतर्क; पण गावांचा संपर्कच होईना..

ढेबेवाडी तळमावले याठिकाणी पोलीस आणि महसूल यंत्रणा सतर्क असली तरी आपत्ती घडलेल्या गावांपर्यंत पोहोचण्यात मोठ्या अडचणी येऊ लागल्याने मोठी कसरत करावी लागते आहे.

फोटो

२३ढेबेवाडी

ढेबेवाडी विभागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते, पूल वाहून गेले आहेत. (छाया : रवींद्र माने)