शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

साठ गावांसह वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:22 IST

ढेबेवाडी : वांग नदीला आलेल्या महापुरामुळे ढेबेवाडी विभागातील पंधरा छोटे-मोठे पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली असल्याने साठ गावे आणि वाड्यावस्त्या ...

ढेबेवाडी : वांग नदीला आलेल्या महापुरामुळे ढेबेवाडी विभागातील पंधरा छोटे-मोठे पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली असल्याने साठ गावे आणि वाड्यावस्त्या संपर्कहीन झाल्या आहेत. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणचे पूल तुटले असून, बहुतेक पुलांचा भराव वाहून गेला आहे. मेंढ, घोटील आणि जितकरवाडी आदी ठिकाणी भूस्खलन झाल्याने तेथील गावांचा धोका वाढला आहे. मराठवाडी धरणात पाणीसाठा वाढल्याने उमरकांचन येथील धरणग्रस्तांच्या घरांना पाण्याने वेढा दिला आहे.

ढेबेवाडी विभागातील सणबूर, जिंती, काळगाव खोऱ्यासह संपूर्ण वाल्मीक पठारावर मुसळधार पावसाने बुधवारी रात्रीपासून थैमान घातले आहे. येथील मेंढनजीक धरणग्रस्तांसाठी बनविलेल्या तात्पुरत्या शेडजवळच भूस्खलन झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. डोंगरपठारासह पायथ्याशी वसलेल्या गावांवर आता भूस्खलनाचा धोका वाढल्याने येथील जनता जीव मुठीत धरून आहे.

वांग नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने बनपुरी, भालेकरवाडी, मंद्रुळकोळे, मालदन, खळे, काढणे, पवारवाडी, धामणी, काळगाव आदी ठिकाणचे मोठे पूल, तर ओढ्यांवर असलेले फरशी पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली गेल्याने विभागातील दळणवळण ठप्प झाले आहे. या महापुरामुळे जितकरवाडी येथील पुलाचे मोठे नुकसान झाले असून, भरावही वाहून गेला आहे तर सहा कोटी रुपये खर्चून याचवर्षी उभारलेला काढण्यानजीकच्या पुलाचा भराव खचून पुलालाही धोका निर्माण झाला आहे तर अनेक फरशीपुलांचे मोठे नुकसान झाल्याने गावेच्या गावे संपर्कहीन झाली आहेत.

वाल्मीक पठारावरील निगडे, निवी, कसणी, मत्रेवाडी, सलतेवाडी, घोटील, म्हाइंगडेवाडी गावांना जोडणारा पवारवाडी येथील पूलच पाण्याखाली गेला असून, भरावही वाहून गेल्याने येथील अनेकजन अडकून पडले आहेत. उधवणे, रुवले, पाटीलवाडी, सातर, तामीणे, वाल्मीक या गावांना जोडणारा सणबूरनजीकचा ओढ्यावरील पूलच तुटल्यामुळे वाल्मीक पठारच संपर्कहीन झाले आहे.

दरम्यान, नदीकाठी आणि ओढ्याकाठी असलेल्या या विभागातील शेतजमिनींना मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. या पुराच्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेती पिकांसह वाहून गेली आहे. यामध्ये भातशेती आणि ऊसशेतीला मोठा फटका बसला आहे. मराठवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने मेंढ येथील मंदिरे पाण्यात बुडाली असून, उमरकांचन येथील धरणग्रस्तांच्या घरात पाणी शिरले आहे. यामुळे धरणग्रस्तांनी तातडीने निवाराशेडमध्ये आपला संसार हलविला.

चौकट

यंत्रणा सतर्क; पण गावांचा संपर्कच होईना..

ढेबेवाडी तळमावले याठिकाणी पोलीस आणि महसूल यंत्रणा सतर्क असली तरी आपत्ती घडलेल्या गावांपर्यंत पोहोचण्यात मोठ्या अडचणी येऊ लागल्याने मोठी कसरत करावी लागते आहे.

फोटो

२३ढेबेवाडी

ढेबेवाडी विभागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते, पूल वाहून गेले आहेत. (छाया : रवींद्र माने)