शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

काँगे्रसने पंचमहाभुतेही खाल्ली!

By admin | Updated: May 29, 2015 23:46 IST

जावडेकरांचा घणाघात : मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मांडला तुलनात्मक आढावा

सातारा : काँगे्रस सरकारने कोळसा, जमीन , टू जी स्पेक्ट्रम असे घोटाळे करुन पंचमहाभूतांनाही खाऊन टाकले आहे. घोटाळ्यांचे आॅलिम्पिक रेकॉर्ड करण्यासाठी काँगे्रसच्या सरकारमध्ये चढाओढ लागली होती, असा घणाघात पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी साताऱ्यात केला. मोदी सरकारने वर्षभराच्या कालखंडात केलेल्या लोकोपयोगी कामांची जंत्रीही त्यांनी यावेळी मांडली.केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात सरकारने केलेल्या लोकोपयोगी कामांची माहिती देण्यासाठी येथील श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत जावडेकर बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, माजी आमदार कांताताई नलावडे, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, माजी नगरसेवक किशोर गोडबोले यांची व्यासपीठावर उपस्थित होती.दिल्लीपासून आपलं कथापुरान सुरु करत असल्याचं म्हणत जावडेकरांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘काँगे्रसने १४0 कार्पोरेट कंपन्यांना १७00 कोटी टन कोळसा फुक्कट दिला. आपल्या देशात रेशन फुक्कट मिळत नाही, त्या ठिकाणी हा निर्णय घेतला गेला. आमच्या सरकारनं देशातील २00 खाणींपैकी ३७ कोळसा खाणींचा लिलाव करुन सरकारच्या तिजोरीत ३ लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा केली. पंतप्रधान मनमोहन सिंग होते, पण सर्व अधिकारी सोनिया गांधी व राहूल गांधींकडे होते. त्यांच्या सरकारने २ जी स्पेक्ट्रम घोटाळा केला. याचा फेरलिलाव करुन भाजप सरकारने १ लाख ९ हजार कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा केले. सीडब्ल्यूजी चा ६५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. खेळाच्या मैदानातही त्यांनी घोटाळे केले. जिजाजी-दामाद घोटाळाही मधल्या काळात गाजला. सरकारचे वजन वापरुन काँगे्रसने ‘जावयांना’ ८ कोटींना जमीन दिली. तीच जमीन जावयाने ५८ कोटी रुपयांना विकली.’देश वाचला तर पर्यावरण वाचेल, या धोरणानुसार संरक्षण खात्याच्या ६ हजार किलोमीटर चा रस्ता तयार करण्याच्या प्रस्तावाला भाजपने ६ दिवसांत मंजुरी दिली. गॅसची सबसिडी खात्यावर जमा करण्यात येत असल्याने काळाबाजार थांबला. तसेच देशातील ५ लाख लोकांनी सबसिडी नाकारली. ती सबसिडी गरिबांना देण्यात येत आहे. प्रधानमंत्री जीवनसुरक्षा योजना, अटल पेन्शन योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना संरक्षणाचे कवच दिले. अटल पेन्शन योजनेत ८ कोटी लोकांनी प्रिमिअम भरला. (प्रतिनिधी)भाजपमधील फूट उघडभाजपच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे निरोप पदाधिकाऱ्यांनाही दिले गेले नव्हते. याबाबत भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष सुनील काळेकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे भाजपमधील फूट उघडपणे समोर आली.