शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

काँगे्रसने पंचमहाभुतेही खाल्ली!

By admin | Updated: May 29, 2015 23:46 IST

जावडेकरांचा घणाघात : मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मांडला तुलनात्मक आढावा

सातारा : काँगे्रस सरकारने कोळसा, जमीन , टू जी स्पेक्ट्रम असे घोटाळे करुन पंचमहाभूतांनाही खाऊन टाकले आहे. घोटाळ्यांचे आॅलिम्पिक रेकॉर्ड करण्यासाठी काँगे्रसच्या सरकारमध्ये चढाओढ लागली होती, असा घणाघात पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी साताऱ्यात केला. मोदी सरकारने वर्षभराच्या कालखंडात केलेल्या लोकोपयोगी कामांची जंत्रीही त्यांनी यावेळी मांडली.केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात सरकारने केलेल्या लोकोपयोगी कामांची माहिती देण्यासाठी येथील श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत जावडेकर बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, माजी आमदार कांताताई नलावडे, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, माजी नगरसेवक किशोर गोडबोले यांची व्यासपीठावर उपस्थित होती.दिल्लीपासून आपलं कथापुरान सुरु करत असल्याचं म्हणत जावडेकरांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘काँगे्रसने १४0 कार्पोरेट कंपन्यांना १७00 कोटी टन कोळसा फुक्कट दिला. आपल्या देशात रेशन फुक्कट मिळत नाही, त्या ठिकाणी हा निर्णय घेतला गेला. आमच्या सरकारनं देशातील २00 खाणींपैकी ३७ कोळसा खाणींचा लिलाव करुन सरकारच्या तिजोरीत ३ लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा केली. पंतप्रधान मनमोहन सिंग होते, पण सर्व अधिकारी सोनिया गांधी व राहूल गांधींकडे होते. त्यांच्या सरकारने २ जी स्पेक्ट्रम घोटाळा केला. याचा फेरलिलाव करुन भाजप सरकारने १ लाख ९ हजार कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा केले. सीडब्ल्यूजी चा ६५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. खेळाच्या मैदानातही त्यांनी घोटाळे केले. जिजाजी-दामाद घोटाळाही मधल्या काळात गाजला. सरकारचे वजन वापरुन काँगे्रसने ‘जावयांना’ ८ कोटींना जमीन दिली. तीच जमीन जावयाने ५८ कोटी रुपयांना विकली.’देश वाचला तर पर्यावरण वाचेल, या धोरणानुसार संरक्षण खात्याच्या ६ हजार किलोमीटर चा रस्ता तयार करण्याच्या प्रस्तावाला भाजपने ६ दिवसांत मंजुरी दिली. गॅसची सबसिडी खात्यावर जमा करण्यात येत असल्याने काळाबाजार थांबला. तसेच देशातील ५ लाख लोकांनी सबसिडी नाकारली. ती सबसिडी गरिबांना देण्यात येत आहे. प्रधानमंत्री जीवनसुरक्षा योजना, अटल पेन्शन योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना संरक्षणाचे कवच दिले. अटल पेन्शन योजनेत ८ कोटी लोकांनी प्रिमिअम भरला. (प्रतिनिधी)भाजपमधील फूट उघडभाजपच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे निरोप पदाधिकाऱ्यांनाही दिले गेले नव्हते. याबाबत भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष सुनील काळेकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे भाजपमधील फूट उघडपणे समोर आली.