शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

कारखान्यांचे पाप तर काँग्रेसचेच !

By admin | Updated: April 11, 2016 00:38 IST

मकरंद पाटील : आरोपाला सडेतोड उत्तर

लोणंद : लोणंदमध्ये ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजनेच्या निधीतून राष्ट्रवादी काँग्रेसने विकास केला आहे. लोणंदच्या औद्योगिक वसाहतीच्या प्रदूषणाचा त्रास लोणंदकरांना सहन करावा लागत आहे. याचे खापर आमच्या माथी मारणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनीच त्यांच्या सत्तेच्या काळात कारखान्यांना ग्रामपंचायतीच्या परवानग्या दिल्या आहेत,’ असा पोलखोल आमदार मकरंद पाटील यांनी करून काँग्रेसच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले. लोणंद येथील राष्ट्रवादी काँग्रेस उमेवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मनोज पवार, एन. डी. क्षीरसागर, विश्वास शिरतोडे, दादासाहेब ठोंबरे, बबनराव शेळके, रतन जाधव, नाना जाधव, गीतांजली क्षीरसागर, लीलाबाई जाधव उपस्थित होते. आमदार मकरंद पाटील म्हणाले, ‘लोणंद शहराचा कायापालट करण्याचा राष्ट्रवादीने प्रामाणिक प्रयत्न केला आहे. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते आरोप करीत आहेत. लोणंदच्या औद्योगिक कंपन्यांना उभारणीचे स्थानिक परवाने ग्रामपंचायतीने विरोधकांच्याच काळात दिले. उलटपक्षी माझ्याकडे लोकांच्या कंपनीसंदर्भातील तक्रारी आल्यानंतर संबंधित कंपन्यांना मी सूचना देऊन योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना केल्या; परंतु आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्यावर खोटे आरोप करण्याची विरोधकांची सवय आहे. त्याला जनताच उत्तर देईल.’ आनंदराव शेळके-पाटील म्हणाले, ‘लोणंदच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी मिळविला. विरोधकांना पंधरा वर्षांत जे जमले नाही, ती कामे आम्ही मार्गी लावली. लोणंद नगरपंचायतीला विरोध केला हा आरोप खोडसाळपणाचा आहे.’विश्वास शिरतोडे म्हणाले, ‘ज्याला विकास कळतो तोच राजकारणात टिकून राहतो. इंदिरानगरमध्ये ज्यांना रस्त्यावर डांबराचा एक बॅरलही ओतता आला नाही. त्यांनी आम्हाला विकास शिकवू नये.’ (वार्ताहर)राष्ट्रवादीकडे अपक्षांचा कलया निवडणुकीत अपक्षांनी राष्ट्रवादीकडे झुकण्याचा कल दिसत आहे. प्रभाग चारमध्ये अपक्ष मंगल कांबळे, प्रभाग चौदामध्ये योगेश परदेशी यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केले आहे, तर अपक्ष अमोल शेळके यांनी राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा देत राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे बळ वाढत आहे.