शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

विटा पालिकेची निवडणूक काँग्रेस पक्षच लढविणार

By admin | Updated: December 5, 2015 00:44 IST

पतंगराव कदम : विट्यामध्ये कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

विटा : सांगली मार्केट कमिटी सर्वांनी खाल्ली तरी ३८ कोटी रूपये शिल्लक राहिले. त्यामुळे शेतीमालाला चांगला भाव देण्यासाठी बाजार समित्या व शेतीपूरक संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत. थोड्या पाण्यात व थोड्या शेतीत जास्त उत्पादन घेऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम उभा राहण्यासाठी आगामी काळात शेतीपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपविला पाहिजे, असे मत व्यक्त करून, अवघ्या एका वर्षावर येऊन ठेपलेली विटा नगरपरिषद निवडणूक यावेळीही कॉँग्रेस पक्षच लढविणार असून त्यासाठी युवकांनी तयारीला लागावे, असे आवाहन माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी केले.विटा येथे मनमंदिर युथ फौंडेशनच्यावतीने आयोजित ‘मनमंदिर अ‍ॅग्रो’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कदम बोलत होते. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, रामरावदादा पाटील, जि. प. सदस्य डॉ. नामदेव माळी, सुहास शिंदे, कृष्णत गायकवाड, अ‍ॅड. सुमित गायकवाड, अ‍ॅड. अजित गायकवाड, सभापती आनंदराव पाटील उपस्थित होते.यावेळी डॉ. कदम म्हणाले, खानापूर तालुक्यात शेतीपाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मी मंत्री असताना ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनेचे २५० कोटी वीज बिल शासनाकडून भरले. परंतु, आता तसे होताना दिसत नाही. राज्य कुणाचे असावे हे आता जनतेला समजू लागले आहे. कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना फायदा होईल.अशोकराव गायकवाड यांचेही भाषण झाले. अ‍ॅड. अजित गायकवाड यांनी कृषी प्रदर्शन आयोजित करण्याचा हेतू विषद केला, तर अ‍ॅड. सुमित गायकवाड यांनी, आतापर्यंत जनतेच्या हिताची कामे करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले असून यापुढील काळातही जनतेची कामे करण्यासाठी अशोकराव गायकवाड यांना ताकद द्यावी, असे सांगितले. यावेळी आदर्श शेतकरी सुरेश शिंदे, काकासाहेब पाटील, प्रताप कचरे, प्रकाश गायकवाड, भगवान पाटील, रामभाऊ जाधव या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास प्रतापराव साळुंखे, शांताराम कदम, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सुशांत देवकर, नगरसेवक अनिल म. बाबर, दिलीप आमणे, उत्तम चोथे, संजय भिंगारदेवे आदी उपस्थित होते. चंद्रशेखर यादव यांनी आभार मानले. (वार्ताहर)काँग्रेसची सूत्रे तरुणांच्या हातात देणार : मोहनराव कदमराजकारण करीत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले पाहिजे. यापुढील काळात कॉँग्रेसची सर्व सूत्रे जिल्ह्यातील तरूणांच्या हातात देणार असून मी फक्त सेनापती म्हणून काम करणार असल्याचे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी व्यक्त केले. तसेच तरूणांना त्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून शेती करण्याचे आवाहन केले.