शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

विटा पालिकेची निवडणूक काँग्रेस पक्षच लढविणार

By admin | Updated: December 5, 2015 00:44 IST

पतंगराव कदम : विट्यामध्ये कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

विटा : सांगली मार्केट कमिटी सर्वांनी खाल्ली तरी ३८ कोटी रूपये शिल्लक राहिले. त्यामुळे शेतीमालाला चांगला भाव देण्यासाठी बाजार समित्या व शेतीपूरक संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत. थोड्या पाण्यात व थोड्या शेतीत जास्त उत्पादन घेऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम उभा राहण्यासाठी आगामी काळात शेतीपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपविला पाहिजे, असे मत व्यक्त करून, अवघ्या एका वर्षावर येऊन ठेपलेली विटा नगरपरिषद निवडणूक यावेळीही कॉँग्रेस पक्षच लढविणार असून त्यासाठी युवकांनी तयारीला लागावे, असे आवाहन माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी केले.विटा येथे मनमंदिर युथ फौंडेशनच्यावतीने आयोजित ‘मनमंदिर अ‍ॅग्रो’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कदम बोलत होते. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, रामरावदादा पाटील, जि. प. सदस्य डॉ. नामदेव माळी, सुहास शिंदे, कृष्णत गायकवाड, अ‍ॅड. सुमित गायकवाड, अ‍ॅड. अजित गायकवाड, सभापती आनंदराव पाटील उपस्थित होते.यावेळी डॉ. कदम म्हणाले, खानापूर तालुक्यात शेतीपाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मी मंत्री असताना ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनेचे २५० कोटी वीज बिल शासनाकडून भरले. परंतु, आता तसे होताना दिसत नाही. राज्य कुणाचे असावे हे आता जनतेला समजू लागले आहे. कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना फायदा होईल.अशोकराव गायकवाड यांचेही भाषण झाले. अ‍ॅड. अजित गायकवाड यांनी कृषी प्रदर्शन आयोजित करण्याचा हेतू विषद केला, तर अ‍ॅड. सुमित गायकवाड यांनी, आतापर्यंत जनतेच्या हिताची कामे करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले असून यापुढील काळातही जनतेची कामे करण्यासाठी अशोकराव गायकवाड यांना ताकद द्यावी, असे सांगितले. यावेळी आदर्श शेतकरी सुरेश शिंदे, काकासाहेब पाटील, प्रताप कचरे, प्रकाश गायकवाड, भगवान पाटील, रामभाऊ जाधव या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास प्रतापराव साळुंखे, शांताराम कदम, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सुशांत देवकर, नगरसेवक अनिल म. बाबर, दिलीप आमणे, उत्तम चोथे, संजय भिंगारदेवे आदी उपस्थित होते. चंद्रशेखर यादव यांनी आभार मानले. (वार्ताहर)काँग्रेसची सूत्रे तरुणांच्या हातात देणार : मोहनराव कदमराजकारण करीत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले पाहिजे. यापुढील काळात कॉँग्रेसची सर्व सूत्रे जिल्ह्यातील तरूणांच्या हातात देणार असून मी फक्त सेनापती म्हणून काम करणार असल्याचे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी व्यक्त केले. तसेच तरूणांना त्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून शेती करण्याचे आवाहन केले.