शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Lok Sabha Election 2019 काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ५० वर्षे पाण्याचेच राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 23:37 IST

कोरेगाव : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामगिरीमुळे सामान्य जनता पेटून उठली असून, त्यांना विकासाचे राजकारण ...

कोरेगाव : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामगिरीमुळे सामान्य जनता पेटून उठली असून, त्यांना विकासाचे राजकारण नको तर विकास हवा आहे. त्यामुळे आता जनता पाठीशी असल्याने महायुती माढा, बारामती काय सातारासुद्धा जिंकेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.दरम्यान, साताऱ्याची लढाई ही राजा विरुद्ध प्रजा असून, राजांबद्दल मी बोलणार नाही, सगळ्यांना सगळे माहीत आहे, असा चिमटाही काढत त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर थेट टीका करणे टाळले.कोरेगाव येथे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष महेश शिंदे, मनोज घोरपडे, ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष राहुल बर्गे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, ‘आजच पंतप्रधानांची अकलूज येथे माढा मतदार संघाची सभा झाली. पश्चिम महाराष्टÑातून मोठा जनसागर लोटला होता. शरद पवार यांना हवेचा अंदाज येतो, असे म्हणतात, ते खरे आहे, म्हणून त्यांनी अपघात टाळण्यासाठी यू टर्न घेतला. अगोदर स्वत: फलंदाजी करणार म्हणून गवगवा केला आणि सातव्याच दिवशी राखीव खेळाडू म्हणून राहणे पसंत केले. एकूणच महायुतीला सर्वत्र चांगले वातावरण असून, माढाच काय, बारामती आणि सातारा देखील आम्हीच जिंकणार आहोत.’काँग्रेस-राष्टÑवादीने ५० वर्षे पाण्याचेच राजकारण केले. सातारा जिल्हा पाणीदार असताना, त्याच्या हक्काचे पाणी इतरत्र पळविण्याचे पाप केले. या जिल्ह्याला दुष्काळाचा कलंक लावला. या उलट भाजप सरकारने सातारा जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यासाठी चार हजार कोटींहून अधिक निधीची तरतूद केली. आजच गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेचा अंतिम स्लॅब देखील पडला असून, उरमोडी, वसना-वांगणासह धोम बलकवडी योजनांची कामे मार्गी लावली आहेत. या योजनांना केंद्रीय जल आयोगाची मान्यता घेण्याबरोबर चार हजार कोटींहून अधिक निधीची तरतूद केली असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.डॉ. शालिनीताई पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्यव्यापी दौरा केला, त्यांचा काटा कोणी काढला, हे जनतेला माहीत आहे. त्यासाठी जावळीचा गडी आणला, त्यांनी माथाडी कामगार बरोबरआणले. त्यांनी दहा वर्षांत काही केले नाही, स्थानिक स्वराज्य संस्था बंद पाडण्याचे काम केले. तालुक्याचा दुष्काळ ते साधा हटवू शकलेनाहीत. त्यांना जनता काय करूशकते, हे दाखवून देणार असून, कोरेगावातच मुक्काम ठोकणार आहे, असा इशारा देत नरेंद्र पाटील यांनी डॉ. शालिनीताई पाटील यांचा जरंडेश्वर साखर कारखाना स्वस्त:त लाटणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनीचौकशी करावी आणि कारखान्याच्या शेतकरी-सभासदांना न्याय द्यावा, अशी विनंती केली.पश्चिम महाराष्टÑावर अन्याय नाही...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाचे असून, ते पश्चिम महाराष्टÑावर अन्याय करतील, अशी टीका काँग्रेस-राष्टÑवादीने केली होती. आम्ही सत्तेत येण्यापूर्वी आम्हाला वाटत होते, त्यांनी पश्चिम महाराष्टÑाचे भले केले आहे; मात्र प्रत्यक्षात कसलेही काम झाले नव्हते. मी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विदर्भच काय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्टÑाला न्याय देण्याचे काम केले. सातारा जिल्ह्यात राष्टÑीय महामार्गासाठी चार हजार कोटी तर पाणी योजनांसाठी चार हजार कोटी रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले.कॉलर आणि मिशा !नरेंद्र पाटील आणि महेश शिंदे हे खासदार उदयनराजे भोसले यांच्या कॉलरच्या स्टाईलवर बोलले. ‘कॉलर दिवसभर वर राहत नाही, तर मिशा दिवसभर राहतात,’ असे नरेंद्र पाटील म्हणाले. महेश शिंदे म्हणाले, ‘मिशीने सातारा जिल्हा हालून गेला असून, कॉलर उडायच्या आतच फाटून गेली आहे.’

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक