शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय

By admin | Updated: September 6, 2016 23:49 IST

पृथ्वीराज चव्हाण : भैरवनाथनगरला विविध विकासकामांची उद्घाटने

कऱ्हाड : ‘विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरण्यासाठी आमच्या आघाडी सरकारने विदर्भास झुकते माप दिले होते. आम्ही कोणताही आकस बाळगून सरकार चालवले नाही; पण सद्याचे भाजप सरकार आकसाने पश्चिम महाराष्ट्राकडे पाहत आहे. त्याबरोबर काँग्रेसचे नेते टार्गेट करून त्यांच्या शिक्षण संस्थांवर छापे टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकारने चालवला आहे. सरकारचे विकासापेक्षा द्वेषाचे राजकारण सुरू असून, हे खेदजनक आहे,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. भैरवनाथ-काले, ता. कऱ्हाड येथील राजीव गांधी भवन या ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन, भैरवनाथनगर ते टकलेवस्ती रस्त्याचे उद्घाटन तसेच विविध विकासकामांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. सरपंच सुभद्रा पाटील अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पै. नानासाहेब पाटील, बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, इंद्रजित चव्हाण, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बामणे, सर्जेराव शिंदे, अ‍ॅड. ए. वाय. पाटील, अ‍ॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, कृष्णत थोरात, दिलीप पाटील, तालुका काँग्रेसचे प्रवक्ते पै. तानाजी चवरे, संघटक उदय पाटील-उंडाळकर, नितीन थोरात, रणजित देशमुख, भैरवनाथनगरचे उपसरपंच आर. एम. कोळी, जयकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार चव्हाण म्हणाले, ‘ सरकार विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रामध्ये विकासाचे अंतर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. यांनी निवडणुकीआधी करायची ती गडबड केली. आता त्यांच्या पक्षातील मंडळींची अवस्था काय आहे, हे मी सांगायला नको. आता त्यांच्या पक्षातील मंडळींची अवस्था काय आहे, हे मी सांगायला नको. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रशासन स्वच्छ केले. या कालावधीत अनेक निर्णय मार्गी लागल्याचे मला समाधान आहे; पण हे माझे काम आमच्या मित्रपक्षाला आवडले नाही. वर्णाश्रम अधारीत समाजव्यवस्थेकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ’प्रारंभी दानशूर ज्येष्ठ नागरिक मारुती यादव, संभाजी थोरात यांचा आमदार चव्हाण यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला. आर. एम. कोळी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. (प्रतिनिधी)माजी आमदार कुणाशीही प्रामाणिक नाहीत!आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘माजी आमदार कधीही कुणाशी प्रामाणिक राहिलेले नाहीत. विलासराव देशमुख यांच्या मतदार संघात त्यांना सन्मान दिला. विविध विकासकामांची त्यांच्या हस्ते उद्घाटने केली. त्याही दिग्गजांशी हे माजी आमदार कृतज्ञ वागल्याचे विलासराव देशमुख साताऱ्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर सांगायचे. त्या कृतज्ञ व्यक्तीचा जनाधार खऱ्या अर्थाने जनतेने संपवला आहे. ते ३५ वर्षे तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये होते. त्यांनी वैयक्तिक स्वार्थापोटी जिल्ह्यातील काँग्रेस संपविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अंगावरील पक्षाची झूल आता निघाल्याने कुणाशीही आघाड्या करत ते भरकटत चालले आहेत.’