शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

काँग्रेसने काढले राष्ट्रवादीच्या आरोपांना किरकोळीत

By admin | Updated: May 19, 2014 00:13 IST

सातारा : ‘ज्या राष्ट्रवादीचा जन्मच गद्दारीतून झाला, त्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी, काँग्रेसने काय केले, याची विचारणा खासदार विजयसिंह मोहिते-पाटलांकडे जाऊन करावी.

सातारा : ‘ज्या राष्ट्रवादीचा जन्मच गद्दारीतून झाला, त्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी, काँग्रेसने काय केले, याची विचारणा खासदार विजयसिंह मोहिते-पाटलांकडे जाऊन करावी. आम्ही मदत केली नाही, असा खोटा आरोप करून काँग्रेसने गद्दारी केली म्हणणारे येळगावकर कोण?’ असा सवाल आमदार जयकुमार गोरे यांनी केला आहे. माण, खटाव आणि फलटणमध्ये काँग्रेसने गद्दारी केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना केला होता. येळगावकरांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली असली तरी काँग्रेसने मात्र येळगावकरांच्या आरोपांना किरकोळीत काढत राष्ट्रवादीच्या लोकांचीच राष्ट्रवादीला मतदान करण्याची मानसिकता नसल्याचा आरोप करीत पलटवार केला आहे. मी येळगावकर यांच्यापेक्षा मोठा नसल्याची कोपरखळी मारतच आमदार गोरे यांनी त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘ज्या पक्षाचा जन्मच गद्दारीतून झाला, त्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसच्या नावाने खडे फोडू नयेत. त्यांनी तोंडाला थोडा लगाम लावावा आणि बोलावे. राष्ट्रवादीतच मोठ्या प्रमाणात असंतोष असताना तो दूर करण्याऐवजी येळगावकरांना काँग्रेसवर टीका करण्यात धन्यता वाटते. राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना तुमच्याच पक्षाला मतदान करा, असे सांगण्याची वेळ आमच्यावर आली, याच्यासारखे दुर्दैव नाही, असेही गोरे म्हणाले.’ (प्रतिनिधी)