शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

सेवापूर्ती अन् सेवाभावींच्या सन्मानाचा संगम अलौकिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:57 IST

पाचवड : ‘ज्यांनी आयुष्यभर ज्ञानदान करून सेवापूर्ती केली. जे तरुण सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत त्यांचा एकत्र सन्मान करून साधलेला ...

पाचवड : ‘ज्यांनी आयुष्यभर ज्ञानदान करून सेवापूर्ती केली. जे तरुण सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत त्यांचा एकत्र सन्मान करून साधलेला संगम अलौकिक आहे,’ असे गौरवोद्गार शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख व शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठल माने यांनी काढले.

भुईंज येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात सेवापूर्ती करणाऱ्या पाचजणांचा गौरव तसेच श्रीमंत बाबासाहेब जाधवराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त वि. रा. तथा बाबासाहेब जाधवराव प्रतिष्ठानतर्फे शिववंदनेश्वर प्रतिष्ठानला पुरस्कार वितरण अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयतचे सर्वसाधारण मंडळाचे सदस्य भैयासाहेब जाधवराव होते.

माने म्हणाले, ‘बाबासाहेब जाधवराव यांनी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी योगदान देत अनेक माणसे, घरे उभी केली. त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची फळे म्हणजे हे विद्यालय संपूर्ण रयत परिवारात ग्रामीण भागात प्रथम क्रमांकावर आहे. शिववंदनेश्वर प्रतिष्ठानचे इतिहास जपणुकीचे काम कौतुकास्पद व भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे. भैयासाहेब जाधवराव यांनी आजपर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील योजनांची माहिती दिली.’

यावेळी निवृत्त उपमुख्याध्यापक पंडितराव यादव, भरती अहिरे, कुसुम जाधव, भारती खुंटाळे, राजाराम माने यांना गौरविण्यात आले. शिववंदनेश्वर प्रतिष्ठानला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. दीपक पवार यांनी मानपत्राचे लेखन केले. स्कूल कमिटीचे सदस्य नारायण शिंदे, उत्तमराव भोसले, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ दगडे, सोसायटीचे उपाध्यक्ष रामदास जाधव, प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल तांबोळी, कृष्णात घाडगे उपस्थित होते. जयवंत पिसाळ यांनी स्वागत केले. प्राचार्या सुमन कदम यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल सकुंडे, संगीता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तात्यासाहेब लावंड यांनी आभार मानले.

फोटो

२२महेंद्र गायकवाड

भुईंज येथे शिवनंदनेश्वर प्रतिष्ठानला सेवा गौरव पुरस्कार भैयासाहेब जाधवराव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विठ्ठल माने, पंडितराव यादव उपस्थित होते. (छाया : महेंद्र गायकवाड)