शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

नव्वदीनंतरही आत्मविश्वास दांडगा; २३० वृद्धांची कोरोनावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:26 IST

वृद्धांनी दाखवला विश्वास; महामारीला केले चितपट लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जिल्ह्यात मरण पावणाऱ्यांची संख्या ...

वृद्धांनी दाखवला विश्वास; महामारीला केले चितपट

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जिल्ह्यात मरण पावणाऱ्यांची संख्या फार मोठी होती. यातही तरुणांचे आणि ६० ते ७० वयोगटातील प्रमाण जास्त होते. मात्र सातारा जिल्ह्यात जिल्ह्यात ९० पेक्षा जास्त वय असलेल्यांचे मृत्यूचे प्रमाण अगदी नगण्य होते. जिल्ह्यातील तब्बल २३० नव्वदी पार लोकांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्याला पहिल्या-दुसऱ्या या दोन्ही लाटांनी अक्षरचा धडका मारल्या. पहिल्या लाटेमध्ये पन्नाशी पूर्ण केलेले अनेक लोक बाधित सापडले. विशेषतः नव्वदी पार केलेले लोक विविध आजारांनी आधीच ग्रस्त असतात, अशा लोकांना कोरोना व्याधीने सर्वप्रथम गाठले. जे लोक कामाला बाहेर जात होते, त्यांच्या माध्यमातूनच घरात बसलेल्या वृद्धांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाली.

वयाची नव्वदी पार केलेले लोक कसे जगणार या प्रश्न संपूर्ण शासकीय यंत्रणेला सतावत होता. जिल्ह्यात २५७ इतके वयाची नव्वदी पार केलेले रुग्ण सापडले. त्यापैकी २३० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. अनेक पावसाळे पाहिले हे नव्वदीतील लोक तरुणांसाठी एक आयडॉल ठरले. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असली की मरणाची चिंता राहत नाही हेच यातून समोर आले.

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) ९० पेक्षा जास्त वयाचे एकूण पॉझिटिव्ह - २५७

बरे झाले - २३०

पहिल्या लाटेतील पॉझिटिव्ह - ७८

दुसऱ्या लाटेतील पॉझिटिव्ह -१७९

पहिल्या लाटेतील मृत्यू - १७

दुसऱ्या लाटेतील मृत्यू - १०

२) ५० ते ६० वयोगटात सर्वाधिक मृत्यू (बॉक्स) ( आजअखेर) - ७४३

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोणत्या वयोगटात सर्वाधिक मृत्यू याचा बॉक्स

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ६१ ते ७० या वयोगटातील लोक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. अनेकांचे मृत्यूदेखील झाले. या गटामध्ये जे नागरिक असतात त्यांना हृदयविकार अथवा मधुमेह असे पूर्वीचे आजार असल्याने या वयोगटातील लोक कोरोनावर उपचार सुरू असताना मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त होते.

३) आम्हाला कोणीच हरवू शकत नाही !

कोट..

आम्ही अनेक पावसाळे पाहिले आहेत. प्लेग, पटकी असे आजारदेखील समोर पाहिले. या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू झाला. अनेक जवळचे लोक आजारात गेले. पूर्वी आजारावर उपचार लगेच मिळत नव्हते, आताच्या काळात उपचार मिळतात. आयुर्वेदिक उपचारांचा देखील फायदा झाला.

- सर्जेराव जाधव

कोट..

नैसर्गिक राहणीमान ठेवलं, तर कुठलाही आजार आपण परतवून लावू शकतो. मला कोरोनाची बाधा झाल्यानंतर घरातले सगळेच चिंतेत होते. माझ्या वयाचा विचार केला तर कोरोनातून मी बाहेर पडेल, असे कोणालाच वाटत नव्हते. घरच्या लोकांनी साथ दिली, सेवा केली त्यामुळेच मी आजारमुक्त झाले.

- हौसाबाई धुमाळ