शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नव्वदीनंतरही आत्मविश्वास दांडगा; २३० वृद्धांची कोरोनावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:26 IST

वृद्धांनी दाखवला विश्वास; महामारीला केले चितपट लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जिल्ह्यात मरण पावणाऱ्यांची संख्या ...

वृद्धांनी दाखवला विश्वास; महामारीला केले चितपट

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जिल्ह्यात मरण पावणाऱ्यांची संख्या फार मोठी होती. यातही तरुणांचे आणि ६० ते ७० वयोगटातील प्रमाण जास्त होते. मात्र सातारा जिल्ह्यात जिल्ह्यात ९० पेक्षा जास्त वय असलेल्यांचे मृत्यूचे प्रमाण अगदी नगण्य होते. जिल्ह्यातील तब्बल २३० नव्वदी पार लोकांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्याला पहिल्या-दुसऱ्या या दोन्ही लाटांनी अक्षरचा धडका मारल्या. पहिल्या लाटेमध्ये पन्नाशी पूर्ण केलेले अनेक लोक बाधित सापडले. विशेषतः नव्वदी पार केलेले लोक विविध आजारांनी आधीच ग्रस्त असतात, अशा लोकांना कोरोना व्याधीने सर्वप्रथम गाठले. जे लोक कामाला बाहेर जात होते, त्यांच्या माध्यमातूनच घरात बसलेल्या वृद्धांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाली.

वयाची नव्वदी पार केलेले लोक कसे जगणार या प्रश्न संपूर्ण शासकीय यंत्रणेला सतावत होता. जिल्ह्यात २५७ इतके वयाची नव्वदी पार केलेले रुग्ण सापडले. त्यापैकी २३० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. अनेक पावसाळे पाहिले हे नव्वदीतील लोक तरुणांसाठी एक आयडॉल ठरले. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असली की मरणाची चिंता राहत नाही हेच यातून समोर आले.

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) ९० पेक्षा जास्त वयाचे एकूण पॉझिटिव्ह - २५७

बरे झाले - २३०

पहिल्या लाटेतील पॉझिटिव्ह - ७८

दुसऱ्या लाटेतील पॉझिटिव्ह -१७९

पहिल्या लाटेतील मृत्यू - १७

दुसऱ्या लाटेतील मृत्यू - १०

२) ५० ते ६० वयोगटात सर्वाधिक मृत्यू (बॉक्स) ( आजअखेर) - ७४३

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोणत्या वयोगटात सर्वाधिक मृत्यू याचा बॉक्स

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ६१ ते ७० या वयोगटातील लोक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. अनेकांचे मृत्यूदेखील झाले. या गटामध्ये जे नागरिक असतात त्यांना हृदयविकार अथवा मधुमेह असे पूर्वीचे आजार असल्याने या वयोगटातील लोक कोरोनावर उपचार सुरू असताना मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त होते.

३) आम्हाला कोणीच हरवू शकत नाही !

कोट..

आम्ही अनेक पावसाळे पाहिले आहेत. प्लेग, पटकी असे आजारदेखील समोर पाहिले. या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू झाला. अनेक जवळचे लोक आजारात गेले. पूर्वी आजारावर उपचार लगेच मिळत नव्हते, आताच्या काळात उपचार मिळतात. आयुर्वेदिक उपचारांचा देखील फायदा झाला.

- सर्जेराव जाधव

कोट..

नैसर्गिक राहणीमान ठेवलं, तर कुठलाही आजार आपण परतवून लावू शकतो. मला कोरोनाची बाधा झाल्यानंतर घरातले सगळेच चिंतेत होते. माझ्या वयाचा विचार केला तर कोरोनातून मी बाहेर पडेल, असे कोणालाच वाटत नव्हते. घरच्या लोकांनी साथ दिली, सेवा केली त्यामुळेच मी आजारमुक्त झाले.

- हौसाबाई धुमाळ