शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
2
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
3
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
4
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
5
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
6
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
7
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
8
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
9
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
10
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
11
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
12
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
13
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
14
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
15
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
16
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
17
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
18
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
19
Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
20
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

नव्वदीनंतरही आत्मविश्वास दांडगा; २३० वृद्धांची कोरोनावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:26 IST

वृद्धांनी दाखवला विश्वास; महामारीला केले चितपट लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जिल्ह्यात मरण पावणाऱ्यांची संख्या ...

वृद्धांनी दाखवला विश्वास; महामारीला केले चितपट

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जिल्ह्यात मरण पावणाऱ्यांची संख्या फार मोठी होती. यातही तरुणांचे आणि ६० ते ७० वयोगटातील प्रमाण जास्त होते. मात्र सातारा जिल्ह्यात जिल्ह्यात ९० पेक्षा जास्त वय असलेल्यांचे मृत्यूचे प्रमाण अगदी नगण्य होते. जिल्ह्यातील तब्बल २३० नव्वदी पार लोकांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्याला पहिल्या-दुसऱ्या या दोन्ही लाटांनी अक्षरचा धडका मारल्या. पहिल्या लाटेमध्ये पन्नाशी पूर्ण केलेले अनेक लोक बाधित सापडले. विशेषतः नव्वदी पार केलेले लोक विविध आजारांनी आधीच ग्रस्त असतात, अशा लोकांना कोरोना व्याधीने सर्वप्रथम गाठले. जे लोक कामाला बाहेर जात होते, त्यांच्या माध्यमातूनच घरात बसलेल्या वृद्धांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाली.

वयाची नव्वदी पार केलेले लोक कसे जगणार या प्रश्न संपूर्ण शासकीय यंत्रणेला सतावत होता. जिल्ह्यात २५७ इतके वयाची नव्वदी पार केलेले रुग्ण सापडले. त्यापैकी २३० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. अनेक पावसाळे पाहिले हे नव्वदीतील लोक तरुणांसाठी एक आयडॉल ठरले. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असली की मरणाची चिंता राहत नाही हेच यातून समोर आले.

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) ९० पेक्षा जास्त वयाचे एकूण पॉझिटिव्ह - २५७

बरे झाले - २३०

पहिल्या लाटेतील पॉझिटिव्ह - ७८

दुसऱ्या लाटेतील पॉझिटिव्ह -१७९

पहिल्या लाटेतील मृत्यू - १७

दुसऱ्या लाटेतील मृत्यू - १०

२) ५० ते ६० वयोगटात सर्वाधिक मृत्यू (बॉक्स) ( आजअखेर) - ७४३

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोणत्या वयोगटात सर्वाधिक मृत्यू याचा बॉक्स

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ६१ ते ७० या वयोगटातील लोक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. अनेकांचे मृत्यूदेखील झाले. या गटामध्ये जे नागरिक असतात त्यांना हृदयविकार अथवा मधुमेह असे पूर्वीचे आजार असल्याने या वयोगटातील लोक कोरोनावर उपचार सुरू असताना मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त होते.

३) आम्हाला कोणीच हरवू शकत नाही !

कोट..

आम्ही अनेक पावसाळे पाहिले आहेत. प्लेग, पटकी असे आजारदेखील समोर पाहिले. या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू झाला. अनेक जवळचे लोक आजारात गेले. पूर्वी आजारावर उपचार लगेच मिळत नव्हते, आताच्या काळात उपचार मिळतात. आयुर्वेदिक उपचारांचा देखील फायदा झाला.

- सर्जेराव जाधव

कोट..

नैसर्गिक राहणीमान ठेवलं, तर कुठलाही आजार आपण परतवून लावू शकतो. मला कोरोनाची बाधा झाल्यानंतर घरातले सगळेच चिंतेत होते. माझ्या वयाचा विचार केला तर कोरोनातून मी बाहेर पडेल, असे कोणालाच वाटत नव्हते. घरच्या लोकांनी साथ दिली, सेवा केली त्यामुळेच मी आजारमुक्त झाले.

- हौसाबाई धुमाळ