शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

नव्वदीनंतरही आत्मविश्वास दांडगा; २३० वृद्धांची कोरोनावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:26 IST

वृद्धांनी दाखवला विश्वास; महामारीला केले चितपट लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जिल्ह्यात मरण पावणाऱ्यांची संख्या ...

वृद्धांनी दाखवला विश्वास; महामारीला केले चितपट

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जिल्ह्यात मरण पावणाऱ्यांची संख्या फार मोठी होती. यातही तरुणांचे आणि ६० ते ७० वयोगटातील प्रमाण जास्त होते. मात्र सातारा जिल्ह्यात जिल्ह्यात ९० पेक्षा जास्त वय असलेल्यांचे मृत्यूचे प्रमाण अगदी नगण्य होते. जिल्ह्यातील तब्बल २३० नव्वदी पार लोकांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्याला पहिल्या-दुसऱ्या या दोन्ही लाटांनी अक्षरचा धडका मारल्या. पहिल्या लाटेमध्ये पन्नाशी पूर्ण केलेले अनेक लोक बाधित सापडले. विशेषतः नव्वदी पार केलेले लोक विविध आजारांनी आधीच ग्रस्त असतात, अशा लोकांना कोरोना व्याधीने सर्वप्रथम गाठले. जे लोक कामाला बाहेर जात होते, त्यांच्या माध्यमातूनच घरात बसलेल्या वृद्धांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाली.

वयाची नव्वदी पार केलेले लोक कसे जगणार या प्रश्न संपूर्ण शासकीय यंत्रणेला सतावत होता. जिल्ह्यात २५७ इतके वयाची नव्वदी पार केलेले रुग्ण सापडले. त्यापैकी २३० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. अनेक पावसाळे पाहिले हे नव्वदीतील लोक तरुणांसाठी एक आयडॉल ठरले. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असली की मरणाची चिंता राहत नाही हेच यातून समोर आले.

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) ९० पेक्षा जास्त वयाचे एकूण पॉझिटिव्ह - २५७

बरे झाले - २३०

पहिल्या लाटेतील पॉझिटिव्ह - ७८

दुसऱ्या लाटेतील पॉझिटिव्ह -१७९

पहिल्या लाटेतील मृत्यू - १७

दुसऱ्या लाटेतील मृत्यू - १०

२) ५० ते ६० वयोगटात सर्वाधिक मृत्यू (बॉक्स) ( आजअखेर) - ७४३

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोणत्या वयोगटात सर्वाधिक मृत्यू याचा बॉक्स

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ६१ ते ७० या वयोगटातील लोक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. अनेकांचे मृत्यूदेखील झाले. या गटामध्ये जे नागरिक असतात त्यांना हृदयविकार अथवा मधुमेह असे पूर्वीचे आजार असल्याने या वयोगटातील लोक कोरोनावर उपचार सुरू असताना मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त होते.

३) आम्हाला कोणीच हरवू शकत नाही !

कोट..

आम्ही अनेक पावसाळे पाहिले आहेत. प्लेग, पटकी असे आजारदेखील समोर पाहिले. या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू झाला. अनेक जवळचे लोक आजारात गेले. पूर्वी आजारावर उपचार लगेच मिळत नव्हते, आताच्या काळात उपचार मिळतात. आयुर्वेदिक उपचारांचा देखील फायदा झाला.

- सर्जेराव जाधव

कोट..

नैसर्गिक राहणीमान ठेवलं, तर कुठलाही आजार आपण परतवून लावू शकतो. मला कोरोनाची बाधा झाल्यानंतर घरातले सगळेच चिंतेत होते. माझ्या वयाचा विचार केला तर कोरोनातून मी बाहेर पडेल, असे कोणालाच वाटत नव्हते. घरच्या लोकांनी साथ दिली, सेवा केली त्यामुळेच मी आजारमुक्त झाले.

- हौसाबाई धुमाळ