शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक फी बाबत सवलतीचा तातडीने निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणसंस्थांचे पैसे वाचले असतानाही या संस्था फी साठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणसंस्थांचे पैसे वाचले असतानाही या संस्था फी साठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहेत. याप्रश्नी आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सागर भोगांवकर यांनी शिक्षण मंत्र्यांना शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, २०२१-२०२२ हे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालक अनेक समस्यांना तोंड देत आहेत. मागील वर्षीची फी भरली नसल्याने काही ठिकाणी मुलांचे निकाल, तर काही ठिकाणी टीसी रोखून धरले जात आहेत. काही पालकांना शाळा सोडल्याचे दाखले थेट घरी पाठवले जात आहेत. मागील वर्षी लॉकडाऊन काळात खासगी शाळांची खर्च बचत होऊनही फी कमी केली नाही. तसेच महाराष्ट्र सरकारने काढलेल्या आदेशाला कोर्टात आव्हान दिले गेल्यावरच्या कोर्ट निर्णयामुळे पालकांना काहीच दिलासा मिळाला नाही. आपण सक्षम आदेश न काढता शाळांना खूप इशारे दिले. परंतु शाळांनी त्याला कचऱ्याची टोपली दाखवत मुलांचे ऑनलाईन शिक्षण रोखत मनमानी फी वसुलीचे सर्व मार्ग अवलंबले आहेत.

या पत्रातील मुद्द्यांची नोंद घेऊन योग्य पावले न उचलल्यास रस्त्यावर उतरण्यासोबत पीडित पालकांच्यावतीने आम्ही व सर्व संबंधित घटक बाल हक्क संरक्षण आयोग, न्यायालय आदी ठिकाणी आपल्याविरुद्ध दाद मागण्याचा हक्क बजावू, असा इशाराही या निवेदनाद्वारे सातारा आम आदमी पार्टीतर्फे सागर भोगांवकर यांनी दिला आहे.

यावेळी सातारा जिल्हा आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, सचिव महेंद्र बाचल, विजयकुमार धोतमल, अ‍ॅड. इम्तियाज खान, अ‍ॅड. विजय खामकर, तात्या सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.