शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सैदापुरातील धरणबाधितांना मोबदला द्या : नलवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:39 IST

कऱ्हाड : टेंभू धरणग्रस्तांना मोबदला मिळावा, यासाठी शेतकरी नेते सचिन नलवडे यांनी लढा उभा केला आहे. शुक्रवारी सैदापूर येथील ...

कऱ्हाड : टेंभू धरणग्रस्तांना मोबदला मिळावा, यासाठी शेतकरी नेते सचिन नलवडे यांनी लढा उभा केला आहे. शुक्रवारी सैदापूर येथील शेतकऱ्यांना बरोबर घेत सर्व धरणबाधितांच्या जमिनीची संयुक्त मोजणी करावी, बाधित जमिनीचा बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्यात यावा, असे निवेदन टेंभू उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता राजन रेडियार, कार्यकारी अभियंता राजेश हाडदरे, सहाय्यक अभियंता जयवंत चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी सैदापूर येथील दत्तात्रय जाधव, शरद जाधव, तानाजी जाधव, बबन सय्यद, दिलावर सय्यद, फकरुद्दीन सय्यद, पंडित वाघमारे, सावंता कांबळे, अरुण कांबळे उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, सैदापूर येथील गोवारे हद्दीपासून ते रेणुकामाता मंदिरापर्यंतची जमीन ही गेल्या दहा ते बारा वर्षांपासून टेंभू धरणाच्या पाण्याखाली गेलेली आहे. बाधितांनी गेल्या दहा वर्षांपासून जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी धरण व्यवस्थापनाला निवेदने दिली आहेत; परंतु त्यावर पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

सैदापूर येथील शेतकऱ्यांनी आमच्या जमिनीची संयुक्त मोजणी व भूसंपादन प्रस्तावाची प्रक्रिया येत्या दहा दिवसांत सुरू न झाल्यास आम्ही सचिन नलवडे यांनी जाहीर केलेल्या जलसमाधी आंदोलनात सहभाग घेणार असल्याचा इशाराही या निवेदनातून दिला आहे.

यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान कार्यकारी अभियंता राजन रेडियार यांनी सैदापूर येथील बाधित होणाऱ्या व धरणाच्या पाण्याखाली जाणाऱ्या सर्व क्षेत्राची आम्ही लवकरच संयुक्त मोजणी करण्याबद्दलचे पत्र भूमी अभिलेख कार्यालयाला देत असल्याचे सांगितले.