शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सलून व्यवसाय करत बसविली समाजाची घडी!

By admin | Updated: April 26, 2016 00:27 IST

नाभिक समाज : शिक्षणामुळे अनेक जण विविध क्षेत्रांत कार्यरत; सामाजिक एकीतून आंदोलनांना मिळतेय ताकद

प्रदीप यादव --सातारा --दगाफटका होण्याची खात्री असतानाही जे प्रतिशिवाजी म्हणून सिद्धी जोहरच्या भेटीस गेले, ते वीर शिवा काशीद, प्रतापगडावर जिवाची बाजी लावणारा वीर जिवा महाले यांची नाव उच्चारताच आजही शिवरायांचा ज्वलंत इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. नाभिक समाजातील असे शूरवीर आणि अनेक क्रांतिकारकांनी स्वराज्यासाठी, भारतभूमीसाठी प्राण पणाला लावले. रक्तातच लढण्याची जिद्द असलेल्या नाभिक समाजातील अनेक जण आज विविध क्षेत्रांत उच्च पदावर सेवा बजावत आहेत.सातारा जिल्ह्यात नाभिक समाजाची लोकसंख्या ८० हजारांच्या जवळपास आहे. जिल्हाभर पसरलेला हा समाज एक व्हावा आणि समाजापुढील प्रश्न सोडविण्यासाठी वीर जिवाजी नाभिक समाज संघटनेची १९८० मध्ये स्थापना करण्यात आली. दिवंगत माजी पोलिस अधिकारी दत्तात्रय इंगळे, एकनाथराव साळुंखे, अच्युतराव जाधव, भाऊ दळवी यांच्या माध्यमातून संघटनेचे काम सुरू झाले. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेचे सातारा जिल्ह्यात काम सुरू आहे. सध्या जिल्हाध्यक्ष भानुदास वास्के, शहराध्यक्ष म्हणून लक्ष्मण जाधव हे काम पाहतात.बारा बलुतेदारांपैकी एक असणारा हा नाभिक समाज. पूर्वांपार केस कर्तनाचा व्यवसाय करणारा हा समाज आज शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांत उच्च पदावर काम करत आहे. संघटनेच्या माध्यमातून हणमंतराव साळुंखे यांच्या प्रेरणेतून भाऊ दळवी, बापूराव काशीद, संतोष साळुंखे, चंद्रकांत पवार, सदाभाऊ सपकाळ, सुरेश पवार, आबासाहेब माने, एकनाथ शिर्के, अशोक सूर्यवंशी, बाळासाहेब काशीद, संपतराव पवार, बाळासाहेब पवार ही कार्यकर्त्यांची फळी समाजापुढील प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करीत आहे.वीर जिवाजी शिक्षणोत्तेजक संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक मदत दिली जाते. प्राचार्य सुरेशराव गायकवाड हे याचे काम पाहतात. मुलांनी शिकावं, मोठं व्हावं आणि समाजोन्नतीसाठी कार्य करावं, हा यामागील उद्देश आहे.सलग पाच वेळा विधानपरिषद सभापती राहिलेले शंकरराव जगताप, हणमंतराव साळुंखे यांनी कोल्हापूर येथे १९८१ मध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळाची स्थापना केली. या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक मेळावे घेऊन समाजजागृतीचे काम झाले. बलुतेदारी पद्धत बंद केली. सलून दुकानदारांना आर्थिक पाठबळ देऊन व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न करण्यात आले. अस्वच्छतेचा ठपका पुसून टाकला. सलून स्वच्छता डोळ्यात भरण्यासारखी दिसते, ती एकत्रित प्रयत्नांमुळे. नाभिक समाजानं कात टाकली असल्याचं चित्र दिसत आहे.संघटनेसमोरील प्रश्नवीर जिवाजी नाभिक समाज संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर सातारा जिल्ह्यात आंदोलने होत आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी होती ती वीर जिवाजी महाले यांचे स्मारक प्रतापगडावर व्हावे. हा प्रश्न संघटनेच्या स्थापनेपासून म्हणजे १९८० पासून भिजत पडला आहे, असे संतोष साळुंखे यांनी सांगितले. त्यावर प्रशासकीय पातळीवर निर्णय होत आहेत. मात्र, अद्याप स्मारक उभे राहिले नाही. सलूनधारकांना सातारा बसस्थानकात स्टॉल मिळावा, नाभिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, व्यावसायिकांना पेन्शन योजना सुरू व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून वारंवार आंदोलने छेडली जात आहेत.