शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बंदीतही वाहनधारकांचा संचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:24 IST

सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील संचारबंदीचे निर्बंध पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. असे असले, तरी अत्यावश्यक सेवेच्या ...

सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील संचारबंदीचे निर्बंध पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. असे असले, तरी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होईना. सातारा शहरात रविवारी दिवसभर पोलीस दलाकडून वाहनधारकांची कसून चौकशी करण्यात आली, तसेच अनेकांकडून दंडही वसूल करण्यात आला.

जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याचे वाढली, शिवाय कोरोनामुळे मृत्युमुुखी पडणाऱ्यांची संख्याही मोठी होती. जून महिना सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात रुग्ण संख्या अटोक्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून संचारबंदीचे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आले. मात्र, पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढू लागल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत संचारंबदीचे निर्बंध कठोर केले आहेत. सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा वेळेचे बंधन घालून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर शनिवार व रविवार पूर्ण संचारबंदी असणार आहे. असे असले, तरी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली वाहनधारक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत.

संचारबंदी असतानाही सातारा शहरात रविवारी वाहनधारक गर्दी दिसून आली. पोलीस दलाकडून ठिकठिकाणी वाहनधारकांची कसून चौकशी करण्यात आली, तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय राबविले जात आहेत. मात्र, वाहनधारक व नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याने कोरोनाची साखळी तुटण्याचे नाव घेईना. त्यामुळे वारंवार लागू होत असलेल्या संचारबंदीची व्यापारी, विक्रेते व सर्वसामान्य नागरिकांना मोठी झळ सोसावी लागत आहे.

(चौकट)

आम्ही जगायचं कसं

संचारंबदी असतानाही रविवारी अनेक भाजी व फळ विक्रेत्यांनी शहरात हजेरी लावली. काही भाजी विक्रेत्यांना ग्राहकांची दिवसभर प्रतीक्षा करावी लागली. बस स्थानक परिसरातील भाजी विक्रेत्यांना संचारबंदीबाबत विचारले असता, ‘सततच्या संचारबंदीमुळे आमचं जगणं मुश्कील झालं आहे. भाजी विक्रीवरच आमच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. व्यवसाय एक दिवस बंद ठेवाल, तरी आर्थिक संकट उभे राहते. आम्ही जगायचं तरी कसं,’ अशा भावना त्यांनी ‘लोकमत’पुढे व्यक्त केल्या.