शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:35 IST

फलटण : गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या फलटण-पंढरपूर या बहुचर्चित रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. सुमारे ...

फलटण : गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या फलटण-पंढरपूर या बहुचर्चित रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. सुमारे १ हजार ४०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात केंद्र सरकारचा ७०० तर राज्य सरकारचा ७०० कोटी रुपयांचा हिस्सा असणार आहे. राज्य शासनाने निधीसाठी हिरवा कंदील दाखविल्यास हा प्रकल्प पूर्णत्वास येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

फलटणची रेल्वे हा खरेतर तालुक्यातील लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय. माजी खासदार दिवंगत हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी लोणंद फलटण बारामती रेल्वेमार्गासाठी प्रचंड संघर्ष केला. त्यांच्या माध्यमातून लोणंद ते फलटण रेल्वे मार्ग तयार झाला. त्यानंतर माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून लोणंदहून फलटणला प्रत्यक्ष रेल्वे सुरू झाली. परंतु फलटणहून पुढे रेल्वे अद्याप कुठेच धावू शकली नाही. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गासाठी त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा केला. त्याचेच फलित म्हणून या रेल्वे मार्गासाठी सुमारे १ हजार ४०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करून त्यास मंजुरी मिळाली आहे. यामध्ये केंद्राने ७०० व राज्य सरकारने ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करावी, असे प्रयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, रेल्वेच्या बांधकाम विभागाने तातडीने फलटण-पंढरपूर या रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यामुळे हा मार्ग प्रत्यक्षात उतरण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, राज्य सरकारने या मार्गासाठी ७०० कोटींच्या गुंतवणुकीची हमी द्यावी, असे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राज्य सरकारला दिले आहे. मात्र, अद्याप तरी राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नसल्याचे समजते.

(कोट)

फलटण ते पंढरपूर या प्रलंबित रेल्वेमार्गासाठी नव्याने सर्व्हे सुरू झाला आहे. या मार्गासाठी केंद्राने १४ कोटी रुपयांच्या प्रकल्प आराखड्यास मंजुरी दिली आहे. यापैकी केंद्राने ७०० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे; परंतु राज्य सरकारने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. वारकरी आणि विठ्ठलभक्त असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या हिश्श्याचा भार उचलावा.

- रणजितसिंह नाईक-निंबाळकर,

खासदार (माढा)

फोटो : रेल्वे मार्गाचा फोटो