शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:35 IST

फलटण : गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या फलटण-पंढरपूर या बहुचर्चित रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. सुमारे ...

फलटण : गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या फलटण-पंढरपूर या बहुचर्चित रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. सुमारे १ हजार ४०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात केंद्र सरकारचा ७०० तर राज्य सरकारचा ७०० कोटी रुपयांचा हिस्सा असणार आहे. राज्य शासनाने निधीसाठी हिरवा कंदील दाखविल्यास हा प्रकल्प पूर्णत्वास येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

फलटणची रेल्वे हा खरेतर तालुक्यातील लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय. माजी खासदार दिवंगत हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी लोणंद फलटण बारामती रेल्वेमार्गासाठी प्रचंड संघर्ष केला. त्यांच्या माध्यमातून लोणंद ते फलटण रेल्वे मार्ग तयार झाला. त्यानंतर माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून लोणंदहून फलटणला प्रत्यक्ष रेल्वे सुरू झाली. परंतु फलटणहून पुढे रेल्वे अद्याप कुठेच धावू शकली नाही. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गासाठी त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा केला. त्याचेच फलित म्हणून या रेल्वे मार्गासाठी सुमारे १ हजार ४०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करून त्यास मंजुरी मिळाली आहे. यामध्ये केंद्राने ७०० व राज्य सरकारने ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करावी, असे प्रयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, रेल्वेच्या बांधकाम विभागाने तातडीने फलटण-पंढरपूर या रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यामुळे हा मार्ग प्रत्यक्षात उतरण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, राज्य सरकारने या मार्गासाठी ७०० कोटींच्या गुंतवणुकीची हमी द्यावी, असे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राज्य सरकारला दिले आहे. मात्र, अद्याप तरी राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नसल्याचे समजते.

(कोट)

फलटण ते पंढरपूर या प्रलंबित रेल्वेमार्गासाठी नव्याने सर्व्हे सुरू झाला आहे. या मार्गासाठी केंद्राने १४ कोटी रुपयांच्या प्रकल्प आराखड्यास मंजुरी दिली आहे. यापैकी केंद्राने ७०० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे; परंतु राज्य सरकारने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. वारकरी आणि विठ्ठलभक्त असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या हिश्श्याचा भार उचलावा.

- रणजितसिंह नाईक-निंबाळकर,

खासदार (माढा)

फोटो : रेल्वे मार्गाचा फोटो