शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

‘जलयुक्त शिवार’च्या प्रचारासाठी जलदिंड्या जिल्ह्यात रवाना

By admin | Updated: April 14, 2016 21:12 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन : ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान

सातारा : ‘जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या माहितीचा प्रचार व प्रसिद्धी जलदिंडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी जिल्हाधिकारी मुदगल यांच्या हस्ते पुष्पहार व श्रीफळ वाढवून जलदिंडी मार्गस्त केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पराग सोमण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, तहसीलदार राजेश चव्हाण, चंद्रशेखर सानप, जिल्हा कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे उपस्थित होते.मुदगल म्हणाले, ‘गेल्या वर्षीही अशाच प्रकारे जलदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला प्रत्येक गावांमधून चांगला प्रतिसाद मिळाला होता. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारची कामे घेण्यासाठी मोठा उत्साह दिसत आहे. या जलदिंडीच्या माध्यमातून पाण्याच्या बचतीचे महत्त्व कळेल व जलसंधारणाच्या कामांसाठी ग्रामस्थ पुढे येतील.’मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील म्हणाले, ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान १४ ते २४ एप्रिल याकालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत केंद्र तसेच राज्याच्या विविध योजनांची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणार आहोत. तसेच या कालावधीत शेतकऱ्यांसाठीही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामे शास्त्रोक्त पद्धतीने करण्यावर भर दिला जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानांच्या कामामध्ये अंगणवाडी सेविका, महिला बचत गट यांचाही सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.’ (प्रतिनिधी)