शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’च्या प्रचारासाठी जलदिंड्या जिल्ह्यात रवाना

By admin | Updated: April 14, 2016 21:12 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन : ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान

सातारा : ‘जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या माहितीचा प्रचार व प्रसिद्धी जलदिंडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी जिल्हाधिकारी मुदगल यांच्या हस्ते पुष्पहार व श्रीफळ वाढवून जलदिंडी मार्गस्त केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पराग सोमण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, तहसीलदार राजेश चव्हाण, चंद्रशेखर सानप, जिल्हा कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे उपस्थित होते.मुदगल म्हणाले, ‘गेल्या वर्षीही अशाच प्रकारे जलदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला प्रत्येक गावांमधून चांगला प्रतिसाद मिळाला होता. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारची कामे घेण्यासाठी मोठा उत्साह दिसत आहे. या जलदिंडीच्या माध्यमातून पाण्याच्या बचतीचे महत्त्व कळेल व जलसंधारणाच्या कामांसाठी ग्रामस्थ पुढे येतील.’मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील म्हणाले, ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान १४ ते २४ एप्रिल याकालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत केंद्र तसेच राज्याच्या विविध योजनांची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणार आहोत. तसेच या कालावधीत शेतकऱ्यांसाठीही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामे शास्त्रोक्त पद्धतीने करण्यावर भर दिला जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानांच्या कामामध्ये अंगणवाडी सेविका, महिला बचत गट यांचाही सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.’ (प्रतिनिधी)