शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

‘जलयुक्त शिवार’च्या प्रचारासाठी जलदिंड्या जिल्ह्यात रवाना

By admin | Updated: April 14, 2016 21:12 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन : ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान

सातारा : ‘जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या माहितीचा प्रचार व प्रसिद्धी जलदिंडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी जिल्हाधिकारी मुदगल यांच्या हस्ते पुष्पहार व श्रीफळ वाढवून जलदिंडी मार्गस्त केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पराग सोमण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, तहसीलदार राजेश चव्हाण, चंद्रशेखर सानप, जिल्हा कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे उपस्थित होते.मुदगल म्हणाले, ‘गेल्या वर्षीही अशाच प्रकारे जलदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला प्रत्येक गावांमधून चांगला प्रतिसाद मिळाला होता. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारची कामे घेण्यासाठी मोठा उत्साह दिसत आहे. या जलदिंडीच्या माध्यमातून पाण्याच्या बचतीचे महत्त्व कळेल व जलसंधारणाच्या कामांसाठी ग्रामस्थ पुढे येतील.’मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील म्हणाले, ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान १४ ते २४ एप्रिल याकालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत केंद्र तसेच राज्याच्या विविध योजनांची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणार आहोत. तसेच या कालावधीत शेतकऱ्यांसाठीही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामे शास्त्रोक्त पद्धतीने करण्यावर भर दिला जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानांच्या कामामध्ये अंगणवाडी सेविका, महिला बचत गट यांचाही सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.’ (प्रतिनिधी)