शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

रंग बदलला तरी म्हणे पाणी शुद्धच!

By admin | Updated: February 4, 2015 23:55 IST

कऱ्हाड पालिकेचा जावईशोध : कायमस्वरूपी उपाययोजना नाही; नागरिकही बुचकळ्यात

कऱ्हाड : शहराला दूषित पाणीपुरवठा होत असल्याची सर्वत्र ओरड सुरू असताना पालिकेने मात्र शहराला पुरविण्यात येणारे पाणी शंभर टक्के शुद्धच असल्याचा दावा केला आहे. पाण्याचा रंग बदलला असला तरी ते पाणी पूर्णपणे निर्जंतुक असल्याचेही पालिकेचे जलअभियंता छातीठोकपणे सांगत आहेत. पालिकेने लावलेल्या या जावईशोधामुळे नागरिक आणखी बुचकळ्यात पडले आहेत. कृष्णा नदीतील दूषित पाण्यामुळे कऱ्हाड शहरासह आसपासच्या गावांतील नागरिकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या नदीतील पाण्याचा रंग बदलला आहे. पाणी पिवळे व काळसर रंगाचे दिसत असून, ते अशुद्ध असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पासाठी कृष्णा नदीचे पाणी टेंभूजवळ अडविण्यात आले आहे. या पाण्याचा फुगवटा कोयना नदीवरील नवीन पुलापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे नदीतील पाणी साचून राहिले असून ठिकठिकाणी शेवाळ साचले आहे. नदीपात्रात सांडपाणीही मिसळत असल्याने हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे अनेक संघटनांकडून सांगितले जात आहे. गढूळ व दुर्गंधीयुक्त पाण्याचा शहराला पुरवठा केला जात असल्याचा आरोपही संघटना करीत आहेत. यामुळे साथरोग पसरत असून, अनेकांना त्वचारोगाचा सामनाही करावा लागत आहे. कऱ्हाड शहर परिसरात लहान-मोठे उद्योग, हॉटेल, रूग्णालये तसेच अन्य प्रकल्प आहेत. या ठिकाणचे सांडपाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्याचबरोबर शहरातील बाराडबरी येथे एकत्रित करण्यात आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, तेथील कचरा साठविण्याची क्षमताही संपल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. शहरातील नाल्यांमधून ओला व सुका कचरा वाहत असल्याचे अनेकवेळा पाहावयास मिळाले आहे. तसेच मैलामिश्रित पाणीही नदीपात्रापर्यंत पोहोचत आहे. वास्तविक, नदीत मिसळणारे मैलामिश्रित पाणी नदीपर्यंत जाऊ न देता त्याची विल्हेवाट लावावी, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दोन वर्षांपूर्वीच सांगण्यात आले आहे. मात्र, पालिकेने दुर्लक्ष केले. आजपर्यंत पालिकेने त्याबाबत कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यातच काही दिवसांपासून शहराला पिवळसर काळा रंग चढलेल्या पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. मनसेने याबाबत आवाज उठविला असला तरी शहराला पुरविण्यात येणारे पाणी शुद्ध असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पालिकेच्या भूमिकेबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. (प्रतिनिधी)प्रदूषणाचा प्रश्न गंभीरटेंभू प्रकल्पानजीक झालेल्या पाणीसाठ्यापेक्षा इतर ठिकाणीही पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. सातारा, वाई येथील पाणी वाहत या ठिकाणी येते. त्यामुळे पाणी प्रदूषणाचा विषय खूपच गंभीर आहे. टेंभू प्रकल्प बंद असतानाही येथे पाणी अडविले जाते, हे चुकीचे आहे. खासगी वीज कंपनीसाठी हे पाणी अडविले जात असून त्याला आमचा विरोध आहे. - सागर बर्गे, शहराध्यक्ष, मनसे